शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी लक्षणीय : राठोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 06:04 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. अजूनही काही क्रीडा प्रकारांत आपले खेळाडू अंतिम किंवा उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.

अभिजित देशमुखथेट जकार्ता येथून

येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. अजूनही काही क्रीडा प्रकारांत आपले खेळाडू अंतिम किंवा उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. २०२० च्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने ही कामगिरी उल्लेखनीय आहे. बॅडमिंटन, तिरंदाजी यांसारख्या क्रीडा प्रकारांत आपल्या खेळाडूंकडून पदक जिंकण्याची अपेक्षा आहे. आज अ‍ॅथलेटिक्समध्येसुद्धा आपल्या खेळाडूंनी रौप्यपदके जिंकली आहेत.

आम्ही क्रीडाक्षेत्राला खूप प्रोत्साहन देत आहोत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्रीडाला खूप प्राधान्य दिले आहे. आॅलिम्पिकसाठी खास टास्क फोर्स सुरू करणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. तसेच ग्रासरूट्सवर आम्ही सुधारणा करत आहोत, ज्या क्रीडासाठी सर्वांत आवश्यक आहे त्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेच्या माध्यमातून बरेच प्रतिभाशाली खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत मिळाले आहेत. त्यांनी इथे पदकसुद्धा जिंकले. भविष्यात खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून चांगल्या खेळाडूंचा शोध लागणार आहे. तसेच, एलिट खेळाडूंसाठी आम्ही व्यावसायिक लोकांची नियुक्ती केली आहे, त्यांना लागणारे साहित्य आणि सगळी मदत आम्ही देत आहोत. निधीमध्येसुद्धा कुठलीच कमी नाही, क्रीडा विज्ञानसुद्धा आम्ही खेळमध्ये जोडत आहे.

स्थानिक भारतीय कुटुंबांकडूनखेळाडूंना ‘जय हो इंडिया’चा नारादुर्ग, छत्तीसगढ येथील अतुल जैन व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आतापर्यंतबजरंग पूनिया, विनेश फोगटच्या अंतिम लढतींच्या वेळी ‘जय हो इंडिया’चा नारा देत प्रोत्सहान दिले होते. सुवर्णपदकाचा सामना, हॉकीमध्ये भारताच्या हाँगकाँगवर

ऐतिहासिक २६-० गोलने विजय, भारतीय महिला कबड्डीअंतिम सामनासुद्धा पहिला आहे. आम्ही अजून अ‍ॅथलेटिक्स, बॉक्सिंग, तिरंदाजीकडेसुद्धा जाणार आहे. सर्व पदकविजेतासोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांनी ‘आय लव्ह इंडिया’ नावाचे की-चेन देऊन अशी शक्कल लढवली आहे. जैन कुटुंब जकार्तामध्ये २०११ पासून राहत असून, घरातील सर्व पुरुष सदस्य अतुल, विजय आणि अशोक खासगी उद्योग समूहात म्हणून काम करत आहे. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ