शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मुंबईचा दुसरा डाव ढेपाळला

By admin | Updated: March 10, 2016 02:36 IST

जयंत यादव आणि जयदेव उनाडकट यांच्या अचूक माऱ्यापुढे इराणी ट्रॉफी समान्यात, शेष भारतविरुद्ध मुंबईचा दुसरा डाव केवळ १८२ धावांत संपुष्टात आला. मात्र, पहिल्या डावात घेतलेल्या २९७ धावांच्या

मुंबई : जयंत यादव आणि जयदेव उनाडकट यांच्या अचूक माऱ्यापुढे इराणी ट्रॉफी समान्यात, शेष भारतविरुद्ध मुंबईचा दुसरा डाव केवळ १८२ धावांत संपुष्टात आला. मात्र, पहिल्या डावात घेतलेल्या २९७ धावांच्या आघाडीच्या जोरावर मुंबईकरांनी शेष भारतसमोर विजयासाठी ४८० धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. शेष भारतनेही दुसऱ्या डावाची भक्कम सुरुवात करताना, चौथ्या दिवसाअखेर १ बाद १०० अशी मजल मारली. अजूनही शेष भारताला विजयासाठी ३८० धावांची आवश्यकता आहे.ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या डावात घेतलेल्या मजबूत आघाडीनंतर, फलंदाजीला उतरलेल्या मुंबईचा डाव शेष भारतच्या अचूक माऱ्यापुढे ढेपाळला. सिद्धेश लाडने मध्यल्या फळीत खेळताना झुंजार ६० धावांची खेळी केल्याने मुंबईला दीडशेची मजल मारता आली. त्याने १०९ चेंडूंत ६ चौकार व एक षटकार खेचला. त्याच वेळी सूर्यकुमार यादवनेही त्याला चांगली साथ देताना, ७६ चेंडूत ७ चौकारांसह ४९ धावा फटकावल्या. त्याचे अर्धशतक केवळ एका धावेने हुकले.४ बाद ६२ अशा प्रतिकूल परिस्थितीतून संघाला सावरताना सूर्यकुमार व लाड यांनी पाचव्या गड्यासाठी ५४ धावांची भागीदारी केली. जयंत यादवने सूर्यकुमारला बाद करून ही जोडी फोडली आणि पुढील ६६ धावांत मुंबईचा डाव संपुष्टात आणण्यात शेष भारत यशस्वी ठरला. जयंत यादवने टिच्चून मारा करताना ९३ धावांत ४ बळी घेतले, तर जयदेव उनाडकटने १६ धावांत ३ बळी मिळवले. यानंतर शेष भारतने सावध सुरुवात केली. फैझ फझल आणि श्रीकर भरत यांनी संघाला अर्धशतकी सलामी देताना ६६ धावांची भागीदारी केली. इक्बाल अब्दुल्लाने भरतला (४२) बाद करून मुंबईला पहिले यश मिळवून दिले. मात्र, यानंतर सुदीप चॅटर्जीने फझलला अखेरपर्यंत साथ देताना, मुंबईकरांना आणखी यश मिळवू दिले नाही. फझल ४१ धावांवर तर चॅटर्जी १७ धावांवर खेळत आहे. (क्रीडा प्रतिनिधी)