शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

मल्लविद्येचा शिरपेच ‘महाराष्ट्र केसरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:48 AM

महाराष्ट्राच्या मल्लविद्येतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा महाराष्ट्र केसरी किताब म्हणजे कुस्तीगीराच्या दृष्टीने अनेक योद्ध्यांनी केलेल्या दिग्विजयाप्रमाणे महाराष्ट्र केसरी किताबापाठीमागेदेखील अनेक कुस्तीगीरांचे दिग्विजय मनाच्या पटलावरून पुसले जाणार नाहीत, एवढे कुस्तीप्रमींच्या मनात खोलवर रुजलेले आहेत.

महाराष्ट्राच्या मल्लविद्येतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा महाराष्ट्र केसरी किताब म्हणजे कुस्तीगीराच्या दृष्टीने अनेक योद्ध्यांनी केलेल्या दिग्विजयाप्रमाणे महाराष्ट्र केसरी किताबापाठीमागेदेखील अनेक कुस्तीगीरांचे दिग्विजय मनाच्या पटलावरून पुसले जाणार नाहीत, एवढे कुस्तीप्रमींच्या मनात खोलवर रुजलेले आहेत.मल्लविद्येतील आपल्या अखंड तपश्चर्येने १९६४ व ६५ मध्ये गणपतराव खेडकर, १९६७ व ६८ मध्ये चंबा मुत्नाळ, १९६९-७० मध्ये दादू चौगुले, १९७२-७३ मध्ये लक्ष्मण वडार, तर २००७-०८ मध्ये चंद्रहार पाटील यांनी डबल महाराष्ट्र केसरी किताब मिळवून देदीप्यमान कामगिरी केली. ‘वीरपुरुष जन्माला येतात ते इतिहास निर्माण करण्यासाठी’ या उक्तीप्रमाणे आणि आपल्या नावातच पराक्रमी पुरुषाचा अर्थ सामावलेल्या मुंबईच्या नरसिंग यादवने महाराष्ट्र केसरी किताबाची हॅट्ट्रिक करीत ‘न भूतो न भविष्यती’ अशी कामगिरी केली. परंतु पराक्रमी पुरुषांची जननी असलेल्या या महाराष्ट्राच्या रणमैदानात जणू काही अद्वितीय कामगिरी करून इतिहास निर्माण करण्याची चढाओढच लागली होती. २०१४ ते २०१६ या कालावधीत जळगावच्या विजय चौधरीने नरसिंगच्या पराक्रमाची बरोबरी करीत महाराष्ट्र केसरीची हॅट्ट्रिक मिळवून दिग्विजयाचा डंका वाजविला.१९६१ पासून १९८७ पर्यंत महाराष्ट्र केसरी किताबाची लढत ही लाल मातीच्या आखाड्यामध्ये होत होती. परंतु कुस्तीची जननी लाल माती तिला न विसरता आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्रातील मल्लांची कामगिरी उंचावली पाहिजे ही विचारधारणा मनात ठेवून कुस्तीमहर्षी बाळासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र केसरी किताबाची अंतिम लढत मॅटवर खेळविण्याची संकल्पना कार्यकारिणीमध्ये मांडून १९८८ पासून अंतिम लढतीसाठी मॅटवर प्रारंभ झाला. चापल्य आणि वेग यांचा सुरेख संगम साधत सोलापूर जिल्ह्यातील निमगावच्या रावसाहेब मगरने मॅटवरील अंतिम फेरीची लढत जिंकून महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला.पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंबळी गावच्या पिता व पुत्र हिरामण बनकर आणि विजय बनकर त्याचप्रमाणे कोल्हापूरचे दादू चौगुले व विनोद चौगुले यांनी मिळवलेले महाराष्ट्र केसरीचे किताब कुस्तीक्षेत्रातील पराक्रमाचे अलौकिक ऐतिहासिक पान म्हणून लिहावे लागेल. अशा अद्वितीय, अविस्मरणीय पराक्रम लाभलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाची पुढील गाथा लिहिण्यासाठी मुळशी तालुक्यातील भूगाव सज्ज झाले आहे.-दिनेश गुंड(आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच)