शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नागपूरमध्ये होणार सामने

By admin | Updated: July 21, 2015 23:49 IST

पुढील वर्षी ११ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत भारतातील ८ शहरांमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेची अंतिम लढत कोलकाता

नवी दिल्ली : पुढील वर्षी ११ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत भारतातील ८ शहरांमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेची अंतिम लढत कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. स्पर्धेतील सामने बंगळुरू, चेन्नई, धर्मशाला, मोहाली, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली आणि कोलकाता येथे होतील. चार वर्षांपूर्वी भारतात आयोजित वन-डे विश्वकप स्पर्धेदरम्यान कोलकात्यामध्ये एकही मोठा सामना आयोजित करण्यात आलेला नव्हता. भारत आणि इंग्लंड संघांदरम्यानची लढत बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळली गेली होती. कारण, ईडन गार्डन्सवरील डागडुजीचे काम पूर्ण झाले नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले होते. त्याआधी, ईडन गार्डन्सवर १९८७मध्ये रिलायन्स कप फायनल व १९९६मध्ये विश्वकप सेमी फायनल या लढतींचे आयोजन करण्यात आले होते. निवड करण्यात आलेल्या स्थळांनी अटींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. बीसीसीआयने म्हटले आहे, की ‘आयसीसी व बीसीसीआय यांनी ठरवून दिलेल्या अटींची पूर्तता झाली, तरच या स्थळांवर सामने होतील.’भारतात टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन प्रथमच होत आहे. २००७मध्ये प्रथमच टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारताने सहभाग नोंदवताना जेतेपद पटकावले होते. स्पर्धेबाबत बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘आम्हाला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाल्यामुळे आनंद झाला. आम्ही स्थळांची घोषणा करताना स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केलेली आहे. आम्ही ही स्पर्धा सहभागी संघांसाठी व प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरविण्यास प्रयत्नशील आहोत.’’बीसीसीआयने स्पर्धेसाठी व्यवस्थापन समितीची स्थापना केली असून, तीत अध्यक्ष दालमिया व समन्वयक ठाकूर असतील. समितीच्या अन्य सदस्यांमध्ये सहसचिव अमिताभ चौधरी, कोशाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी, उपाध्यक्ष गंगा राजू, आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला, मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आशिष शेलार आणि ओडिशा क्रिकेट संघटनेचे सचिव आशीर्वाद बेहेडा यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)