कोहलीने वन-डे रँकिंगमधील अव्वल स्थान गमावले
By Admin | Updated: June 21, 2014 00:15 IST2014-06-21T00:15:37+5:302014-06-21T00:15:37+5:30
दुबई: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये न खेळण्याच्या निर्णयाचे नुकसान सोसावे लागल़े आज जाहीर आयसीसीच्या नव्या वन-डे फलंदाजीच्या रँकिंगमधील आपले अव्वल स्थान गमवावे लागले असून, दक्षिण आफ्रिकन फलंदाज एबी डिविलियर्स अव्वल स्थानी विराजमान झाला़

कोहलीने वन-डे रँकिंगमधील अव्वल स्थान गमावले
द बई: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये न खेळण्याच्या निर्णयाचे नुकसान सोसावे लागल़े आज जाहीर आयसीसीच्या नव्या वन-डे फलंदाजीच्या रँकिंगमधील आपले अव्वल स्थान गमवावे लागले असून, दक्षिण आफ्रिकन फलंदाज एबी डिविलियर्स अव्वल स्थानी विराजमान झाला़कोहलीने डिविलियर्सवर 9 रेटिंग गुणांची आघाडी घेतली आह़े दरम्यान, खेळाडूला आपल्या संघाच्या कोणत्याही सामन्यामध्ये न खेळल्याबद्दल एक टक्का रँकिंग गुणाचे नुकसान सोसावे लागते आणि यामुळेच भारतीय फलंदाज कोहलीला 13 गुणांचे नुकसान सोसावे लागल़े त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकन खेळाडूपेक्षा चार रेटिंग गुणांनी पिछाडीवर आह़ेदरम्यान, पुढील महिन्यात रँकिंगमध्ये बदल होऊ शकतो़ कारण डिविलियर्सला र्शीलंका तर कोहलीला इंग्लंडमध्ये खेळावयाचे आह़े दौर्यापूर्वी विर्शांती घेतल्याने कोहलीप्रमाणे शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनाही नुकसान सोसावे लागल़े धवन दोन स्थानांच्या नुकसानीसह 10 व्या तर रोहित अव्वल 20 मधून बाहेर होऊन 23 व्या स्थानावर राहिला आह़े सुरेश रैना दोन स्थानांच्या फायद्यासह 27 व्या स्थानावर आह़ेवन-डे रँकिंगच्या गोलंदाजीच्या यादीमध्ये रवींद्र जडेजा आणि रवींद्रन अश्विन यांना दोन-दोन स्थानांचे नुकसान झाले आह़े हे दोघेही अनुक्रमे सातव्या आणि 12 व्या स्थानावर आहेत़ वेगवान गोलंदाज उमेश यादव 78 व्या स्थानावर आह़े बांगलादेशविरुद्ध दुसर्या वन-डेमध्ये चार धावा देताना सहा बळी घेणारा स्टुअर्ट बिन्नी 23 स्थानांची छेप घेत 206 व्या स्थानावर आह़े जडेजा वन-डे अष्टपैलूच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर कायम आह़े पाकिस्तानचा मोहम्मद हाफीज अष्टपैलूंच्या सूचीमध्ये अव्वल स्थानी विराजमान आह़े टीम रँकिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही़ भारताला र्शीलंकेसह 112 गुण आहेत तर दशांश गुणांपर्यंत मोजमाप होऊ शकले तर भारत तिसर्या स्थानावर घसरू शकतो़ (वृत्तसंस्था)