शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

दुसऱ्या दिवशीचा खेळ पाण्यात

By admin | Updated: June 12, 2015 03:47 IST

भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात जोरदार पावसामुळे गुरुवारी दुसऱ्या दिवशीचा खेळ

फतुल्लाह : भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात जोरदार पावसामुळे गुरुवारी दुसऱ्या दिवशीचा खेळ रद्द करण्यात आला. भारताने बुधवारी पहिल्या दिवसअखेर ५६ षटकांत बिनबाद २३९ धावांची मजल मारली होती. शिखर धवन (१५०) व मुरली विजय (८९) खेळपट्टीवर होते. हवामान खात्याचा अंदाज बघता आगामी तीन दिवस खेळ होण्याची शक्यता धूसर भासत आहे. त्यामुळे भारताला प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी घेणे व सामन्यात निकालाची शक्यता निर्माण करण्याची संधी मिळणे कठीण भासत आहे. पूर्णकालिक कर्णधार म्हणून प्रथमच कसोटी संघाचे नेतृत्व करीत असलेल्या विराट कोहलीसाठी ही निराशाजनक बाब आहे. बांगलादेशने प्रथमच जून महिन्यात कसोटी सामन्याचे आयोजन केले आहे, हे विशेष. वृत्तसंस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार या सामन्यासह आतापर्यंत बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या ५० कसोटी सामन्यांपैकी एकही लढत जून, जुलै, आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात खेळली गेलेली नाही. हा कालावधी मॉन्सूनचा असतो. भारताने आतापर्यंत येथे खेळलेले सात सामने नोव्हेंबर (२०००), डिसेंबर (२००४) आणि जानेवारी (२०१०) या कालावधीत झालेले आहेत. या छोटेखानी मालिकेला पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बांगलादेश वन-डे संघाचा कर्णधार मशरफी मूर्तझाने अलीकडेच केलेल्या चर्चेदरम्यान अशी शंका व्यक्त केली होती. मशरफीने सांगितले, ‘‘उभय संघांना प्रत्येकी ५० षटके खेळण्याची संधी मिळावी आणि पावसाचा व्यत्यय निर्माण होऊ नये, अशी प्रार्थना करतो. पावसाबाबत शक्यता वर्तविणे कठीण आहे.’’(वृत्तसंस्था)