शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

धावपटू निर्मला शेरॉन डोपिंगमध्ये दोषी; भारतावर सुवर्णपदके गमवण्याची नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 19:49 IST

आता शेरॉनने जिंकलेली दोन सुवर्णपदके भारताला परत करावी लागणार आहेत.

मुंबई : भारताची धावपटू निर्मला शेरॉन ही डोपिंगमध्ये दोषी आढळली आहे. त्यामुळे भारतावर सुवर्णपदके गमवण्याची नामुष्की आली आहे. शेरॉनवर ‘अॅथेलेटिक्स इंटिग्रिट युनीट (एआईयू)’ ने डोपिंगमध्ये दोषी सापडल्याप्रकरणी चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेरॉनने जिंकलेली दोन सुवर्णपदके भारताला परत करावी लागणार आहेत.

एआईयूने 2018 साली भारतामध्ये झालेल्या स्पर्धेत शेरॉनला दोषी ठरवले आहे. या स्पर्धेत स्टेरॉयड ड्रोस्तानोलोन और मेटेनोलोनचा वापर शेरॉनने केला, असे म्हटले गेले आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून शेरॉनवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एआईयूनुसार शेरॉनच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये काहीतरी गडबड असल्याचे जाणवले होते. त्यानंतर सखोल तपास आणि चाचणी केल्यानंतर शेरॉन दोषी असल्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय शेरॉनला सांगण्यात आला असून तिने याप्रकरणी चौकशीची मागणी केलेली नाही.

शेरॉनने 2017 साली भारतामध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती. या स्पर्धेत शेरॉनने 400 मीटर आणि 4 बाय 400 मीटर या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्येही शेरॉनने या दोन्ही विभागांमध्ये भारताकडून सहभाग घेतला होता.

टॅग्स :Indiaभारत