शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राष्ट्रीय खो-खो : महाराष्ट्राला दुहेरी मुकूट; प्रतीक, काजल सर्वोत्तम खेळाडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 15:30 IST

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी शानदार विजय संपादन करताना दुहेरी मुकूटाला गवसणी घातली.

जयपूर : भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने व राजस्थान खो खो असोसिएशन आयोजित ५२ वी पुरुष–महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा जयपूर येथे संपन्न झाली असून महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी शानदार विजय संपादन करताना दुहेरी मुकूटाला गवसणी घातली. या स्पर्धेत पुरुषांचे व महिलांचे सर्वोच्च पुरस्कार मिळवताना महाराष्ट्रातील पुण्याच्या प्रतीक वाईरकरने एकलव्य तर काजल भोरने राणी लक्ष्मी पुरस्कार मिळवला. दोन्ही विजेत्या संघांना भारतीय खो-खो महासंघाने प्रत्येकी दोन-दोन लाख रुपये घोषित केले आहेत, तर प्रशिक्षकांना प्रत्येकी 50- 50 हजार रुपये घोषित केले आहेत असे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव संदिप तावडे यांनी कळवले आहे.  

पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र विरुध्द भारतीय रेल्वे हा सामना अतिशय रंगतदार झाला. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यावर जादा डावात महाराष्ट्राने हा सामना २१-२० (८-७, ६-७ व ७-६) अतिशय चुरशीच्या सामन्यात एका गुणाने विजय साजरा केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या प्रतीक वाईरकरने एकलव्य पुरस्कार मिळवताना १:२०, १:३० व १:४० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, महेश शिंदेने १:५०, १:४० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला, दिपक मानेने १:१०, १:३०, १:१० मि. संरक्षण करत तीन गडी बाद केले व अनिकेत पोटेने ५ गडी बाद करताना (जादा डवात ३ गडी) सर्वोत्कृष्ट आक्रमकचा पुरस्कार मिळवला. तर रेल्वेच्या अमित पाटिलने सर्वोत्कृष्ट संरक्षकाचा पुरस्कार मिळवताना १:१०, १:३० व १:३० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले, विजय हजारेने १:००, १:४० व १:२० मि. संरक्षण केले व दिपक माधवने १:४०, १:४० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला. मात्र रेल्वेची डाळ काही महाराष्ट्रा समोर शिजू शकली नाही.  

महिलांमध्ये महाराष्ट्र विरुध्द भारतीय विमानतळ प्राधिकरण हा सामना सुध्दा अतिशय रंगतदार झाला. या सामन्यात महाराष्ट्राने भारतीय विमानतळ प्राधिकरणचा १३-१२ (४-४, ४-४, ५-४) असा अतिशय चुरशीच्या सामन्यात एका गुणाने विजय संपादन केला. महाराष्ट्राच्या प्रियंका भोपीने २:२०, १:२०, ३:०० मी. संरक्षण केले, अपेक्षा सुतारने २:३५, २:००, २:२० मी. संरक्षण केले व एक बळी मिळवला, काजल भोरने १:३०, नाबाद १:१० मी. संरक्षण केले व तीन बळी मिळवले, सारिका काळेने १:३५, २:२०, १:३० मी. संरक्षण केले व एक बळी मिळवला, प्रियंका इंगळेने ४ बळी मिळवले. तर भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या ऐश्वर्या सावंतने २:५०, २:३५, १:२० मी. संरक्षण केले, पौर्णिमा सकपाळ २:२०, १:२०, २:३० मी. संरक्षण केले व एक बळी मिळवला व एम. वीणाने १:००, १:५५, २:३० मी. संरक्षण केले. तरी अखेरच्या क्षणी महाराष्ट्राने विजयश्री खेचून आणली.

टॅग्स :Kho-Khoखो-खोMaharashtraमहाराष्ट्र