शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

संधी गमावल्यामुळे विजयाचे हकदार नव्हतो

By admin | Updated: July 11, 2017 02:14 IST

वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० लढतीमध्ये रविवारी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाच्या कामगिरीवर टीका केली आहे

किंग्जस्टन : वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० लढतीमध्ये रविवारी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाच्या कामगिरीवर टीका केली आहे. आमच्या खेळाडूंनी फलंदाजी व गोलंदाजीमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यामुळे आम्ही विजयाचे हकदार नव्हतो, असे कोहली म्हणाला.प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ बाद १९० धावांची मजल मारली, पण एविन लुईसने ६२ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १२५ धावांची खेळी करीत टी-२० विश्व चॅम्पियन वेस्ट इंडिज संघाला १८.३ षटकांत विजयी लक्ष्य गाठून दिले. लुईसने शतकी खेळी १२ षटकार व ६ चौकारांनी सजवली. कोहली म्हणाला, ‘टी-२० क्रिकेटमध्ये अनेकदा वाईट दिवसाला सामोरे जावे लागते. विंडीजचा टी-२० संघ चांगला आहे. गेल्या काही वर्षांपासून हे खेळाडू खेळत आहेत. आमचा संघ सध्या संक्रमणाच्या स्थितीत आहे. त्यामुळे चढ-उतार अनुभवायला मिळत आहेत.’ दुसऱ्या बाजूचा विचार करता विंडीजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने विजयानंतर आनंद व्यक्त केला. ब्रेथवेट म्हणाला, ‘मी खूश आहे. आम्ही फलंदाजांना नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला दिला होता. जो खेळाडू अर्धशतक झळकावेल त्याला माझ्या मानधनातील अर्धी रक्कम देण्यात येईल, असे मी जाहीर केले होते. आम्ही आमच्या चाहत्यांना खूश करण्यास प्रयत्नशील होतो. आम्ही आयपीएल बघितले असून डेथ ओव्हर्समध्ये भुवनेश्वर कशी गोलंदाजी करतो, याची कल्पना होती.’(वृत्तसंस्था)>झेल सोडल्यामुळे पराभव : कार्तिकसुमार क्षेत्ररक्षणामुळे विंडीजविरुद्ध रविवारी टी-२० लढतीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. झेल सोडणे महागात पडले, अशी प्रतिक्रिया भारतीय फलंदाज दिनेश कार्तिकने व्यक्त केली. सहाव्या षटकात एविन लुईसचा भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर उडालेला झेल कोहली व मोहम्मद शमी यांच्यादरम्यान ताळमेळ नसल्यामुळे सुटला. त्यानंतर चार चेंडूंनंतर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल कार्तिकला टिपण्यात अपयश आले. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कार्तिक म्हणाला, ‘जर मिस हिटवरही चेंडू सीमारेषेबाहेर जात असेल तर हा फलंदाजाचा दिवस असल्याचे आपल्या लक्षात येते. लुईसने आम्हाला दोन संधी दिल्या, पण त्याही आम्हाला कॅश करता आल्या नाहीत. आम्ही अनेक झेल सोडले आणि त्यामुळे सामन्यावरील पकड निसटली.’भारतातर्फे २९ चेंडूंमध्ये ४८ धावांची खेळी करणारा कार्तिक म्हणाला,‘१९० ही वाईट धावसंख्या नव्हती, पण लुईसची फलंदाजी बघितल्यानंतर हे आव्हान खुजे ठरले. त्याने चौकारांच्या तुलनेत षटकार अधिक ठोकले.’दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला या लढतीत खेळता आले नाही. कार्तिकच्या मते त्याची संघाला उणीव भासली. पांड्या अष्टपैलू खेळाडू असून गोलंदाजी व फलंदाजीमध्ये त्याची आम्हाला उणीव जाणवली, असेही कार्तिक म्हणाला. (वृत्तसंस्था)ही चांगली लढत होती. भारतासारख्या संघाविरुद्ध शतक झळकावणे प्रतिष्ठेची बाब आहे. मला सलग पाच सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती, पण मी स्वत:वरील विश्वास ढळू दिला नाही आणि या लढतीत मला त्याचा लाभ झाला. - एविन लुईसआम्ही फलंदाजी करताना २५-३० जास्तीच्या धावा फटकावू शकलो असतो. आम्हाला २३० धावा फटकावण्याची संधी होती, पण आम्ही संधी गमावली आणि त्यामुळे आम्ही विजयाचे हकदार नव्हतो. एका फलंदाजाला डावामध्ये सूत्रधाराची भूमिका बजावणे आवश्यक होते. दिनेशने चांगला खेळ केला, पण कुणीतरी ८०-९० धावांची खेळी करणे अपेक्षित होते. त्यानंतर आमची गोलंदाजीही चांगली झाली नाही.- विराट कोहली, कर्णधार