शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोल्हापूरच्या पोरी भारी, भारतीय संघातही दमदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:23 IST

क्रिकेटमध्ये मुलींची संख्या वाढली

कोल्हापूर : महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळविला. कोल्हापूरच्या क्रिकेट विश्वात विशेषत: महिलांनी या विजयाचे जल्लोषी स्वागत केले. क्रिकेट म्हणजे केवळ मुलांचा खेळ असा समज असताना क्रीडानगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरच्या पोरीही क्रिकेटमध्ये भारी आहेत. जिल्हा संघात मुलींचा टक्का वाढला आहे.महाराष्ट्राच्या महिला संघातून कोल्हापूरच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी बजाविली आहे. त्यात कोल्हापूरच्या आदिती गायकवाड, संजना वाघमोडे, सौम्यलता बिराजदार, ज्ञानेश्वरी पाटील आणि इचलकरंजीच्या संकेता देशपांडे या खेळाडूंचा समावेश आहे.

माजी क्रिकेट खेळाडू चंदाराणी कांबळेकोल्हापूरच्या चंदाराणी कांबळे या एक माजी क्रिकेट खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक आहेत. त्यांनी १९ वर्षे महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत थाळीफेक, गोळाफेक आणि भालाफेक या खेळांमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली. त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू, प्रशिक्षक (फिटनेस), व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. त्यांनी सुमारे २० वर्षे महाराष्ट्र महिला क्रिकेटमध्ये सक्रिय भूमिका बजावली.

महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधार अनुजा पाटीलस्थानिक स्पर्धांत बॉलगर्ल म्हणून काम करणाऱ्या कोल्हापूरच्या अनुजा पाटीलने भारतीय महिलांच्या क्रिकेट संघात स्थान पटकावले. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भरीव योगदान दिले. अनुजा जिल्हा क्रिकेट असोसिएशनची खेळाडू आहे. ती सध्या महाराष्ट्र महिला संघाचे कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. बीसीसीआयने आंतर विभागीय स्पर्धेसाठी विभागीय संघांत वेस्ट झोन संघाच्या कर्णधारपदीही तिची निवड झाली. ती भारतीय टी २०, एशिया कप, चॅलेजंर ट्राॅफी स्पर्धेसाठी भारतीय संघातून खेळली. महाराष्ट्र १९ वर्षांखालील संघात सलग ४ वर्षे आणि त्यातील २ वर्षे कर्णधार पद भूषविले. महाराष्ट्र खुला गट महिला संघासह भारतीय संघात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली होती.

महाराष्ट्र संघाची कर्णधार शिवाली शिंदेशिवाली शिंदेंची बीसीसीआय मार्फत घेतल्या जाणा-या टी २० स्पर्धेच्या महाराष्ट्र महिला सिनियर टी २० संघात आहे. तिची बंगळुरू येथील १९ वर्षाखालील नॅशनल क्रिकेट ॲकॅडमीत निवड झाली होती. सलग वर्षे १९ वर्षाखालील महाराष्ट्र महिला संघातून खेळली. २०११-१२ मध्ये १९ वर्षाखालील गटात महाराष्ट्र संघाची कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली. ऑल इंडिया इंटर झोनल महिला स्पर्धेसाठी खुल्या पश्चिम विभागीय (भारतीय) महिला क्रिकेट संघात उपकर्णधारपद भूषविले. भारतीय महिला टी-२० चॅलेंजर करंडक क्रिकेट स्पर्धेतही खेळली.

क्रिकेटमध्ये मुलींची संख्या वाढली आहे. जिल्हास्तरावर सर्व प्रकारच्या सुविधा खेळाडूंना उपलब्ध होत आहेत. सराव, फिटनेस, आहार, दर्जेदार प्रशिक्षक मिळत आहेत. त्यामुळेच राज्यासह विभागीय संघात निवड होत आहे. त्यातून भारतीय संघ निवडला जातो. - स्नेहा जामसांडेकर, समिती सदस्य, महाराष्ट्र निवड समिती

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Daughters Shine in Cricket, Making Waves in Indian Team

Web Summary : Kolhapur women excel in cricket, with players like Anuja Patil leading Maharashtra. Aditi Gaikwad and others represent the state. Former player Chandarani Kamble's contributions are also notable. Kolhapur's talent is rising.