शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

शालेय स्पर्धेने गाठली शंभरी खेळांची संख्या १०१ वर : क्रीडा खात्याचा सपाटा चालू महेश पाळणे, लातूर : राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने नवीन खेळांना

By admin | Updated: December 3, 2014 22:35 IST

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने १० नोव्हेंबर रोजी नवीन १२ खेळांना शालेय स्पर्धेत समाविष्ट केले होते. तत्पूर्वी गतवर्षीही काही खेळांना शालेय स्पर्धेत स्थान देण्यात आले होते. बुधवारी परत क्रीडा आयुक्तांच्या आदेशाने दोन नव्या खेळांना मान्यता देण्याच्या निर्णयाचे पत्र जिल्हा क्रीडा कार्यालयात येऊन धडकले. यात स्पीडबॉल व तेंग सु डो या दोन खेळांचा समावेश आहे. ९९ वर पोहोचलेल्या शालेय खेळांचे या दोन नवीन खेळांमुळे शतक पूर्ण झाले आहे. पूर्वी शालेय स्पर्धेत ६५ खेळांचा समावेश होता. यात अनुदानित ३२ तर विनाअनुदानित ३३ खेळांचा समावेश होता. महिला क्रीडा स्पर्धेत १२ तर ग्रामीण क्रीडा स्पर्धेत १० अशा एकूण ८७ खेळांचा समावेश होता. आठ दिवसांपूर्वीच नवीन बारा खेळांमुळे ही संख्या ९९ वर पोहोचली होती. आता या दोन खेळांमुळे शालेय खेळांची संख्या १०१ वर जाऊन पोहोचली आहे. या सततच्या नवीन

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने १० नोव्हेंबर रोजी नवीन १२ खेळांना शालेय स्पर्धेत समाविष्ट केले होते. तत्पूर्वी गतवर्षीही काही खेळांना शालेय स्पर्धेत स्थान देण्यात आले होते. बुधवारी परत क्रीडा आयुक्तांच्या आदेशाने दोन नव्या खेळांना मान्यता देण्याच्या निर्णयाचे पत्र जिल्हा क्रीडा कार्यालयात येऊन धडकले. यात स्पीडबॉल व तेंग सु डो या दोन खेळांचा समावेश आहे. ९९ वर पोहोचलेल्या शालेय खेळांचे या दोन नवीन खेळांमुळे शतक पूर्ण झाले आहे. पूर्वी शालेय स्पर्धेत ६५ खेळांचा समावेश होता. यात अनुदानित ३२ तर विनाअनुदानित ३३ खेळांचा समावेश होता. महिला क्रीडा स्पर्धेत १२ तर ग्रामीण क्रीडा स्पर्धेत १० अशा एकूण ८७ खेळांचा समावेश होता. आठ दिवसांपूर्वीच नवीन बारा खेळांमुळे ही संख्या ९९ वर पोहोचली होती. आता या दोन खेळांमुळे शालेय खेळांची संख्या १०१ वर जाऊन पोहोचली आहे. या सततच्या नवीन खेळांमुळे शासनाचे क्रीडा धोरण न समजण्याजोगे झाले आहे. एकिकडे नवनवीन खेळांना शासन मान्यता देत असली तरी जुन्या खेळांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचे क्रीडा क्षेत्रातून बोलले जात आहे.
म्हणे दर्जा सुधारायचा आहे...
शालेय स्पर्धेत वाढत्या नवीन खेळांची संख्या लक्षात घेता हा सपाटा क्रीडा खात्याने का चालू केला, याबाबत माहिती घेतली असता एसजीएफआय (स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया) मध्ये हे खेळ आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा दर्जा घसरत आहे. त्यामुळे नवीन खेळांना मान्यता देऊन हा दर्जा सुधारण्याचा क्रीडा खात्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. मात्र जुन्या खेळांकडे अधिक लक्ष दिले तरी त्यातही पदके मिळू शकतात. मात्र शासनाचे हे धोरण क्रीडा क्षेत्राला वेगळ्या वाटेवर घेऊन जात आहे.
मैदाने व खेळाडूही दिसेनात...
नव्याने मान्यता दिलेल्या काही खेळांची मैदाने शहरात दिसत नाहीत. सरावाचे तर लांबच. यासोबतच जिल्हा क्रीडा कार्यालयात असलेल्या चार क्रीडा अधिकार्‍यांवर शंभर खेळांचे ओझे यामुळे स्पर्धेचा दर खालावणार नाही का? तसेच एकाच व्यक्तीकडे अनेक खेळांच्या संघटना ही बाबही लक्ष वेधून घेत आहे.