शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कोहलीला पूर्णवेळ कर्णधार बनवा - इयान चॅपेल

By admin | Updated: December 14, 2014 17:06 IST

अ‍ॅडलेडवरील कसोटीत कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दोन्ही डावात शानदार शतक ठोठावणा-या विराट कोहलीकडेच पूर्णवेळ कर्णधारपद देण्यात यावे असे मत इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १४ - अ‍ॅडलेडवरील कसोटीत पहिल्यांदाच कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दोन्ही डावात शानदार शतक ठोठावणा-या विराट कोहलीकडेच पूर्णवेळ कर्णधारपद देण्यात यावे असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू इयान चॅपेल यांनी एका लेखात व्यक्त केले आहे. 
भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या अनुपस्थितीत कोहलीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. त्याने ही जबाबदारी यशस्वीरित्या तर सांभाळलीच आणि कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावत भारताला विजयाच्या समीप नेले. मात्र भारताला हा सामना जिंकण्यात अपयश आले. भारतीय संघ या कसोटीत जिद्दीने लढताना दिसला, त्यामुळे जरी आपण हा सामना हरलो असलो तरी प्रेक्षकांची मनं भारतीय संघाने जिंकली. आणि त्याचं श्रेय टीम इंडियाचा तात्पुरता कर्णधार विराट कोहलीला दिलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर चॅपेल यांनी हे मत व्यक्त केले आहे.
धोनीकडून कोहलीकडेच कर्णधारपदाची सूत्रं देण्याची हीच योग्य वेल असल्याचे चॅपेल यांनी म्हटले आहे. पहिल्या कसोटीत कोहलीने जे नेतृत्वगुण दाखवले आहेत, ते ओळखून निवड समितीने त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा दिली पाहिजे. त्याची शारिरीक क्षमता उत्तम आहे, त्याच्या  खेळीने प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला आहे. त्याने गोलंदाजांनाही योग्यपद्धतीने वापरून घेतले आहे. त्याच्यामध्ये पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारण्याची क्षमता आहे, असे चॅपेल यांनी म्हटले आहे. मात्र असे असले तरी कर्णधारपदावर असताना रागावर नियंत्रण ठेवणं, डोक शांत ठेवणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि कोहली त्यात अजूनही थोडा कमी पडतोय असेही चॅपेल यांनी लेखात नमूद केले आहे.