शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

ऑलिम्पिक पदक जिंकू न शकल्याची खंत- सरदारसिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 23:20 IST

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाकडे चांगली संधी

नवी दिल्ली : भारतीय हॉकीत नव्याने प्राण फुंकणाऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व केल्याचा अभिमान वाटत असल्याचे मत माजी खेळाडू सरदारसिंग याने व्यक्त केले आहे. त्याचवेळी करिअरमध्ये आॅलिम्पिक पदक जिंकू शकलो नाही, याची खंत वाटते, असेही सरदार म्हणाला. ‘मनप्रीतसिंग याच्या नेतृत्वाखालील पुरुष संघ पुढच्यावर्षी टोकियो आॅलिम्पिकमध्ये चार दशकांचा पदकांचा दुष्काळ संपवेल,’असा विश्वास या माजी कर्णधाराने व्यक्त केला आहे.

सरदार म्हणाला, ‘हॉकीत प्राण फुंकणाºया युगाचा मी साक्षीदार आहे. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तळाच्या स्थानावर राहिल्यानंतर २०१८ ला निवृत्ती घेतली त्यावेळी जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर होतो. हा दीर्घ प्रवास समाधानकारक आहे. सध्या आमचा संघ चौथ्या स्थानावर असल्याने टोकियोपूर्वी मनोबल उंचावलेले असेल.’ ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत आठ सुवर्णपदकांसह एक रौप्य आणि दोनदा कांस्य जिंकले आहे.

गेल्या ४० वर्षांत १९८० साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे सुवर्ण जिंकले होते. कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक वर्षभर लांबणीवर पडल्याने सरदार म्हणाला, ‘यामुळे भारतीय संघाला कमुकवत गोष्टींवर मात करणे सोपे जाईल. नव्या प्रतिभेचा शोध घेण्याची हीच वेळ आहे. राजकुमार, दिलपी्रत, विवेक सागर, गुरसाहिब यांच्यासारख्या युवा खेळाडूंना मुख्य कोच ग्रॅहम रीड यांनी प्रो लीगमध्ये संधी देणे हा चांगला प्रयोग होता. संघाने स्वत:चे लक्ष विचलित होऊ देऊ नये.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020