शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

रहाणे, जडेजासमोर दक्षिण आफ्रिकेच लोटांगण

By admin | Updated: December 4, 2015 20:12 IST

फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू असलेल्या अंतिम कसोटी सामन्यात आज रविंद्र जाडेजाच्या प्रभावी फिरकी मा-यासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव १२१ धावात संपुष्टात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ -  अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विनच्या दमदार फलंदाजीनंतर रविंद्र जाडेजाने केलेल्या प्रभावी फिरकी गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १२१ धावात संपुष्टात आला आणि भारताला २१३ धावांची मोठी आघाडी मिळाली. सावध सुरुवात करणा-या दक्षिण आफ्रिकेचे सर्व फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. डीएन एल्गार (१७), बावुमा (२२), कर्णधार हाशिम अमला (३) , जेपी डयुमिनी (१), डेन पीट (५) आणि फा डु प्लेसिस (०) यांना स्वस्तात तंबूत परतवले.  रविंद्र जाडेजाने ५, उमेश यादव आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले, तर इशांत शर्माने एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. 
त्यापूर्वी अजिंक्य रहाणे (१२७) आणि आर. अश्विनच्या (५६) झुंजार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३३४ धावा केल्या.  दक्षिण आफ्रिकेतर्फे अॅबॉटने ५, पिएटने ४ तर इम्रान ताहिरने १ बळी टिपला. 
भारताने ७ बाद २३१ वरून दुस-या दिवसाचा खेळ सुरू केला. अजिंक्य रहाणेने चिवट खेळी करून भारतीय मैदानावर शानदार शतक झळकावले, त्याला अश्विनचीही चांगली साथ मिळाली. मात्र १२७ धावांवर खेळताना रहाणे इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि भारताची स्थिती ८ बाद २९६ अशी झाली होती. त्यानंतर आर. अश्विनने अर्धशतकी खेळी करत भारताला ३०० धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र भारताच्या ३३४ धावा झालेल्या असताना अश्विनच्या रुपाने (५६) नववा गडी बाद झाला आणि त्यापाठोपाठ इशांत शर्मा (०) भोपळाही न फोडता तंबूत परतला आणि भारताचा डाव ३३४ धावांवर आटोपला.