शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Archery World Cup: बॉक्सर Nikhat Zareen नंतर भारताला आणखी एक सुवर्ण! तिरंदाजी वर्ल्ड कपमध्ये 'टीम इंडिया'ला Gold Medal

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 16:52 IST

अवघ्या २ गुणांच्या फरकाने मिळालं सुवर्णपदक

Archery World Cup, India wins Gold Medal: भारतीय महिला बॉक्सर निखत झरिन (Nikhat Zareen) हिने नुकतेच वर्ल्ड बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या सुवर्ण विजयाचा भारतीय क्रीडा रसिकांकडून जल्लोष सुरू असतानाच भारतीय क्रीडापटूंनी आणखी एक सुवर्णपदक जिंकले. तिरंदाजी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताच्या तिरंदाजांनी फ्रान्सपेक्षा सरस कामगिरी केली. २३२-२३० अशा अतिशय थोड्या फरकाने भारतीय तिरंदाजांनी विजय मिळवला आणि तिरंदाजीच्या संमिश्र प्रकारच्या स्पर्धेत (कंपाउंड) हे सुवर्णपदक जिंकले. देशासाठी हे सुवर्णपदक अमन सैनी, अभिषेक वर्मा आणि रजत चौहान यांनी मिळवले.

भारताकडून अमन सैनी, अभिषेक वर्मा आणि रजत चौहान या त्रिकूटाने दुसऱ्या लेव्हलमध्ये सुवर्णपदक जिंकले. या आधी पहिल्या लेव्हलमध्येही याच त्रिकूटाने सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे हा त्यांचा सलग दुसरा विजय ठरला. महत्त्वाची बाब म्हणजे हा विजय मिळवल्यानंतर या त्रिकूटाने पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केले.

सुरूवातीला पिछाडीवर असतानाही मिळवला विजय

भारतीय संघाने पिछाडीवर असताना दमदार कामगिरी करत सुवर्ण लक्ष्यभेद केला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाने तिरंदाजी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या फ्रेंच संघावर अटीतटीच्या स्पर्धेत विजय मिळवला. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये भारतीय संघ फ्रेंच त्रिकुटापेक्षा पिछाडीवर होता, पण नंतर तिसऱ्या फेरीत त्यांनी अचूक लक्ष्य साधत फ्रान्सच्या आशा धुळीस मिळवल्या. दोन्ही संघांमधील विजयाचे अंतर केवळ २ गुणांचे होते.

टॅग्स :IndiaभारतGold medalसुवर्ण पदक