शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

संधी गमावल्यामुळे विजयाचे हकदार नव्हतो

By admin | Updated: July 11, 2017 02:14 IST

वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० लढतीमध्ये रविवारी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाच्या कामगिरीवर टीका केली आहे

किंग्जस्टन : वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० लढतीमध्ये रविवारी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाच्या कामगिरीवर टीका केली आहे. आमच्या खेळाडूंनी फलंदाजी व गोलंदाजीमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यामुळे आम्ही विजयाचे हकदार नव्हतो, असे कोहली म्हणाला.प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ बाद १९० धावांची मजल मारली, पण एविन लुईसने ६२ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १२५ धावांची खेळी करीत टी-२० विश्व चॅम्पियन वेस्ट इंडिज संघाला १८.३ षटकांत विजयी लक्ष्य गाठून दिले. लुईसने शतकी खेळी १२ षटकार व ६ चौकारांनी सजवली. कोहली म्हणाला, ‘टी-२० क्रिकेटमध्ये अनेकदा वाईट दिवसाला सामोरे जावे लागते. विंडीजचा टी-२० संघ चांगला आहे. गेल्या काही वर्षांपासून हे खेळाडू खेळत आहेत. आमचा संघ सध्या संक्रमणाच्या स्थितीत आहे. त्यामुळे चढ-उतार अनुभवायला मिळत आहेत.’ दुसऱ्या बाजूचा विचार करता विंडीजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने विजयानंतर आनंद व्यक्त केला. ब्रेथवेट म्हणाला, ‘मी खूश आहे. आम्ही फलंदाजांना नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला दिला होता. जो खेळाडू अर्धशतक झळकावेल त्याला माझ्या मानधनातील अर्धी रक्कम देण्यात येईल, असे मी जाहीर केले होते. आम्ही आमच्या चाहत्यांना खूश करण्यास प्रयत्नशील होतो. आम्ही आयपीएल बघितले असून डेथ ओव्हर्समध्ये भुवनेश्वर कशी गोलंदाजी करतो, याची कल्पना होती.’(वृत्तसंस्था)>झेल सोडल्यामुळे पराभव : कार्तिकसुमार क्षेत्ररक्षणामुळे विंडीजविरुद्ध रविवारी टी-२० लढतीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. झेल सोडणे महागात पडले, अशी प्रतिक्रिया भारतीय फलंदाज दिनेश कार्तिकने व्यक्त केली. सहाव्या षटकात एविन लुईसचा भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर उडालेला झेल कोहली व मोहम्मद शमी यांच्यादरम्यान ताळमेळ नसल्यामुळे सुटला. त्यानंतर चार चेंडूंनंतर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल कार्तिकला टिपण्यात अपयश आले. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कार्तिक म्हणाला, ‘जर मिस हिटवरही चेंडू सीमारेषेबाहेर जात असेल तर हा फलंदाजाचा दिवस असल्याचे आपल्या लक्षात येते. लुईसने आम्हाला दोन संधी दिल्या, पण त्याही आम्हाला कॅश करता आल्या नाहीत. आम्ही अनेक झेल सोडले आणि त्यामुळे सामन्यावरील पकड निसटली.’भारतातर्फे २९ चेंडूंमध्ये ४८ धावांची खेळी करणारा कार्तिक म्हणाला,‘१९० ही वाईट धावसंख्या नव्हती, पण लुईसची फलंदाजी बघितल्यानंतर हे आव्हान खुजे ठरले. त्याने चौकारांच्या तुलनेत षटकार अधिक ठोकले.’दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला या लढतीत खेळता आले नाही. कार्तिकच्या मते त्याची संघाला उणीव भासली. पांड्या अष्टपैलू खेळाडू असून गोलंदाजी व फलंदाजीमध्ये त्याची आम्हाला उणीव जाणवली, असेही कार्तिक म्हणाला. (वृत्तसंस्था)ही चांगली लढत होती. भारतासारख्या संघाविरुद्ध शतक झळकावणे प्रतिष्ठेची बाब आहे. मला सलग पाच सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती, पण मी स्वत:वरील विश्वास ढळू दिला नाही आणि या लढतीत मला त्याचा लाभ झाला. - एविन लुईसआम्ही फलंदाजी करताना २५-३० जास्तीच्या धावा फटकावू शकलो असतो. आम्हाला २३० धावा फटकावण्याची संधी होती, पण आम्ही संधी गमावली आणि त्यामुळे आम्ही विजयाचे हकदार नव्हतो. एका फलंदाजाला डावामध्ये सूत्रधाराची भूमिका बजावणे आवश्यक होते. दिनेशने चांगला खेळ केला, पण कुणीतरी ८०-९० धावांची खेळी करणे अपेक्षित होते. त्यानंतर आमची गोलंदाजीही चांगली झाली नाही.- विराट कोहली, कर्णधार