शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे झाले राष्ट्रीय कुस्तीचे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 04:13 IST

‘महाराष्ट्रातील मल्लांमध्ये ऑलिंपिक गाजवण्याची क्षमता आहे. मात्र येथील मल्ल अल्पसंतुष्ट आहेत.

- प्रमोद आहेरशिर्डी : ‘महाराष्ट्रातील मल्लांमध्ये ऑलिंपिक गाजवण्याची क्षमता आहे. मात्र येथील मल्ल अल्पसंतुष्ट आहेत. त्यांना महाराष्ट्र केसरी व त्यातून सरकारी नोकरी मिळाली की ते येथेच थांबतात. त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्र केसरीमुळे राष्ट्रीय कुस्तीचे मोठे नुकसान होत आहे,’ अशी खंत राष्ट्रीय कुस्ती संघाचे अध्यक्ष व खासदार बृजभुषण शरणसिंग यांनी व्यक्त केली. ज्युनियर चॅम्पियनशीप स्पर्धेच्या निमित्ताने शरणसिंग गेल्या तीन दिवसांपासून शिर्डीत आहेत. त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.शरणसिंग म्हणाले, ‘पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आॅलिंपिकसाठी चार मल्ल पात्र झाले असून दुस-या फेरीनंतर ही संख्या दहावर पोहचेल. आम्ही नक्कीच सुवर्ण पदक मिळवू. कुस्ती हा नैसर्गिक खेळ आहे. फ्री स्टाईल कुस्तीचा जन्म भारतात झाला. क्रिकेट केवळ आठ देशात खेळला जातो. कुस्ती १३० देशात खेळली जात आहे. सध्या देशात कुस्तीमध्ये हरियाणा पहिल्या क्रमांकावर असून अंदमान निकोबार व पूर्वेकडील अरुणाचल, सिक्कीमसारख्या काही राज्यात कुस्तीचा प्रसार झाला नाही.’‘क्रिकेटनंतर रँकिंगवर खेळणारा कुस्ती हा पहिला खेळ आहे़ क्रमवारीनुसार मल्लांना जास्तीतजास्त वार्षिक तीन लाख ते तीस लाख रुपये मदत दिली जाते़ देशातील शंभर खेळाडूंवर दरवर्षी पाच कोटी रूपये खर्च केले जातात़ बजरंग पुनीयाला वर्षाला तीस लाख, दिनेशला पंचवीस, साक्षी मलिक व सुशीलला प्रत्येकी २० लाख रुपये दरवर्षी डाएट व प्रशिक्षणासाठी दिले जात आहे,’ असेही शरणसिंग यांनी यावेळी सांगितले.खाशाबा जाधव यांच्यासाठी निवेदनभारताचे पहिले आॅलिम्पिक पदक विजेते कुस्तीगीर दिवंगत खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी मागणी राहाता तालुका कुस्ती तालीम संघाकडून करण्यात आली. यासाठी संघाच्या वतीने राष्ट्रीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभुषण शरणसिंग यांच्याकडे निवेदन दिले.

टॅग्स :Wrestlingकुस्तीMaharashtraमहाराष्ट्र