शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा! तिरंदाजी : मुंबईच्या आदिल अन्सारीने भेदले सुवर्णपदकाचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 17:10 IST

पॅरा तिरंदाजी सर्वात कठिण समजल्या जाणाऱ्या पॅरा तिरंदाजीतील डब्लू १ प्रकारात आदिलने आपलाच आंतरराष्ट्रीय संघ सहकारी नवीन दलालचा १३२-१०० असा सहज पराभव केला.

नवी दिल्ली - क्रीडा मंत्रालय आणि साई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची थकलेली सुवर्ण पदकाची प्रतिक्षा शनिवारी तिरंदाज आदिल अन्सारीने पूर्ण केली. पॅरा तिरंदाजी सर्वात कठिण समजल्या जाणाऱ्या पॅरा तिरंदाजीतील डब्लू १ प्रकारात आदिलने आपलाच आंतरराष्ट्रीय संघ सहकारी नवीन दलालचा १३२-१०० असा सहज पराभव केला. आदिल आणि नवीन ही जोडी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरीमधील सुवर्णपदक विजेती जोडी आहे. या दोघांमध्येच अंतिम झुंज होणार हे अपेक्षित होते. त्या प्रमाणेच झालेल्या या अंतिम लढतीत आदिलने पहिल्या सेटपासून एकतर्फी वर्चस्व राखले. यात दुसऱ्या सेटला दोनदा आणि चौथ्या सेटला दोनदा १० गुणांचा वेध घेत आदिलने आपली बाजू भक्कम केली. त्यानंतर अखेरचा सेटही तेवढाच अचूक खेळत त्याने सुवर्णपदक निश्चित केले. नवीनला आज आदिलच्या सातत्यसमोर टिकताच आले नाही. त्याला लय गवसली नाही. मात्र, आता आम्ही दोघेही नव्याने पॅरा ऑलिम्पिकची तयारी करणार असल्याचे सांगितले. 

डावपेच यशस्वी ठरल्याने चॅम्पियन : आदिलपदार्पणामध्ये या स्पर्धेत चॅम्पियन होण्यासाठी मी खास डावपेच आखले होते. यामुळे मला यानुसार दर्जेदार कामगिरी करता आली. यातूनच मी चॅम्पियन होण्याचे स्वप्न यशस्वीपणे साकारले. यासाठी मला  सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशा शब्दामध्ये आदिलने सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद व्यक्त केला.

आदिलची कामगिरी कौतुकास्पद : नीतू इंगोलेया स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतची आदिलची कामगिरी कौतुकास्पद ठरली. याच दर्जेदार कामगिरीमुळे त्याला सुवर्णपदकाचा बहुमान मिळवता आला. महाराष्ट्र संघासाठी ही अभिमानास्पद कामगिरी ठरली. यातून महाराष्ट्र संघाच्या नावे तिरंदाजीमध्ये विक्रमी पदकाची नोंद झाली, अशा शब्दामध्ये मुख्य प्रशिक्षक नीतू इंगोले यांनी पदक विजेत्या आदिलच्या कामगिरीचे कौतुक केले. 

महाराष्ट्राचे पुरुष खेळाडू अंतिम फेरीतटेबल टेनिस क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या दत्तप्रसाद चौगुले आणि विश्व तांबे यांनी अंतिम फेरी गाठली. मात्र, महिला विभागात महाराष्ट्राच्या खेळाडूंना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. पुरुषांच्या पहिल्या एकेरीच्या उपांत्य लढतीत दत्तप्रसाद चौगुलेने तमिळनाडूच्या नितिशचे आव्हान कडव्या प्रतिकारानंतर ११-७, ११-५, ९-११, ११-८ असे परतवून लावले. त्यानंतर विश्व तांबेने अंतिम फेरी गाठताना दिल्लीच्या योगेश मुखर्जीचा एकतर्फी लढतीत ११-६, ११-७, ११-३ असा पराभव केला. 

अशोक कुमार आणि रिषित नथवानी यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातच्या ध्रुव योगेश चुघने अशोककुमारचा तीन सेटच्या लढतीत ११-६, ११-५, ७-११, ११-६ असा पराभव केला. पवन कुमार शर्माने महाराष्ट्राच्या रिषीत नथवानीचे आव्हान असेच तीन गेमच्या लढतीत ११-६, ११-७, १२-१०, ११-५ असे संपुष्टात आणले. महिलांमध्ये वैष्णवी सुतार आणि उज्वला चव्हा दोघींनाही पराभवाचा सामना करावा लागला. चंडिगडच्या पूनमने वैष्णवीचे आव्हान ११-८, ७-११, ११-६, ११-९ असे मोडून काढले. गुजरातच्या भाविका कुकोडियाने उज्वलाचा ११-३, ११-९, ११-७ अस पराभव केला.  महाराष्ट्राचे सहावे स्थान कायमपदक तालिकेत महाराष्ट्र १० सुवर्ण, ६ रौप्य आणि १२ ब्राँझ अशा २८ पदकांसह सहाव्या स्थानावर कायम आहे. हरियानाने पदकाचे शतक गाठले असून, आघाडी कायम राखताना त्यांना आतापर्यंत ३८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि २४ ब्राँझपदके मिळविली आहे. उत्तर प्रदेश (२४, २१, १०) दुसऱ्या, तमिळनाडू (१८, ७, १३) तिसऱ्या, गुजरात (१४, १८, १६) चौथ्या आणि राजस्थान (१०, २०, १३) पाचव्या स्थानावर आहेत.

 

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र