शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Kesari 2025 : 'महाराष्ट्र केसरी मॅच फिक्सिंग', शिवराज राक्षेच्या कुटुंबीयांचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 11:27 IST

Maharashtra Kesari 2025 : काल अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत शेवटच्या क्षणी मोठा गोंधळ निर्माण झाला.

Maharashtra Kesari 2025 ( Marathi News ) : काल अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत शेवटच्या क्षणी मोठा गोंधळ निर्माण झाला. मॅटवरील अंतिम सामन्यात पैलवान शिवराज राक्षे याच्याविरोधात निर्णय दिल्याचा आरोप करण्यात आला. यावरुन पै. शिवराज राक्षे याने मोठा गोंधळ सुरू केला. पंचांना लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे आता राज्यभरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. दुसरीकडे पैलवान शिवराज राक्षे याच्या कुटुंबीयांनी आ वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरच आरोप केला आहे. यावर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा फिक्सिंग होती असा मोठा आरोप पैलवान शिवराज राक्षे याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पैलवान शिवराज राक्षेवर कारवाई

काल झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मॅटवरील अंतिम सामना पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाला. पण. या डावात शेवटच्या क्षणी पंचांनी मोहोळ याला विजयी घोषित केले. पण, यावेळी पै.शिवराज राक्षे याची पाठ पूर्ण टेकली नसल्याचा दावा राक्षे याने केला. पण पंचांनी हा दावा फेटाळून लावला. शिवराज राक्षे याने रिप्लाय दाखवण्याची मागणी केली. पण, तीही मागणी फेटाळून लावली. यावेळी पै.शिवराज राक्षे आणि पंचांमध्ये मोठा वाद सुरू झाला.  दरम्यान, शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारल्याचे समोर आले आहे. यामुळे राक्षे आला तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.   

पैलवान शिवराज राक्षे याचे कुटुंबीय काय म्हणाले?

'एबीपी माझा' या वृत्तवाहिनेने पैलवान शिवराज राक्षे याच्या कुटुंबीयांची मुलाखत घेतली. यावेळी कुटुबीयांनी महाराष्ट्र केसरी २०२५ च्या स्पर्धा फिक्सिंग असल्याचा आरोप केला.  यावेळी बोलताना शिवराज राक्षे यांच्या आई म्हणाल्या,  पंचांनी असा निर्णय द्यायला नको होता. पंचांनी चूक मान्य केली नाही. त्यांनी त्यावेळी पुन्हा दाखवायला हवे होते. ते दाखवले नाही. माझा मुलगा एवढ्या वर्षे कुस्ती खेळत आहे, असं काही करणार नाही आम्हाला माहित आहे.  आतापर्यंत आम्ही पाहिले आहे, ते दरवेळी चुकीचा निर्णय देतात. शिवराजने आतापर्यंत कुस्तीत दहा कुस्त्या जिंकल्या आहेत. शेवटच्या कुस्तीत त्यांनी असा निर्णय घेतला. आमच्या मुलाची मागणी फक्त रिप्लाय दाखवण्याची होती. मॅटवर खेळायला जात असतानाच शिवीगाळ केली होती, असं करायला को होतं. निलंबित करणे हा निर्णय चुकीचा आहे, गरिबाच्या मुलावर अन्याय करायला नको. पंचांवर पण कारवाई व्हायला पाहिजे. सगळीच मुलं गरीब घरातील असतात, त्यामुळे फक्त मुलांवर कारवाई नको, पंचांवरही कारवाई करायला पाहिजे, अशी मागणी पैलवान शिवराज राक्षे यांच्या आईने केली. 

"आमचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठिमागे आहे. पंचांनीच आधी अन्याय केला आणि नंतर त्यांनीच कारवाई केली. याआधी पंचांकडे न्याय मागायला गेले त्यावेळी पंचांनी शिवी दिली होती. आता तुम्ही चुकीचा निर्णय होता असं मान्य करताय, मग आता तुमच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. आता आम्हालाही न्याय पाहिजे, अशी मागणी पै. शिवराज राक्षे यांच्या कुटुंबीयांनी केली. 

"शिवराज यांनी आयुष्यातील पंधरा वर्षे दिली आहेत. शिवराज यानेही असं करायला नको होतं. पण, त्याच्यावर नेहमी अन्याय होतोय. याआधीही असंच केलं आहे, सगळ ठरवून केलं जातं आहे, असंही कुटुंबीय म्हणाले. 

टॅग्स :Wrestlingकुस्तीMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा