भारत - आफ्रिका कसोटीच्या तिस-या दिवशीही पावसाचाच 'खेळ'
By Admin | Updated: November 16, 2015 12:56 IST2015-11-16T12:52:15+5:302015-11-16T12:56:31+5:30
बेंगळुरुत सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीत तिस-या दिवशीही पावसाने हजेरी लावल्याने तिस-या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे.

भारत - आफ्रिका कसोटीच्या तिस-या दिवशीही पावसाचाच 'खेळ'
ऑनलाइन लोकमत
बेंगळुरु, दि. १६ - बेंगळुरुत सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीत तिस-या दिवशीही पावसाने हजेरी लावल्याने तिस-या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवारीही पावसाची शक्यता असल्याने चौथ्या दिवसाच्या खेळावरही पावसाचे सावट आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरु असून या कसोटी मालिकेतील दुसरा बेंगळुरुत सुरु आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेला २१४ धावांमध्ये गुंडाळले होते. भारताच्या पहिल्या डावाची सुरुवातही चांगली झाली असून पहिल्या दिवस अखेर भारताने बिनबाद ८० धावा केल्या होत्या. शिखर धवन नाबाद ४५ तर मुरली विजय नाबाद २८ धावांवर खेळत होता. पावसामुळे दुस-या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला होता. सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजता खेळ सुरु होणे अपेक्षित होते. सकाळी पावसाची संततधार सुरु होती. मात्र दुपारी लंचपर्यंत मुसळधार पाऊस सुरु झाला व अखेरीस पंचांनी तिस-या दिवसाचा खेळही रद्द करण्याचा निर्णय घेतला.