शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी प्रकरणात मोठी अपडेट; मोस्ट वॉन्टेड आरोपी सापडला, पंजाबमधील स्फोटात होता सहभाग!
2
Retired Out पॅटर्नसह CSK नं केली MI ची कॉपी; रिझल्टही तसाच लागला; PBKS नं सामना जिंकला
3
“उत्तर भारतीयांचा अपमान केला जातो, याचिका योग्यच, अशा लोकांवर बंदी आणलीच पाहिजे”: अबू आझमी
4
'अमेरिका दादागिरी करतोय...', डोनाल्ड ट्रम्प यांच्या 50% शुल्काच्या धमकीवर चीन संतापला
5
“...तर आम्ही स्वागतच करू”; खुलताबाद नामांतरावर अबू आझमी यांनी स्पष्ट केली भूमिका
6
२ दिवसात २२ कोटी जमा करा, अन्यथा जप्तीची कारवाई; महापालिकेची दीनानाथ रुग्णालयाला नोटीस
7
संजय राऊतांनी दिली उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा; म्हणाले, “महाभारतातील तीन पात्रे...”
8
"कोई... मिल गया.." युवा प्रियांशच्या शतकी खेळीवर प्रीती झिंटाही झाली फिदा (VIDEO)
9
Priyansh Arya Maiden IPL Century : प्रियांश आर्यची कमाल; सर्वात जलद शतक ठोकणारा दुसरा भारतीय
10
Maharashtra Temperature Update: राज्यात उन्हाच्या झळा तीव्र, अकोला ४४ अंशांच्या पार, पुण्यातही ४२ अंश तापमानाने काहिली
11
मोठी बातमी! आजपासून संपूर्ण देशात वक्फ कायदा लागू झाला; केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली
12
'आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नका', वक्फ कायद्यासाठी केंद्राची सर्वोच्च न्यायालयात धाव
13
10 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेले डायर वुल्फ पृथ्वीवर परतले; शास्त्रज्ञांनी केला चमत्कार...
14
“मुंबईत मराठी आले पाहिजे हे ठीक, पण आम्ही राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही”: रामदास आठवले
15
वक्फ विधेयकाविरोधात आंदोलनावेळी हिंसाचार; दगडफेक, जाळपोळ, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या...
16
“...तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पंतप्रधान झाले असते”: रामदास आठवले
17
जोरदार...! चीन 1, अमेरिका 2, भारत 3...! या यादीत झाला मोठा बदल, भारतानं जर्मनीला मागे टाकलं 
18
धक्कादायक बातमी! शिर्डीत पकडलेल्या भिक्षेकर्‍यापैकी चौघांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू, कुणाचा हलगर्जीपणा?
19
"बाबर आझम रात्री उशिरा हॉटेलमधून बाहेर पडायचा अन्..."; मुलाखतीत समोर आली मोठी माहिती
20
पेन्शनरांची बल्ले बल्ले! थोडा जरी विलंब झाला तरी त्यावर बँका ८ टक्के व्याज देणार, RBI चा नवा नियम

महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार : चंद्रहार पाटील; तत्कालीन पंच कमिटीवर आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:06 IST

सांगली : २००९ मध्ये तिहेरी महाराष्ट्र केसरी होताना पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे माझ्यावर अन्याय झाला. कुस्तीगीर संघाचे तत्कालीन उपाध्यक्ष काकासाहेब ...

सांगली : २००९ मध्ये तिहेरी महाराष्ट्र केसरी होताना पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे माझ्यावर अन्याय झाला. कुस्तीगीर संघाचे तत्कालीन उपाध्यक्ष काकासाहेब पवार यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात तशी कबुली दिली आहे. त्यामुळे ठरवून मला तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ दिले नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यावेळीच्या पंच कमिटीने ते मान्य व कबूल करावे. अन्यथा दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या गदा मी कुस्तीगीर परिषदेला परत करणार आहे, असा इशारा दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिला आहे.अहिल्यानगर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ‘शिवराज राक्षे याने पंचाला लाथ घातली ही चूक झाली. जो सामन्यात पंच होता, असल्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत,’ असे वादग्रस्त विधान चंद्रहार पाटील यांनी सोमवारी केले होते. त्यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष काकासाहेब पवार व आताचे संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनीही चंद्रहार पाटील यांच्यावर त्यावेळी अन्याय झाल्याचे कबूल केले.

शिवराज राक्षेवर अन्यायाची वेळ माझ्याप्रमाणे अशीच अन्यायाची वेळ आज शिवराज राक्षेवर आली आहे. पाच सेकंदाच्या पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे, त्या एका माकडामुळे शिवराज राक्षे यांचे पूर्ण आयुष्य बरबाद झाले आहे. त्यातून आता मलाही बाहेर पडायचे आहे. त्यामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायाची दोन दिवसांत त्यावेळीच्या सर्व पंचांनी कबुली द्यावी. अन्यथा दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या गदा मी परत पाठविणार आहे. मला त्याची गरज नाही. मी आयुष्यभर जिवंत असेपर्यंत कुस्ती क्षेत्रासाठी व लाल मातीसाठी काम करीत राहीन.

आता सर्वच पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर अन्याय झाल्याचे कबूल करावे. त्यामुळे माझे समाधान होईल. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे माझ्यावर त्यावेळी जो आघात व घात झाला, त्यामुळे मी आत्महत्या करायला चाललो होतो. परंतु, माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने मी त्यातून बाहेर आलो. तेव्हापासून मी महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीकडे फिरकतही नाही. - चंद्रहार पाटील, पैलवान

टॅग्स :SangliसांगलीWrestlingकुस्तीchandrahar patilचंद्रहार पाटील