शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

नरसिंग प्रकरण : साई, नाडाच्या अधिकाऱ्यांचा कटात सहभाग!

By admin | Updated: August 23, 2016 21:29 IST

मल्ल नरसिंग यादव याला भक्कम पाठिंबा देणाऱ्या भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय)मंगळवारी नवा आरोप केला.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २३ : मल्ल नरसिंग यादव याला भक्कम पाठिंबा देणाऱ्या भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय)मंगळवारी नवा आरोप केला. नरसिंगच्या डोपिंग कटकारस्थानात भारतीय क्रीडा प्राधिकरण(साई)तसेच राष्ट्रीय डोपिंगविरोधीसंस्थेचे(नाडा)काही अधिकारी गुंतले असल्याचे डब्ल्यूएफआय म्हटले आहे.

क्रीडा लवादाने नरसिंगवर चार वर्षांची बंदी घातली. त्यामुळे रिओ आॅलिम्पिकच्या ७५ किलो फ्री स्टाईल प्रकारात तो खेळू शकला नाही. नाडाने नरसिंगला क्लीन चिट दिल्यानंतर वाडाने(विश्व डोपिंविरोधी संस्था) आक्षेप घेत निर्णयाला आव्हान दिले. त्यानंतर लवादाने नरसिंगच्या विरोधात निर्णय दिला.

डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष बृजभूषणसिंग म्हणाले,आम्हाला रिओमध्ये लवादापुढे सुनावणीच्यावेळी काही नव्या गोष्टी कळल्या. नरसिंगची चाचणी इतक्या कमी वेळेत का करण्यात आली, अशी विचारणा वाडाने करताच नाडाने सांगितले की, साईच्या सोनिपत केंद्रातील ज्युनियर अधिकारी रमेश यांनी आमच्याकडे केंद्रातील काही खेळाडू प्रतिबंधित औषध घेत असल्याची लेखी तक्रार केली होती. याच तक्रारीच्या आधारे पुन्हा डोप परीक्षण झाले.

ज्या लोकांनी २५ जून रोजी झालेल्या पहिल्या चाचणीआधी नरसिंगच्या जेवणात उत्तेजक मिसळले त्यांनीच पुन्हा एकदा हे काळे कृत्य केल्यानंतर रमेश यांनी नाडाकडे तक्रार पत्र पाठविले होते. नरसिंगच्या लघवीचा नमुना २७ जूनला घेण्यातआला, त्यात प्रतिबंधित पदार्थ आढळला होता. नाडाचे ज्युनियर अधिकारी यात सामील असावेत, असा माझा अंदाज आहे.बृजभूषण पुढे म्हणाले,ह्य डब्ल्यूएफआयला आधी या तक्रारीची माहिती देण्यात आली नव्हती. रिओमध्ये आमच्याकडे हे पत्र असते तर आमची बाजू भक्कम ठरली असती. नाडाने देखील अशा पत्राची माहिती दिली नसल्याने माझा संशय वाढला.

या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे मी मागणी करणार आहे. नरसिंग दोषी असेल तर त्यालाही कठोर शिक्षा व्हावी, अशी आपली भूमिका आहे. हा मोठा कट असल्याच्या भूमिकेवर ठाम असलेले बृजभूषण म्हणाले, मी सुनावणीच्यावेळी उपस्थित होतो. कॅसच्या तज्ज्ञाने नरसिंगने टॅबलेट घेतल्याचा दावा केला पण त्यादृष्टीने पुरावे दिले नाहीत. सोनिपत पोलिसांनी गुन्हे नोंदविण्यात आणि आरोपींना शोधण्यात हयगय केल्यामुळे नरसिंगवर चार वर्षांची बंदी लागली. पोलिसांनी काहीच केले नाही. आजपर्यंत गुन्हेगार बाहेर आहेत, यासाठी पोलीस जबाबदार असल्याचा बृजभूषण यांनीपुनरुच्चार केला.