शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

कलम ३७० हटवल्यावर 'या' ठिकाणी होणार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 22:27 IST

या तणावामध्ये जर दोन्ही देशांचे खेळांचे सामने खेळवायचे असतील, तर कोणते ठिकाण सुरक्षित आहे, याची तपासणी केली गेली आहे.

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यामुळे सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. या तणावामध्ये जर दोन्ही देशांचे खेळांचे सामने खेळवायचे असतील, तर कोणते ठिकाण सुरक्षित आहे, याची तपासणी केली गेली आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतानेपाकिस्तानबरोबर खेळावे का, हा मोठा प्रश्न आहे. एक वर्ग या विरोधात आहे. त्यामुळे हे सामने सुरक्षितपणे खेळवण्यासाठी चाचपणी केली गेली आणि त्यामध्ये एक ठिकाण समोर आल्याचे म्हटले जात आहे. आता हे ठिकाण नेमके कोणते, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हे ठिकाण आहे युरोप खंड.

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ सध्याच्या घडीला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पात्रता फेरीचे सामने खेळवण्याचा विचार करत आहे. कारण २०२० साली टोकिओ येथे ऑलिम्पिक होणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये हॉकी हा खेळदेखील आहे. या क्वालीफाइंग स्पर्धेत एक सामना तुमच्या देशात आणि दुसरा प्रतिस्पर्धी संघाच्या देशात खेळायचा असतो. पण सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये सामने होऊ शकत नाही. त्यामुळे हे सामने युरोपमध्ये खेळवण्याचा विचार सध्याच्या घडीला सुरु आहे. 

क्वालीफाइंग स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्यात आले आहे. पण क्वालीफाइंग स्पर्धेत या दोन्ही संघांचा सामना होऊ शकतो. सध्याच्या घडीला भारतामध्ये हा सामना होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. पण पाकिस्तानमध्ये सामना खेळायला भारताचा संघ जाणार का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे.

क्वालीफाइंग स्पर्धेत जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने झाले तर ते या दोन्ही देशांमध्ये होऊ शकणार नाहीत. कारण जर आम्ही भारतात खेळायला तयार आहोत तर त्यांनी आमच्या देशातही खेळायला हवे, अशी मागणी पाकिस्तानचा संघ करू शकतो. त्यामुळे हे सामने दोन्ही देशांत न खेळवण्याचा विचार सुरु आहे. हे सामने सुरक्षितपणे युरोप खंडात खेळवले जाऊ शकतात, असा आयोजकांना विश्वास आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील सामने युरोप खंडात खेळवले जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले आहे.

टॅग्स :HockeyहॉकीOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020IndiaभारतPakistanपाकिस्तान