शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईमधील शूटिंग रेंज ‘थर्ड क्लास’ दर्जाच्या आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 04:22 IST

४ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला नेमबाजांकडून पदकांची सर्वाधिक आशा आहे. यासाठी भारतीय नेमबाजांनी कंबर कसली आहे.

मुंबई : ४ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला नेमबाजांकडून पदकांची सर्वाधिक आशा आहे. यासाठी भारतीय नेमबाजांनी कंबर कसली आहे. एकेकाळी भारतीय नेमबाजीमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व होते, पण सध्या हे चित्र बदलले आहे. यासाठी जागतिक क्रमवारीत अव्वल राहिलेली माजी नेमबाज अंजली भागवतने महाराष्ट्रात सोयी-सुविधांचा असलेला अभाव कारणीभूत असल्याचे म्हटले. तसेच, ‘मुंबईतील शूटिंग रेंज ‘थर्ड क्लास’ आहे,’ असे स्पष्ट मतही अंजलीने मांडले.राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘रंग दे तिरंगा’ कार्यक्रमादरम्यान अंजलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार वीरेन रस्कीन्हा आणि भारताची माजी दिग्गज बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट यांचीही उपस्थिती होती. बुधवारीच ‘कॅग’ अहवालाने महाराष्ट्र सरकारला क्रीडा सोयी-सुविधांबाबत फटकारल्यानंतर दिग्गज नेमबाज अंजलीनेही महाराष्ट्रातील क्रीडा सोयी-सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. अंजली म्हणाली की, ‘इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याला मिळणाऱ्या सुविधा पाहिल्या, तर निराशा होते. सोयी-सुविधांच्या असलेल्या अभावामुळे आपण मागे पडतोय. खेळाडूंना चांगल्या दर्जाचे साहित्य मिळणे आवश्यक आहे. मुंबईची शूटिंग रेंज ही थर्ड क्लास आहे. पुण्याची रेंज आंतरराष्ट्रीय दर्जाची नक्की आहे, पण तिथे एकही टार्गेट योग्य प्रकारे काम करत नाही. जर एखाद्यावेळी मी १०.९ गुणांचा वेध घेतला, तरी त्या कामगिरीचा मला विश्वास नसतो. हा नेम नक्की मी साधला की मशीन दाखवतेय, असा प्रश्न पडतो. त्यामुळे या सुविधा सुधारणे सर्वांत महत्त्वाचे आहे.’ त्याचप्रमाणे, ‘सोयी-सुविधांमध्ये असलेल्या अभावानंतरही महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या प्रदर्शनावर मी खूश आहे. त्यांना पाठिंबा देणे गरजेचे असून चांगल्या सोयी उपलब्ध नसतानाही ते चमकदार ठरत आहेत,’ असेही अंजलीने या वेळी म्हटले.राष्ट्रकुल स्पर्धेतील भारतीयांच्या संभाव्य कामगिरीविषयी अंजली म्हणाली की, ‘स्पर्धेत नक्कीच भारतीय संघ मजबूत आहे. आपले खेळाडू केवळ पदक जिंकत नाहीत, तर शानदार कामगिरीही करीत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडू असे अप्रतिम मिश्रण आहे. आज युवा खेळाडू आपल्याहून वरिष्ठ असलेल्यांना कडवी स्पर्धा देत आहेत. ही भारतासाठी खूप चांगली बाब आहे. शिवाय आगामी आशियाई स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक असून त्यासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत चमक दाखविणे गरजेचे आहे. राष्ट्रकुलमध्ये नक्कीच आपले नेमबाज पदक जिंकतील.’भारताच्या पुरुष व महिला संघांमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची नक्कीच क्षमता आहे, मात्र यासाठी त्यांना आॅस्टेÑलियाचे तगडे आव्हान मोडावे लागेल. आॅस्टेÑलिया नक्कीच संभाव्य विजेते आहेत. मला महिला संघाकडून जास्त अपेक्षा आहेत. आशियाई अजिंक्यपद पटकावल्यानंतर ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तरी त्यांना आॅस्टेÑलियाई आणि युरोपियन देशांविरुद्ध खेळण्याचा अनुभव नाही. या गोष्टीकडे त्यांना लक्ष द्यावे लागेल. - वीरेन रस्कीन्हामी १९९८ साली पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाली होती. त्या वेळी भारतीय संघ ‘अंडरडॉग’ मानला जात होता. पण आज भारतीयांना पदकाचा दावेदार मानले जात आहे. हा बदल खूप रोमांचक आहे. यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये केवळ एकेरीच नाही, तर दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही भारतीय पदकाचे दावेदार आहेत. त्यामुळे भारतीय संघ अत्यंत मजबूत दिसत आहे. - अपर्णा पोपट