शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

राष्ट्रीय खो-खो : महाराष्ट्राला दुहेरी मुकूट; प्रतीक, काजल सर्वोत्तम खेळाडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 15:30 IST

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी शानदार विजय संपादन करताना दुहेरी मुकूटाला गवसणी घातली.

जयपूर : भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने व राजस्थान खो खो असोसिएशन आयोजित ५२ वी पुरुष–महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा जयपूर येथे संपन्न झाली असून महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी शानदार विजय संपादन करताना दुहेरी मुकूटाला गवसणी घातली. या स्पर्धेत पुरुषांचे व महिलांचे सर्वोच्च पुरस्कार मिळवताना महाराष्ट्रातील पुण्याच्या प्रतीक वाईरकरने एकलव्य तर काजल भोरने राणी लक्ष्मी पुरस्कार मिळवला. दोन्ही विजेत्या संघांना भारतीय खो-खो महासंघाने प्रत्येकी दोन-दोन लाख रुपये घोषित केले आहेत, तर प्रशिक्षकांना प्रत्येकी 50- 50 हजार रुपये घोषित केले आहेत असे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव संदिप तावडे यांनी कळवले आहे.  

पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र विरुध्द भारतीय रेल्वे हा सामना अतिशय रंगतदार झाला. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यावर जादा डावात महाराष्ट्राने हा सामना २१-२० (८-७, ६-७ व ७-६) अतिशय चुरशीच्या सामन्यात एका गुणाने विजय साजरा केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या प्रतीक वाईरकरने एकलव्य पुरस्कार मिळवताना १:२०, १:३० व १:४० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, महेश शिंदेने १:५०, १:४० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला, दिपक मानेने १:१०, १:३०, १:१० मि. संरक्षण करत तीन गडी बाद केले व अनिकेत पोटेने ५ गडी बाद करताना (जादा डवात ३ गडी) सर्वोत्कृष्ट आक्रमकचा पुरस्कार मिळवला. तर रेल्वेच्या अमित पाटिलने सर्वोत्कृष्ट संरक्षकाचा पुरस्कार मिळवताना १:१०, १:३० व १:३० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले, विजय हजारेने १:००, १:४० व १:२० मि. संरक्षण केले व दिपक माधवने १:४०, १:४० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला. मात्र रेल्वेची डाळ काही महाराष्ट्रा समोर शिजू शकली नाही.  

महिलांमध्ये महाराष्ट्र विरुध्द भारतीय विमानतळ प्राधिकरण हा सामना सुध्दा अतिशय रंगतदार झाला. या सामन्यात महाराष्ट्राने भारतीय विमानतळ प्राधिकरणचा १३-१२ (४-४, ४-४, ५-४) असा अतिशय चुरशीच्या सामन्यात एका गुणाने विजय संपादन केला. महाराष्ट्राच्या प्रियंका भोपीने २:२०, १:२०, ३:०० मी. संरक्षण केले, अपेक्षा सुतारने २:३५, २:००, २:२० मी. संरक्षण केले व एक बळी मिळवला, काजल भोरने १:३०, नाबाद १:१० मी. संरक्षण केले व तीन बळी मिळवले, सारिका काळेने १:३५, २:२०, १:३० मी. संरक्षण केले व एक बळी मिळवला, प्रियंका इंगळेने ४ बळी मिळवले. तर भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या ऐश्वर्या सावंतने २:५०, २:३५, १:२० मी. संरक्षण केले, पौर्णिमा सकपाळ २:२०, १:२०, २:३० मी. संरक्षण केले व एक बळी मिळवला व एम. वीणाने १:००, १:५५, २:३० मी. संरक्षण केले. तरी अखेरच्या क्षणी महाराष्ट्राने विजयश्री खेचून आणली.

टॅग्स :Kho-Khoखो-खोMaharashtraमहाराष्ट्र