बीसीसीआयला एमसीएचे पुन्हा पत्र

By Admin | Updated: May 13, 2014 06:02 IST2014-05-13T05:01:43+5:302014-05-13T06:02:09+5:30

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) वानखेडेवर होणारी आयपीएलची अंतिम लढत हलविण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्णयाविरोधात आवाज उठविल्यानंतर पुन्हा एकदा पत्र पाठवून विचारणा केली आहे

MCA letter to BCCI again | बीसीसीआयला एमसीएचे पुन्हा पत्र

बीसीसीआयला एमसीएचे पुन्हा पत्र

 मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) वानखेडेवर होणारी आयपीएलची अंतिम लढत हलविण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्णयाविरोधात आवाज उठविल्यानंतर पुन्हा एकदा पत्र पाठवून विचारणा केली आहे. सोमवारी बैठक बोलावून एमसीएच्या पदाधिकार्‍यांनी बीसीसीआयला पत्र पाठवले आणि त्यावर मंगळवारपर्यंत उत्तर अपेक्षित असल्याचे एमसीएच्या पदाधिकार्‍याने सांगितले. या पत्रात एमसीएने बीसीसीआयला सामन्यांसाठी केलेल्या तयारीची माहिती लिहिली आहे. यात मोठे लाऊडस्पिकर वापरण्याची आणि फटाक्यांची आतषबाजी करण्याची विशेष परवानगी पोलिसांकडून घेतली असल्याचे नमूद केले आहे. प्रमुख व्यक्तिंच्या पाहुणचारात झालेली हेळसांड आणि पार्कि गच्या मुद्यावरून झालेला गदारोळ या मुद्यांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात येईल असा विश्वासही एमसीएने व्यक्त केला आहे. याच दोन प्रमुख कारणांमुळे आयपीएलची अंतिम लढत हलविण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावल्यानंतर वानखेडेवर आयपीएलची अंतिम लढत झालेली नाही, हा मुद्या पत्रात विशेष उल्लेखला आहे. ३ मे च्या लढतीत आयपीएलचे अंतरिम अध्यक्ष सुनील गावसकर आणि अध्यक्ष रणजीब बिस्वाल यांना एमसीएच्या सुरक्षा रक्षकांकडून रोखण्यात आले होते. या दोघांच्या वाहनांना पार्किंग देखील नाकारण्यात आले. यावर बीसीसीआय भडकलेले दिसते.एमसीएने त्यावर बाजू मांडताना म्हटले की बीसीसीआय किंवा आयपीएलने आगमनाबाबत एमसीए पदाधिकार्‍यांना पुर्वकल्पना देणे आवश्यक होते. आयपीएलचे सीओओ सुंदर रमन यांनी एमसीएच्या पदाधिकार्‍यांशी समन्वय साधायला हवा होता, असे मत एमसीएचे सदस्य नदीम मेमन यांनी व्यक्त केले. आयपीएलची संचालन समितीची मंगळवारी बैठक होणार आहे आणि एमसीएला या बैठकीत तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. अंतिम लढतीच्या निर्णयाव्यतिरिक्त एमसीएने एलिमिनेटर लढत सीसीआयला देण्याच्या निर्णयावरही आक्षेप घेतला. २८ मे ला ही लढत सीसीआय स्टेडियमवर होणार आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार राज्य संघटनेच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणत्याही सामन्याचे आयोजन होऊ शकत नाही. एमसीएच्या आवाहनाला आयपीएल संंचालन परिषद किती दाद देते हे आता पाहायचेय! पण जाणकारांच्या मते बीसीसीआय एमसीएला दुखावणार नाही कारण एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजस्थान क्रिकेट संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित मोदी यांच्या निलंबनावरुन आधीच बीसीसीआयच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान निलंबित राजस्थान क्रिकेट संघटनेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष व ललित मोदी यांचे वकील महमुद अब्दी यांनी आयपीएलच्या अंतिम लढतीच्या स्थानामध्ये बदल करण्याच्या निर्णयावर टीका केली. आयपीएल संचालन परिषदेने मुंबईचे यमजानपद काढून घेताना अंतिम लढत बेंगळुरूमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला. हे श्रीनिवासन यांच्या गटाचे काम असल्याचे अब्दी यांनी म्हटले आहे.आयपीएलच्या अंतिम लढतीचे यमजानपद मुंबईकडून काढून घेणे चुकीचे आहे,असेही ते म्हणाले.(विशेष प्रतिनिधी)

Web Title: MCA letter to BCCI again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.