शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

दुसऱ्या दिवशीचा खेळ पाण्यात

By admin | Updated: June 12, 2015 03:47 IST

भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात जोरदार पावसामुळे गुरुवारी दुसऱ्या दिवशीचा खेळ

फतुल्लाह : भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात जोरदार पावसामुळे गुरुवारी दुसऱ्या दिवशीचा खेळ रद्द करण्यात आला. भारताने बुधवारी पहिल्या दिवसअखेर ५६ षटकांत बिनबाद २३९ धावांची मजल मारली होती. शिखर धवन (१५०) व मुरली विजय (८९) खेळपट्टीवर होते. हवामान खात्याचा अंदाज बघता आगामी तीन दिवस खेळ होण्याची शक्यता धूसर भासत आहे. त्यामुळे भारताला प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी घेणे व सामन्यात निकालाची शक्यता निर्माण करण्याची संधी मिळणे कठीण भासत आहे. पूर्णकालिक कर्णधार म्हणून प्रथमच कसोटी संघाचे नेतृत्व करीत असलेल्या विराट कोहलीसाठी ही निराशाजनक बाब आहे. बांगलादेशने प्रथमच जून महिन्यात कसोटी सामन्याचे आयोजन केले आहे, हे विशेष. वृत्तसंस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार या सामन्यासह आतापर्यंत बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या ५० कसोटी सामन्यांपैकी एकही लढत जून, जुलै, आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात खेळली गेलेली नाही. हा कालावधी मॉन्सूनचा असतो. भारताने आतापर्यंत येथे खेळलेले सात सामने नोव्हेंबर (२०००), डिसेंबर (२००४) आणि जानेवारी (२०१०) या कालावधीत झालेले आहेत. या छोटेखानी मालिकेला पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बांगलादेश वन-डे संघाचा कर्णधार मशरफी मूर्तझाने अलीकडेच केलेल्या चर्चेदरम्यान अशी शंका व्यक्त केली होती. मशरफीने सांगितले, ‘‘उभय संघांना प्रत्येकी ५० षटके खेळण्याची संधी मिळावी आणि पावसाचा व्यत्यय निर्माण होऊ नये, अशी प्रार्थना करतो. पावसाबाबत शक्यता वर्तविणे कठीण आहे.’’(वृत्तसंस्था)