शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मुंबईमधील शूटिंग रेंज ‘थर्ड क्लास’ दर्जाच्या आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 04:22 IST

४ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला नेमबाजांकडून पदकांची सर्वाधिक आशा आहे. यासाठी भारतीय नेमबाजांनी कंबर कसली आहे.

मुंबई : ४ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला नेमबाजांकडून पदकांची सर्वाधिक आशा आहे. यासाठी भारतीय नेमबाजांनी कंबर कसली आहे. एकेकाळी भारतीय नेमबाजीमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व होते, पण सध्या हे चित्र बदलले आहे. यासाठी जागतिक क्रमवारीत अव्वल राहिलेली माजी नेमबाज अंजली भागवतने महाराष्ट्रात सोयी-सुविधांचा असलेला अभाव कारणीभूत असल्याचे म्हटले. तसेच, ‘मुंबईतील शूटिंग रेंज ‘थर्ड क्लास’ आहे,’ असे स्पष्ट मतही अंजलीने मांडले.राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘रंग दे तिरंगा’ कार्यक्रमादरम्यान अंजलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार वीरेन रस्कीन्हा आणि भारताची माजी दिग्गज बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट यांचीही उपस्थिती होती. बुधवारीच ‘कॅग’ अहवालाने महाराष्ट्र सरकारला क्रीडा सोयी-सुविधांबाबत फटकारल्यानंतर दिग्गज नेमबाज अंजलीनेही महाराष्ट्रातील क्रीडा सोयी-सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. अंजली म्हणाली की, ‘इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याला मिळणाऱ्या सुविधा पाहिल्या, तर निराशा होते. सोयी-सुविधांच्या असलेल्या अभावामुळे आपण मागे पडतोय. खेळाडूंना चांगल्या दर्जाचे साहित्य मिळणे आवश्यक आहे. मुंबईची शूटिंग रेंज ही थर्ड क्लास आहे. पुण्याची रेंज आंतरराष्ट्रीय दर्जाची नक्की आहे, पण तिथे एकही टार्गेट योग्य प्रकारे काम करत नाही. जर एखाद्यावेळी मी १०.९ गुणांचा वेध घेतला, तरी त्या कामगिरीचा मला विश्वास नसतो. हा नेम नक्की मी साधला की मशीन दाखवतेय, असा प्रश्न पडतो. त्यामुळे या सुविधा सुधारणे सर्वांत महत्त्वाचे आहे.’ त्याचप्रमाणे, ‘सोयी-सुविधांमध्ये असलेल्या अभावानंतरही महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या प्रदर्शनावर मी खूश आहे. त्यांना पाठिंबा देणे गरजेचे असून चांगल्या सोयी उपलब्ध नसतानाही ते चमकदार ठरत आहेत,’ असेही अंजलीने या वेळी म्हटले.राष्ट्रकुल स्पर्धेतील भारतीयांच्या संभाव्य कामगिरीविषयी अंजली म्हणाली की, ‘स्पर्धेत नक्कीच भारतीय संघ मजबूत आहे. आपले खेळाडू केवळ पदक जिंकत नाहीत, तर शानदार कामगिरीही करीत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडू असे अप्रतिम मिश्रण आहे. आज युवा खेळाडू आपल्याहून वरिष्ठ असलेल्यांना कडवी स्पर्धा देत आहेत. ही भारतासाठी खूप चांगली बाब आहे. शिवाय आगामी आशियाई स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक असून त्यासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत चमक दाखविणे गरजेचे आहे. राष्ट्रकुलमध्ये नक्कीच आपले नेमबाज पदक जिंकतील.’भारताच्या पुरुष व महिला संघांमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची नक्कीच क्षमता आहे, मात्र यासाठी त्यांना आॅस्टेÑलियाचे तगडे आव्हान मोडावे लागेल. आॅस्टेÑलिया नक्कीच संभाव्य विजेते आहेत. मला महिला संघाकडून जास्त अपेक्षा आहेत. आशियाई अजिंक्यपद पटकावल्यानंतर ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तरी त्यांना आॅस्टेÑलियाई आणि युरोपियन देशांविरुद्ध खेळण्याचा अनुभव नाही. या गोष्टीकडे त्यांना लक्ष द्यावे लागेल. - वीरेन रस्कीन्हामी १९९८ साली पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाली होती. त्या वेळी भारतीय संघ ‘अंडरडॉग’ मानला जात होता. पण आज भारतीयांना पदकाचा दावेदार मानले जात आहे. हा बदल खूप रोमांचक आहे. यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये केवळ एकेरीच नाही, तर दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही भारतीय पदकाचे दावेदार आहेत. त्यामुळे भारतीय संघ अत्यंत मजबूत दिसत आहे. - अपर्णा पोपट