शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी लक्षणीय : राठोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 06:04 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. अजूनही काही क्रीडा प्रकारांत आपले खेळाडू अंतिम किंवा उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.

अभिजित देशमुखथेट जकार्ता येथून

येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. अजूनही काही क्रीडा प्रकारांत आपले खेळाडू अंतिम किंवा उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. २०२० च्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने ही कामगिरी उल्लेखनीय आहे. बॅडमिंटन, तिरंदाजी यांसारख्या क्रीडा प्रकारांत आपल्या खेळाडूंकडून पदक जिंकण्याची अपेक्षा आहे. आज अ‍ॅथलेटिक्समध्येसुद्धा आपल्या खेळाडूंनी रौप्यपदके जिंकली आहेत.

आम्ही क्रीडाक्षेत्राला खूप प्रोत्साहन देत आहोत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्रीडाला खूप प्राधान्य दिले आहे. आॅलिम्पिकसाठी खास टास्क फोर्स सुरू करणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. तसेच ग्रासरूट्सवर आम्ही सुधारणा करत आहोत, ज्या क्रीडासाठी सर्वांत आवश्यक आहे त्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेच्या माध्यमातून बरेच प्रतिभाशाली खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत मिळाले आहेत. त्यांनी इथे पदकसुद्धा जिंकले. भविष्यात खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून चांगल्या खेळाडूंचा शोध लागणार आहे. तसेच, एलिट खेळाडूंसाठी आम्ही व्यावसायिक लोकांची नियुक्ती केली आहे, त्यांना लागणारे साहित्य आणि सगळी मदत आम्ही देत आहोत. निधीमध्येसुद्धा कुठलीच कमी नाही, क्रीडा विज्ञानसुद्धा आम्ही खेळमध्ये जोडत आहे.

स्थानिक भारतीय कुटुंबांकडूनखेळाडूंना ‘जय हो इंडिया’चा नारादुर्ग, छत्तीसगढ येथील अतुल जैन व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आतापर्यंतबजरंग पूनिया, विनेश फोगटच्या अंतिम लढतींच्या वेळी ‘जय हो इंडिया’चा नारा देत प्रोत्सहान दिले होते. सुवर्णपदकाचा सामना, हॉकीमध्ये भारताच्या हाँगकाँगवर

ऐतिहासिक २६-० गोलने विजय, भारतीय महिला कबड्डीअंतिम सामनासुद्धा पहिला आहे. आम्ही अजून अ‍ॅथलेटिक्स, बॉक्सिंग, तिरंदाजीकडेसुद्धा जाणार आहे. सर्व पदकविजेतासोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांनी ‘आय लव्ह इंडिया’ नावाचे की-चेन देऊन अशी शक्कल लढवली आहे. जैन कुटुंब जकार्तामध्ये २०११ पासून राहत असून, घरातील सर्व पुरुष सदस्य अतुल, विजय आणि अशोक खासगी उद्योग समूहात म्हणून काम करत आहे. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ