शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवर निवडणूक आचारसंहितेची संक्रांत येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 19:04 IST

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणखी सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

सचिन कोरडे, पणजी : विविध अडथळ्यांच्या गर्तेत अडकलेली आणि वादग्रस्त ठरत असलेली गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणखी सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. गोवा सरकारने भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालयास तशा आशयाचे पत्र लिहिले आहे. या पत्रात आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि सुरक्षा या मुख्य कारणांना पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे असे झाल्यास ही स्पर्धा पुन्हा लांबणीवर पडणार आहे. स्पर्धेच्या आयोजनाच्या तयारीवरून यापूर्वीच (पान १ वरून) गोव्याच्या क्रीडा क्षेत्रातून साशंकता व्यक्त होत होती. त्यात आता आणखी भर पडली.  येत्या ३० मार्च ते १४ एप्रिल दरम्यान राज्यात ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होईल, असे निश्चित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी तांत्रिक समिती, आयोजन समिती आणि संघटनांचे संचालक कामालाही लागले होते. साधनसुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.  विविध क्रीडा प्रकारांच्या खेळाडूंच्या निवड चाचणी घेण्यात आल्या. विविध विभागांची एकत्रितपणे बैठक घेऊन अहवालही तयार करण्यात आले होते. गेल्या महिन्यात भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या बैठकीत स्पर्धेचे सादरीकरण झाले होते. त्यात स्पर्धेचे संयुक्त सचिव व्ही. एम. प्रभुदेसाई यांनी मार्चपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही आयओएला दिले होते. आता आयओएकडे राज्य सरकारने पुन्हा समस्यांचा पाढा वाचला आहे. विविध क्रीडा प्रकारांसाठी ग्लोबल निविदा काढण्याचे आदेशही सरकारकडून देण्यात आले होते. त्यामुळे कुठल्याही स्थितीत ही स्पर्धा नियमित वेळेवर होईल, असे वाटत होते. मात्र, बुधवारी (दि.९) राज्य सरकारने केंद्राला पत्र लिहून क्रीडा क्षेत्राला जबर धक्का दिला. यासंदर्भात, एका अधिकाºयाने स्पष्ट केले की, आगामी निवडणुकीच्या काळातच ही स्पर्धा आहे. त्यामुळे या काळात निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. सुरक्षेचाही मुद्दा आहे. मनुष्यबळही अधिक लागते तसेच याच काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षासुद्धा आहेत. स्पर्धेसाठी स्वयंसेवकही मिळणार नाहीत. या सर्व समस्या एकाच वेळी आल्या आहेत. सरकारपुढेही पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी आणखी वेळ देण्यात यावा, अशी विनंती केंद्र सरकार आणि भारतीय आॅलिम्पिक संघटनेकडे करण्यात आली आहे. यजमानांची तारीख पे तारीख....राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी २००८ मध्ये गोव्याचे नाव पहिल्यांदाच पुढे आले होते. त्या वेळी गोव्याने ही स्पर्धा आयोजित करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यानंतर २०११ मध्ये स्पर्धेचे अधिकृत यजमानपद गोव्याला मिळाले. २०११ नंतर पुन्हा २०१५ साठी गोवा चर्चेत आला होता. मात्र त्या वेळी ही स्पर्धा केरळ येथे हलविण्यात आली. २०१७ पासून या स्पर्धेच्या आयोजनावरून गोवा चर्चेत आहे. भारतीय आॅलिम्पिक संघटनेने गोव्याच्या आयोजनाच्या तयारीवरून प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. २ ते १७ फेब्रुवारी २०१९ ही तारीख निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पर्धेसाठी आणखी वेळ द्या. आम्ही तयारी पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर गोव्याला ३० मार्च ते १४ एप्रिल अशी नवी तारीख देण्यात आली होती.बोधचिन्ह अनावरणाला मुहूर्त मिळेना...स्पर्धेचे बोधचिन्ह म्हणून निवडण्यात आलेल्या ‘रुबीगुला’चे अनावरणही दोन वेळा लांबणीवर टाकण्यात आले होते. या बोधचिन्हाच्या अनावरणाची २० डिसेंबर ही पहिली तारीख निश्चित झाली होती. त्यानंतर ती जानेवारीत ढकलण्यात आली. जानेवारीचा दुसरा आठवडा संपत येत असूनही बोधचिन्ह अनावरणासाठी सरकारला मुहूर्त मिळाला नाही.

टॅग्स :goaगोवा