शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पुण्याची खेळपट्टी खराब नव्हती

By admin | Updated: March 2, 2017 04:50 IST

पुण्याची खेळपट्टी खराब नव्हती, तर ही खेळपट्टी पहिल्या चेंडूपासूनच आव्हानात्मक होती

बंगळुरु : पुण्याची खेळपट्टी खराब नव्हती, तर ही खेळपट्टी पहिल्या चेंडूपासूनच आव्हानात्मक होती,’ असे वक्तव्य भारताचा सलामीवीर मुरली विजयने केले. पुण्याची खेळपट्टी खराब असल्याचा निर्णय आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी दिला होता. परंतु, ब्रॉड यांच्या निर्णयाशी असहमती दर्शविताना विजयने या खेळपट्टीला आव्हानात्मक म्हटले आहे.शनिवारपासून सुरू होणाऱ्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयने म्हटले की, ‘पुण्याची खेळपट्टी आव्हानात्मक होती. एक क्रिकेटपटू म्हणून आम्हाला सपाट खेळपट्टीवर खेळण्याऐवजी कधीतरी अशा खेळपट्टीवरही खेळले गेले पाहिजे. खरं म्हणजे, अशा खेळपट्टीवर खेळणे कधीही चांगले असते. अशा ठिकाणी आपला खेळ आणि तंत्र यांची परीक्षा होते.’ त्याचवेळी विजयला चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या सामन्यातील खेळपट्टी चांगली असेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, वैयक्तिकरीत्या तो खेळपट्टीविषयी चिंतीत नाही. विजय म्हणाला, ‘मी मोकळेपणाने मैदानावर उतरतो आणि खेळपट्टीनुसार स्वत:च्या खेळामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो. माझं वैयक्तिक मत आहे, की भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात मोठ्या धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन करणे कठीण होते. एकूणच आम्ही चांगला खेळ केला नाही.’डीआरएसच्या वापाराविषयी विजयने सांगितले, ‘नक्कीच डीआरएसचा पर्याय आमच्यासाठी अनुकूल राहिला नाही. माझ्या मते आम्हाला त्या १५ सेकंदाचा चांगला उपयोग केला पाहिजे. पुण्यातील पराभवानंतर आम्ही चर्चा केली आणि आम्ही काही कमजोर ठरलेल्या बाजूंवर काम सुरू केले आहे. आम्ही नव्याने सुरुवात करून सर्व संधींचा फायदा उचलण्यास सज्ज आहोत.’ (वृत्तसंस्था) >या मालिकेची सुरुवात २०१५ च्या श्रीलंका दौऱ्यासारखी आहे. आम्ही सध्या आमच्या खेळाविषयी विचार करीत आहोत आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात सकारात्मक विचाराने खेळण्याचा आमचा निर्धार आहे. एक संघ म्हणून पुण्यात आम्ही अपयशी ठरलो. आम्हाला या गोष्टीचा स्वीकार करून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. - मुरली विजय