शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

मुंबई-नागपूरमध्ये होणार सामने

By admin | Updated: July 21, 2015 23:49 IST

पुढील वर्षी ११ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत भारतातील ८ शहरांमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेची अंतिम लढत कोलकाता

नवी दिल्ली : पुढील वर्षी ११ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत भारतातील ८ शहरांमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेची अंतिम लढत कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. स्पर्धेतील सामने बंगळुरू, चेन्नई, धर्मशाला, मोहाली, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली आणि कोलकाता येथे होतील. चार वर्षांपूर्वी भारतात आयोजित वन-डे विश्वकप स्पर्धेदरम्यान कोलकात्यामध्ये एकही मोठा सामना आयोजित करण्यात आलेला नव्हता. भारत आणि इंग्लंड संघांदरम्यानची लढत बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळली गेली होती. कारण, ईडन गार्डन्सवरील डागडुजीचे काम पूर्ण झाले नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले होते. त्याआधी, ईडन गार्डन्सवर १९८७मध्ये रिलायन्स कप फायनल व १९९६मध्ये विश्वकप सेमी फायनल या लढतींचे आयोजन करण्यात आले होते. निवड करण्यात आलेल्या स्थळांनी अटींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. बीसीसीआयने म्हटले आहे, की ‘आयसीसी व बीसीसीआय यांनी ठरवून दिलेल्या अटींची पूर्तता झाली, तरच या स्थळांवर सामने होतील.’भारतात टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन प्रथमच होत आहे. २००७मध्ये प्रथमच टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारताने सहभाग नोंदवताना जेतेपद पटकावले होते. स्पर्धेबाबत बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘आम्हाला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाल्यामुळे आनंद झाला. आम्ही स्थळांची घोषणा करताना स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केलेली आहे. आम्ही ही स्पर्धा सहभागी संघांसाठी व प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरविण्यास प्रयत्नशील आहोत.’’बीसीसीआयने स्पर्धेसाठी व्यवस्थापन समितीची स्थापना केली असून, तीत अध्यक्ष दालमिया व समन्वयक ठाकूर असतील. समितीच्या अन्य सदस्यांमध्ये सहसचिव अमिताभ चौधरी, कोशाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी, उपाध्यक्ष गंगा राजू, आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला, मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आशिष शेलार आणि ओडिशा क्रिकेट संघटनेचे सचिव आशीर्वाद बेहेडा यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)