शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राष्ट्रीय खो-खो : महाराष्ट्राला दुहेरी मुकूट; प्रतीक, काजल सर्वोत्तम खेळाडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 15:30 IST

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी शानदार विजय संपादन करताना दुहेरी मुकूटाला गवसणी घातली.

जयपूर : भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने व राजस्थान खो खो असोसिएशन आयोजित ५२ वी पुरुष–महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा जयपूर येथे संपन्न झाली असून महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी शानदार विजय संपादन करताना दुहेरी मुकूटाला गवसणी घातली. या स्पर्धेत पुरुषांचे व महिलांचे सर्वोच्च पुरस्कार मिळवताना महाराष्ट्रातील पुण्याच्या प्रतीक वाईरकरने एकलव्य तर काजल भोरने राणी लक्ष्मी पुरस्कार मिळवला. दोन्ही विजेत्या संघांना भारतीय खो-खो महासंघाने प्रत्येकी दोन-दोन लाख रुपये घोषित केले आहेत, तर प्रशिक्षकांना प्रत्येकी 50- 50 हजार रुपये घोषित केले आहेत असे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव संदिप तावडे यांनी कळवले आहे.  

पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र विरुध्द भारतीय रेल्वे हा सामना अतिशय रंगतदार झाला. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यावर जादा डावात महाराष्ट्राने हा सामना २१-२० (८-७, ६-७ व ७-६) अतिशय चुरशीच्या सामन्यात एका गुणाने विजय साजरा केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या प्रतीक वाईरकरने एकलव्य पुरस्कार मिळवताना १:२०, १:३० व १:४० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, महेश शिंदेने १:५०, १:४० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला, दिपक मानेने १:१०, १:३०, १:१० मि. संरक्षण करत तीन गडी बाद केले व अनिकेत पोटेने ५ गडी बाद करताना (जादा डवात ३ गडी) सर्वोत्कृष्ट आक्रमकचा पुरस्कार मिळवला. तर रेल्वेच्या अमित पाटिलने सर्वोत्कृष्ट संरक्षकाचा पुरस्कार मिळवताना १:१०, १:३० व १:३० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले, विजय हजारेने १:००, १:४० व १:२० मि. संरक्षण केले व दिपक माधवने १:४०, १:४० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला. मात्र रेल्वेची डाळ काही महाराष्ट्रा समोर शिजू शकली नाही.  

महिलांमध्ये महाराष्ट्र विरुध्द भारतीय विमानतळ प्राधिकरण हा सामना सुध्दा अतिशय रंगतदार झाला. या सामन्यात महाराष्ट्राने भारतीय विमानतळ प्राधिकरणचा १३-१२ (४-४, ४-४, ५-४) असा अतिशय चुरशीच्या सामन्यात एका गुणाने विजय संपादन केला. महाराष्ट्राच्या प्रियंका भोपीने २:२०, १:२०, ३:०० मी. संरक्षण केले, अपेक्षा सुतारने २:३५, २:००, २:२० मी. संरक्षण केले व एक बळी मिळवला, काजल भोरने १:३०, नाबाद १:१० मी. संरक्षण केले व तीन बळी मिळवले, सारिका काळेने १:३५, २:२०, १:३० मी. संरक्षण केले व एक बळी मिळवला, प्रियंका इंगळेने ४ बळी मिळवले. तर भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या ऐश्वर्या सावंतने २:५०, २:३५, १:२० मी. संरक्षण केले, पौर्णिमा सकपाळ २:२०, १:२०, २:३० मी. संरक्षण केले व एक बळी मिळवला व एम. वीणाने १:००, १:५५, २:३० मी. संरक्षण केले. तरी अखेरच्या क्षणी महाराष्ट्राने विजयश्री खेचून आणली.

टॅग्स :Kho-Khoखो-खोMaharashtraमहाराष्ट्र