शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आफ्रिकी धावपटूंना खेळवणे म्हणजे ‘मानवी तस्करी’; एएफआय प्रमुख आदिल सुमारीवाला यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 02:38 IST

‘आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा आफ्रिका वंशाच्या धावपटूंनी वर्चस्व राखले. परंतु, हे यश मिळवत असताना त्यांनी दुसऱ्या देशांचे प्रतिनिधित्त्व केले. हे खेळासाठी अयोग्य असून हा प्रकार मानवी तस्करीसारखा आहे,’ अशी टीका भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे (एएफआय) प्रमुख आदिल सुमारीवाला यांनी केली.

मुंबई : ‘आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा आफ्रिका वंशाच्या धावपटूंनी वर्चस्व राखले. परंतु, हे यश मिळवत असताना त्यांनी दुसऱ्या देशांचे प्रतिनिधित्त्व केले. हे खेळासाठी अयोग्य असून हा प्रकार मानवी तस्करीसारखा आहे,’ अशी टीका भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे (एएफआय) प्रमुख आदिल सुमारीवाला यांनी केली.मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या (एसजेएएम) वतीने बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सुमारीवाला यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी, भारतीय बॉक्सिंग महासंघाचे सरचिटणीस जय कोवली, माजी कुस्तीपटू आणि आघाडीचा कुस्तीपटू राहुल आवरे याचे प्रशिक्षक काका पवार आणि माजी आॅलिम्पियन नेमबाज व प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांचीही उपस्थिती होती.सुमारीवाला यावेळी म्हणाले की, ‘मला वाटते की, अरब देश बाहेरुन खेळाडू मागवतात. ते स्पर्धेपुरता त्यांचा वापर करतात आणि नंतर त्यांना त्यांच्या देशात पाठवतात. एकूण अरब देश जे काही करत आहेत ते चुकीचे आहे.’ त्याचप्रमाणे, ‘अरब देशांकडून खेळताना आफ्रिकी खेळाडू योग्य मार्गाने स्पर्धेसाठी पात्रता मिळवत नाही,’ असेही सुमारीवाला यांनी यावेळी म्हटले.या सर्व प्रक्रीयेमध्ये होत असलेल्या अनेक गैरव्यवहाराविषयी सुमारीवाला म्हणाले की, ‘आफ्रिकी खेळाडूंना अरब देशांचे नागरिकत्व दिले जात नाही. त्यांना केवळ घर दिले जाते. तसेच अवैध पासपोर्ट दिले जाते, ज्याआधारे ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. स्पर्धेत भाग घेतल्यानंत त्यांना अक्षरश; फेकले जाते आणि हे मानवी तस्करी आहे. याविषयी मी आयएएएफच्या बैठकीमध्येही विरोध केला आहे.’ त्याचप्रमाणे यावेळी जय कोवळी, काका पवार आणि दिपाली देशपांडे यांनीही महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील आव्हाने, अडचणी यांसह सरकारकडून अपेक्षित असलेल्या मदतीविषयी विस्तृत चर्चा केली.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा