शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

एमके कौशिक, रवींदर पाल यांचे कोरोनामुळे निधन, मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण विजेत्या भारतीय हॉकी संघाचे होते सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 04:11 IST

सीतापूर येथे जन्मलेले रवींदर पाल हे सेंटर हाफ खेळायचे. १९७९ आणि १९८४ या काळात दोन (मास्को तसेच लॉस एंजिलिस)ऑलिम्पिकशिवाय १९८० आणि १९८३ची चॅम्पियन्स चषक स्पर्धा, १९८२ चा विश्वचषक आणि त्याचवर्षी झालेल्या आशिया चषक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

नवी दिल्ली : १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीयहॉकी संघाचे सदस्य  महाराज कृष्ण कौशिक आणि  रवींदर पालसिंग यांचे कोरोनामुळे शनिवारी निधन झाले. कौशिक हे ६६ तर रविंदर ६० वर्षांचे होते. रविंदर अविवाहित होते. कौशिक यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे. कौशिक यांना १७ एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना स्थानिक नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. सायंकाळी त्यांना कृत्रिम श्वासप्रणालीवर ठेवण्यात आले होते. (MK Kaushik, Ravinder Pal death due to corona) दरम्यान, १९८४ मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिक खेळणारे रवींदर पाल यांना २४ एप्रिलला विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन आठवडे कोरोनाशी झुंज दिल्यानंतर शनिवारी सकाळी लखनौमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींदर यांनी कोरोनावर मात केली. निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना कोरोना वॉर्डातून हलविण्यात आले होते; मात्र शुक्रवारी त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वसनप्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पुतणी प्रज्ञा यादव आहे. रवींदर यांनी हॉकी सोडल्यानंतर स्टेट बँकेतूनही स्वच्छानिवृत्ती घेतली होती. केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू आणि हॉकी इंडियाने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

कौशिक यांनी भारताच्या सिनियर पुरुष आणि महिला संघाला प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनात भारताच्या पुरुष संघाने बँकॉक येथे १९९८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय, महिला संघानेदेखील दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत २००६ ला कांस्यपदक जिंकले. त्यांना १९९८ ला अर्जुन पुरस्कार तसेच २००२ ला द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सीतापूर येथे जन्मलेले रवींदर पाल हे सेंटर हाफ खेळायचे. १९७९ आणि १९८४ या काळात दोन (मास्को तसेच लॉस एंजिलिस)ऑलिम्पिकशिवाय १९८० आणि १९८३ची चॅम्पियन्स चषक स्पर्धा, १९८२ चा विश्वचषक आणि त्याचवर्षी झालेल्या आशिया चषक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत