पुण्यातील खेळपट्टी खराब, सामनाधिकाऱ्यांचे ताशेरे
By Admin | Updated: February 28, 2017 19:53 IST2017-02-28T17:02:23+5:302017-02-28T19:53:10+5:30
फिरकीला अनुकूल ठरलेल्या पुण्यातील आखाडा खेळपट्टीवर फलंदाजी करताना फलंदाजांची त्रेधा उडाली होती. आता ही खेळपट्टी वादात सापडली असून, सामनाधिकाऱ्यांनी

पुण्यातील खेळपट्टी खराब, सामनाधिकाऱ्यांचे ताशेरे
ऑनलाइन लोकमत
दुबई, दि.28 - नुकत्याच आटोपलेल्या पुणे कसोटीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्करावा लागला. फिरकीला अनुकूल ठरलेल्या या आखाडा खेळपट्टीवर फलंदाजी करताना फलंदाजांची त्रेधा उडाली होती. आता ही खेळपट्टी वादात सापडली असून, सामनाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानातील ही खेळपट्टी खराब असल्याचा अहवाल आयसीसीला दिला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी ख्रिस ब्रॉड यांनी सामनाधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यांनी या खेळपट्टीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयसीसीला पाठवलेल्या आपल्या अहवालात खेळपट्टीवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. या अहवालाची दखल घेत 14 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे आदेश आयसीसीने बीसीसीआयला दिले आहेत.
प्रथमच कसोटी सामन्याचे आयोजन करत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची खेळपट्टी मात्र कसोटी क्रिकेटला साजेशी नव्हती. या खेळपट्टीवर एकीकडे पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने दोन्ही डावात अडीचशेपार मजल मारण्यात यश मिळवले. पण यजमान संघाची मात्र घरच्या मैदानावर दाणादाण उडाली. एकाही फलंदाजाला चमकदार कामगिरी करता न आल्याने दोन्ही डावात शंभरी गाठताना भारतीय संघाच्या नाकी नऊ आले होते.
ICC Match Referee Chris Broad rated Maharashtra Cricket Association Stadium pitch in Pune as “poor".BCCI has 14 days to provide response.
— ANI (@ANI_news) February 28, 2017
Chris Broad was the match referee for the first Test between India and Australia in Pune.
— ANI (@ANI_news) February 28, 2017
आयसीसी म्हटले आहे की,‘आयसीसी खेळपट्टी व बाह्य मैदान यावर लक्ष ठेवण्याच्या नियम ३ च्या अंतर्गत ब्रॉड यांनी आापला अहवाल आयसीसीला सोपविला आहे. त्यात खेळपट्टीच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.’बीसीसीआयच्या उत्तराची समीक्षा आयसीसीचे क्रिकेट महाव्यवस्थापक ज्योफ अलार्डिस व आयसीसी मॅच रेफ्री एलिट पॅनलचे रंजन मदुगले करतील. मॅच रेफ्रीने भारतातील खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित करण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही.डिसेंबर २०१५ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसºया कसोटी सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीलाही मॅच रेफ्रीने खराब असल्याचा शेरा दिला होता. त्यावेळीही तीन दिवासांमध्येसामना संपला होता आणि भारताने १२४ धावांनी विजय मिळवित चार सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली होती.पुण्यातील खेळपट्टीवर चेंडू पहिल्या दिवसापासून वळत होता, पण येथे खेळणे अशक्य नव्हते. कारण आॅस्ट्रेलिया दोन्ही डावांमध्ये २५० पेक्षा अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला. भारताला मात्र दोन्ही डावात एकूण ७४ षटकेही फलंदाजी करता आली नाही.