शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

रांची टीम इंडियासाठी लकी

By admin | Updated: October 25, 2016 01:40 IST

कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे गृहमैदान असलेल्या रांचीमध्ये टीम इंडियाने वर्चस्व गाजवले आहे. भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान २६ आॅक्टोबर रोजी या मैदानावर

रांची : कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे गृहमैदान असलेल्या रांचीमध्ये टीम इंडियाने वर्चस्व गाजवले आहे. भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान २६ आॅक्टोबर रोजी या मैदानावर चौथा वन-डे सामना खेळला जाणार आहे. भारताने मोहालीमध्ये रविवारी तिसरा वन-डे सामना सात गडी राखून जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला रांचीमध्ये मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारतीय संघाला अद्याप पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. धोनीच्या गृहमैदानावर वन-डेची सुरुवात १९ जानेवारी २०१३ रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्याने झाली होती. या मैदानावर आतापर्यंत तीन वन-डे व एक टी-२० सामना खेळला गेला आहे. या मैदानावर भारताने इंग्लंड व श्रीलंकेचा वन-डे सामन्यांमध्ये पराभव केला आहे, तर आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीचा निकाल शक्य झाला नाही. भारताने एकमेव टी-२० सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता. जानेवारी २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या वन-डे लढतीत भारताने पाहुण्या संघाचा डाव १५५ धावांत गुंडाळल्यानंतर ३ बाद १५७ धावा फटकावित विजय साकारला. विराट कोहलीने त्या लढतीत नाबाद ७७ धावा केल्या होत्या. त्यानंतर आॅक्टोबर २०१३ मध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-आॅस्ट्रेलिया सामना रद्द झाला होता. आॅस्ट्रेलियाने २९५ धावा फटकावल्या होत्या आणि लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या डावात ४.१ षटकांनंतर पावसामुळे खेळ शक्य झाला नाही. धोनीच्या गृहमैदानात रन मशिन विराट कोहलीची कामगिरी शानदार ठरली आहे. या मैदानावरील भारतातर्फे दोन मोठ्या खेळी विराटच्या नावावर आहेत. सध्या सुरू असलेल्या मालिकेत विराटने धर्मशाला व मोहालीमध्ये मोठी खेळी केली आहे. भारताने या दोन्ही लढतीत विजय मिळवला. दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत गृहमैदानावर विराट लवकर बाद झाला आणि भारताला पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था) चौथ्या क्रमांकावर नैसर्गिक फलंदाजी करता येते : धोनीमोहाली : चौथ्या क्रमांकावर नैसर्गिक फलंदाजी करता येते. तळाच्या क्रमांकावर खेळताना माझी फलंदाजी प्रभावित होत होती, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केली. रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ‘‘चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सहज वाटते. धावा फटकावल्यामुळे मला समाधान वाटत आहे. मी गेल्या अनेक दिवसांपासून या क्रमांकावर फलंदाजी करण्यास इच्छुक होतो. त्यामुळे छाप सोडण्याची संधी असते. पाचव्या व सहाव्या क्रमांकावर खेळताना हे शक्य नसते. तळाच्या क्रमांकावर खेळताना माझी कामगिरी प्रभावित होत होती. त्यामुळे मी वरच्या क्रमांकावर खेळण्यास उत्सुक होतो. कामगिरीत सुधारणा करण्यासाठी व नैसर्गिक शैलीने फलंदाजी करण्यासाठी चौथ्या क्रमांकावर खेळण्याची इच्छा होती.’’धोनी गेल्या अनेक वर्षांपासून तळाच्या क्रमांकावर फलंदाजी करीत होता, पण सध्याच्या मालिकेत मनीष पांडेपेक्षा वरच्या स्थानी म्हणजे चौथ्या क्रमांकावर खेळत आहे. धोनीने या लढतीत चौथ्या क्रमांकावर खेळताना ८० धावांची खेळी केली. त्यात ६ चौकार व ३ षटकारांचा समावेश आहे. धोनीचे ११ डावांतील हे पहिले अर्धशतक आहे. धोनीने आपल्या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले, ‘‘संघव्यवस्थापनासोबत गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा करीत होतो. तळाच्या क्रमांकावर फलंदाजी करताना तुमची जबाबदारी सामना जिंकून देण्याची असते. लक्ष्य गाठण्यासाठी धावा कराव्या लागतात. मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करीत असल्यामुळे अनेक युवा खेळाडूंना तळाच्या स्थानावर फलंदाजी करण्याची संधी मिळत आहे. ‘विराटला बाद केल्यानंतरच जिंकता आले असते’१विराट कोहलीला बाद केल्यानंतर किंवा मोठी धावसंख्या उभारल्यानंतरच यजमान संघाविरुद्ध विजय मिळवता येतो, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने व्यक्त केली. २भारताविरुद्ध तिसऱ्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर प्रतिक्रिया देताना विल्यम्सन म्हणाला, ‘‘पराभव स्वीकारणे निराशाजनक आहे. विराटला बाद केल्यानंतरच जिंकणे शक्य असते. विराटला या लढतीत जीवदान मिळाले आणि त्यानंतर त्याने नाबाद १५४ धावांची खेळी करीत भारताला सहज विजय मिळवून दिला.’’३विल्यम्सन म्हणाला, ‘‘मधल्या षटकांमध्ये आम्ही विकेट गमावल्यामुळे मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तळाच्या फलंदाजांनी चांगला खेळ केला. जिम्मी निशाम व मॅट हेन्री यांनी शानदार खेळी केली. एकवेळ आमची ३ बाद १६० अशी मजबूत स्थिती होती. ४मधल्या षटकांमध्ये आमचे फलंदाज झटपट बाद झाले. २८० धावांची मजल मारल्यामुळे समाधानी होतो, पण त्यानंतर आणखी धावांची गरज असल्याचे वाटत होते. भारतीय संघात बदल नाहीनवी दिल्ली : सुरेश रैना व्हायरलच्या संक्रमणातून सावरण्यात अपयशी ठरल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन वन-डे सामन्यांतून ‘आऊट’ झाला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघात उर्वरित दोन लढतींसाठी कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. बीसीसीआयने जाहीर केले, ‘‘अखिल भारतीय सीनिअर निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी १४ सदस्यांचा संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरेश रैना अद्याप व्हायरल संक्रमणातून सावरलेला नाही. त्यामुळे तो मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही.’’