शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईमधील शूटिंग रेंज ‘थर्ड क्लास’ दर्जाच्या आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 04:22 IST

४ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला नेमबाजांकडून पदकांची सर्वाधिक आशा आहे. यासाठी भारतीय नेमबाजांनी कंबर कसली आहे.

मुंबई : ४ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला नेमबाजांकडून पदकांची सर्वाधिक आशा आहे. यासाठी भारतीय नेमबाजांनी कंबर कसली आहे. एकेकाळी भारतीय नेमबाजीमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व होते, पण सध्या हे चित्र बदलले आहे. यासाठी जागतिक क्रमवारीत अव्वल राहिलेली माजी नेमबाज अंजली भागवतने महाराष्ट्रात सोयी-सुविधांचा असलेला अभाव कारणीभूत असल्याचे म्हटले. तसेच, ‘मुंबईतील शूटिंग रेंज ‘थर्ड क्लास’ आहे,’ असे स्पष्ट मतही अंजलीने मांडले.राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘रंग दे तिरंगा’ कार्यक्रमादरम्यान अंजलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार वीरेन रस्कीन्हा आणि भारताची माजी दिग्गज बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट यांचीही उपस्थिती होती. बुधवारीच ‘कॅग’ अहवालाने महाराष्ट्र सरकारला क्रीडा सोयी-सुविधांबाबत फटकारल्यानंतर दिग्गज नेमबाज अंजलीनेही महाराष्ट्रातील क्रीडा सोयी-सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. अंजली म्हणाली की, ‘इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याला मिळणाऱ्या सुविधा पाहिल्या, तर निराशा होते. सोयी-सुविधांच्या असलेल्या अभावामुळे आपण मागे पडतोय. खेळाडूंना चांगल्या दर्जाचे साहित्य मिळणे आवश्यक आहे. मुंबईची शूटिंग रेंज ही थर्ड क्लास आहे. पुण्याची रेंज आंतरराष्ट्रीय दर्जाची नक्की आहे, पण तिथे एकही टार्गेट योग्य प्रकारे काम करत नाही. जर एखाद्यावेळी मी १०.९ गुणांचा वेध घेतला, तरी त्या कामगिरीचा मला विश्वास नसतो. हा नेम नक्की मी साधला की मशीन दाखवतेय, असा प्रश्न पडतो. त्यामुळे या सुविधा सुधारणे सर्वांत महत्त्वाचे आहे.’ त्याचप्रमाणे, ‘सोयी-सुविधांमध्ये असलेल्या अभावानंतरही महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या प्रदर्शनावर मी खूश आहे. त्यांना पाठिंबा देणे गरजेचे असून चांगल्या सोयी उपलब्ध नसतानाही ते चमकदार ठरत आहेत,’ असेही अंजलीने या वेळी म्हटले.राष्ट्रकुल स्पर्धेतील भारतीयांच्या संभाव्य कामगिरीविषयी अंजली म्हणाली की, ‘स्पर्धेत नक्कीच भारतीय संघ मजबूत आहे. आपले खेळाडू केवळ पदक जिंकत नाहीत, तर शानदार कामगिरीही करीत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडू असे अप्रतिम मिश्रण आहे. आज युवा खेळाडू आपल्याहून वरिष्ठ असलेल्यांना कडवी स्पर्धा देत आहेत. ही भारतासाठी खूप चांगली बाब आहे. शिवाय आगामी आशियाई स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक असून त्यासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत चमक दाखविणे गरजेचे आहे. राष्ट्रकुलमध्ये नक्कीच आपले नेमबाज पदक जिंकतील.’भारताच्या पुरुष व महिला संघांमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची नक्कीच क्षमता आहे, मात्र यासाठी त्यांना आॅस्टेÑलियाचे तगडे आव्हान मोडावे लागेल. आॅस्टेÑलिया नक्कीच संभाव्य विजेते आहेत. मला महिला संघाकडून जास्त अपेक्षा आहेत. आशियाई अजिंक्यपद पटकावल्यानंतर ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तरी त्यांना आॅस्टेÑलियाई आणि युरोपियन देशांविरुद्ध खेळण्याचा अनुभव नाही. या गोष्टीकडे त्यांना लक्ष द्यावे लागेल. - वीरेन रस्कीन्हामी १९९८ साली पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाली होती. त्या वेळी भारतीय संघ ‘अंडरडॉग’ मानला जात होता. पण आज भारतीयांना पदकाचा दावेदार मानले जात आहे. हा बदल खूप रोमांचक आहे. यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये केवळ एकेरीच नाही, तर दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही भारतीय पदकाचे दावेदार आहेत. त्यामुळे भारतीय संघ अत्यंत मजबूत दिसत आहे. - अपर्णा पोपट