शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

श्रीकांतला आता चुकांवर नियंत्रण ठेवावे लागेल: गोपीचंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 10:06 IST

किदाम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला.

नवी दिल्ली : किदाम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. आता पुढील वर्षात अत्यंत व्यस्त वेळापत्रक असून, यामध्ये सातत्याने चांगली कामगिरी करण्यासाठी श्रीकांतला चुका करण्यावर नियंत्रण राखावे लागेल, अशी प्रतिक्रिया भारताचे मुख्य बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी दिली. श्रीकांतला रविवारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा श्रीकांत भारताचा पहिला पुरुष शटलर ठरला होता.

गोपीचंद यांनी सांगितले की, ‘प्रत्येक सामन्यागणिक श्रीकांतच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता होती, परंतु ली जी जिया आणि केंटो मोमोटा यासारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध केलेल्या शानदार खेळाने त्याचा आत्मविश्वास उंचावला. 

विशेष म्हणजे त्याला योग्य वेळेला लय मिळाली. आता पुढील वर्षी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा यासारख्या मोठ्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी त्याला आपल्या चुकांवर नियंत्रण राखावे लागेल.’

गोपीचंद पुढे म्हणाले की, ‘सलग स्पर्धा खेळल्याने अनेक खेळाडूंसाठी दुखापतीतून सावरणे कठीण होते. श्रीकांतसोबतही असेच झाले. ऑलिम्पिक पात्रतेसाठी त्याने पुनरागमनासाठी घाई केली. स्पेनमध्ये त्याला तीन गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात खेळताना पाहून चांगले वाटले. सुदीरमन कप स्पर्धेपासून तो सातत्याने खेळत असून हे चांगले संकेत आहेत.’ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत श्रीकांतसह एच. एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेन यांनीही छाप पाडली. प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत, तर लक्ष्य उपांत्य फेरीत पराभूत झाला. श्रीकांतने लक्ष्यलाच नमवीत अंतिम फेरीत धडक दिली होती. याबाबत गोपीचंद म्हणाले की, ‘या खेळाडूंना अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये पोहोचल्याचे पाहून आनंद झाला. लक्ष्य आणि प्रणॉय यांनीही शानदार खेळ केला. आगामी महत्त्वाच्या सत्रासाठी ही चांगली चिन्हे आहेत.’ 

टॅग्स :Kidambi Srikanthकिदम्बी श्रीकांतPullela Gopichandपुलेला गोपीचंद