शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

मुंबईमधील शूटिंग रेंज ‘थर्ड क्लास’ दर्जाच्या आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 04:22 IST

४ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला नेमबाजांकडून पदकांची सर्वाधिक आशा आहे. यासाठी भारतीय नेमबाजांनी कंबर कसली आहे.

मुंबई : ४ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला नेमबाजांकडून पदकांची सर्वाधिक आशा आहे. यासाठी भारतीय नेमबाजांनी कंबर कसली आहे. एकेकाळी भारतीय नेमबाजीमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व होते, पण सध्या हे चित्र बदलले आहे. यासाठी जागतिक क्रमवारीत अव्वल राहिलेली माजी नेमबाज अंजली भागवतने महाराष्ट्रात सोयी-सुविधांचा असलेला अभाव कारणीभूत असल्याचे म्हटले. तसेच, ‘मुंबईतील शूटिंग रेंज ‘थर्ड क्लास’ आहे,’ असे स्पष्ट मतही अंजलीने मांडले.राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘रंग दे तिरंगा’ कार्यक्रमादरम्यान अंजलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार वीरेन रस्कीन्हा आणि भारताची माजी दिग्गज बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट यांचीही उपस्थिती होती. बुधवारीच ‘कॅग’ अहवालाने महाराष्ट्र सरकारला क्रीडा सोयी-सुविधांबाबत फटकारल्यानंतर दिग्गज नेमबाज अंजलीनेही महाराष्ट्रातील क्रीडा सोयी-सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. अंजली म्हणाली की, ‘इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याला मिळणाऱ्या सुविधा पाहिल्या, तर निराशा होते. सोयी-सुविधांच्या असलेल्या अभावामुळे आपण मागे पडतोय. खेळाडूंना चांगल्या दर्जाचे साहित्य मिळणे आवश्यक आहे. मुंबईची शूटिंग रेंज ही थर्ड क्लास आहे. पुण्याची रेंज आंतरराष्ट्रीय दर्जाची नक्की आहे, पण तिथे एकही टार्गेट योग्य प्रकारे काम करत नाही. जर एखाद्यावेळी मी १०.९ गुणांचा वेध घेतला, तरी त्या कामगिरीचा मला विश्वास नसतो. हा नेम नक्की मी साधला की मशीन दाखवतेय, असा प्रश्न पडतो. त्यामुळे या सुविधा सुधारणे सर्वांत महत्त्वाचे आहे.’ त्याचप्रमाणे, ‘सोयी-सुविधांमध्ये असलेल्या अभावानंतरही महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या प्रदर्शनावर मी खूश आहे. त्यांना पाठिंबा देणे गरजेचे असून चांगल्या सोयी उपलब्ध नसतानाही ते चमकदार ठरत आहेत,’ असेही अंजलीने या वेळी म्हटले.राष्ट्रकुल स्पर्धेतील भारतीयांच्या संभाव्य कामगिरीविषयी अंजली म्हणाली की, ‘स्पर्धेत नक्कीच भारतीय संघ मजबूत आहे. आपले खेळाडू केवळ पदक जिंकत नाहीत, तर शानदार कामगिरीही करीत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडू असे अप्रतिम मिश्रण आहे. आज युवा खेळाडू आपल्याहून वरिष्ठ असलेल्यांना कडवी स्पर्धा देत आहेत. ही भारतासाठी खूप चांगली बाब आहे. शिवाय आगामी आशियाई स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक असून त्यासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत चमक दाखविणे गरजेचे आहे. राष्ट्रकुलमध्ये नक्कीच आपले नेमबाज पदक जिंकतील.’भारताच्या पुरुष व महिला संघांमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची नक्कीच क्षमता आहे, मात्र यासाठी त्यांना आॅस्टेÑलियाचे तगडे आव्हान मोडावे लागेल. आॅस्टेÑलिया नक्कीच संभाव्य विजेते आहेत. मला महिला संघाकडून जास्त अपेक्षा आहेत. आशियाई अजिंक्यपद पटकावल्यानंतर ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तरी त्यांना आॅस्टेÑलियाई आणि युरोपियन देशांविरुद्ध खेळण्याचा अनुभव नाही. या गोष्टीकडे त्यांना लक्ष द्यावे लागेल. - वीरेन रस्कीन्हामी १९९८ साली पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाली होती. त्या वेळी भारतीय संघ ‘अंडरडॉग’ मानला जात होता. पण आज भारतीयांना पदकाचा दावेदार मानले जात आहे. हा बदल खूप रोमांचक आहे. यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये केवळ एकेरीच नाही, तर दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही भारतीय पदकाचे दावेदार आहेत. त्यामुळे भारतीय संघ अत्यंत मजबूत दिसत आहे. - अपर्णा पोपट