शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

मुंबई-नागपूरमध्ये होणार सामने

By admin | Updated: July 21, 2015 23:49 IST

पुढील वर्षी ११ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत भारतातील ८ शहरांमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेची अंतिम लढत कोलकाता

नवी दिल्ली : पुढील वर्षी ११ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत भारतातील ८ शहरांमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेची अंतिम लढत कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. स्पर्धेतील सामने बंगळुरू, चेन्नई, धर्मशाला, मोहाली, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली आणि कोलकाता येथे होतील. चार वर्षांपूर्वी भारतात आयोजित वन-डे विश्वकप स्पर्धेदरम्यान कोलकात्यामध्ये एकही मोठा सामना आयोजित करण्यात आलेला नव्हता. भारत आणि इंग्लंड संघांदरम्यानची लढत बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळली गेली होती. कारण, ईडन गार्डन्सवरील डागडुजीचे काम पूर्ण झाले नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले होते. त्याआधी, ईडन गार्डन्सवर १९८७मध्ये रिलायन्स कप फायनल व १९९६मध्ये विश्वकप सेमी फायनल या लढतींचे आयोजन करण्यात आले होते. निवड करण्यात आलेल्या स्थळांनी अटींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. बीसीसीआयने म्हटले आहे, की ‘आयसीसी व बीसीसीआय यांनी ठरवून दिलेल्या अटींची पूर्तता झाली, तरच या स्थळांवर सामने होतील.’भारतात टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन प्रथमच होत आहे. २००७मध्ये प्रथमच टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारताने सहभाग नोंदवताना जेतेपद पटकावले होते. स्पर्धेबाबत बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘आम्हाला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाल्यामुळे आनंद झाला. आम्ही स्थळांची घोषणा करताना स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केलेली आहे. आम्ही ही स्पर्धा सहभागी संघांसाठी व प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरविण्यास प्रयत्नशील आहोत.’’बीसीसीआयने स्पर्धेसाठी व्यवस्थापन समितीची स्थापना केली असून, तीत अध्यक्ष दालमिया व समन्वयक ठाकूर असतील. समितीच्या अन्य सदस्यांमध्ये सहसचिव अमिताभ चौधरी, कोशाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी, उपाध्यक्ष गंगा राजू, आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला, मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आशिष शेलार आणि ओडिशा क्रिकेट संघटनेचे सचिव आशीर्वाद बेहेडा यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)