शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

रहाणे, जडेजासमोर दक्षिण आफ्रिकेच लोटांगण

By admin | Updated: December 4, 2015 20:12 IST

फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू असलेल्या अंतिम कसोटी सामन्यात आज रविंद्र जाडेजाच्या प्रभावी फिरकी मा-यासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव १२१ धावात संपुष्टात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ -  अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विनच्या दमदार फलंदाजीनंतर रविंद्र जाडेजाने केलेल्या प्रभावी फिरकी गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १२१ धावात संपुष्टात आला आणि भारताला २१३ धावांची मोठी आघाडी मिळाली. सावध सुरुवात करणा-या दक्षिण आफ्रिकेचे सर्व फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. डीएन एल्गार (१७), बावुमा (२२), कर्णधार हाशिम अमला (३) , जेपी डयुमिनी (१), डेन पीट (५) आणि फा डु प्लेसिस (०) यांना स्वस्तात तंबूत परतवले.  रविंद्र जाडेजाने ५, उमेश यादव आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले, तर इशांत शर्माने एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. 
त्यापूर्वी अजिंक्य रहाणे (१२७) आणि आर. अश्विनच्या (५६) झुंजार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३३४ धावा केल्या.  दक्षिण आफ्रिकेतर्फे अॅबॉटने ५, पिएटने ४ तर इम्रान ताहिरने १ बळी टिपला. 
भारताने ७ बाद २३१ वरून दुस-या दिवसाचा खेळ सुरू केला. अजिंक्य रहाणेने चिवट खेळी करून भारतीय मैदानावर शानदार शतक झळकावले, त्याला अश्विनचीही चांगली साथ मिळाली. मात्र १२७ धावांवर खेळताना रहाणे इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि भारताची स्थिती ८ बाद २९६ अशी झाली होती. त्यानंतर आर. अश्विनने अर्धशतकी खेळी करत भारताला ३०० धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र भारताच्या ३३४ धावा झालेल्या असताना अश्विनच्या रुपाने (५६) नववा गडी बाद झाला आणि त्यापाठोपाठ इशांत शर्मा (०) भोपळाही न फोडता तंबूत परतला आणि भारताचा डाव ३३४ धावांवर आटोपला.