शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

खेलो इंडिया : महाराष्ट्राच्या पूजा दानोळेला तिसरे सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 19:16 IST

महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने आज ५ कि.मी. स्क्रॅच शर्यत ८ मिनीट ४४.७० सेकंद अशी वेळ देत जिंकताना वैयक्तिक तिसरे सुवर्णपदक मिळविले.

गुवाहटी : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात मंगळवारी सायकलिंगच्या वेलोड्रमवर महाराष्ट्राच्या सायकलपटूंनी पदकांचा सपाटा लावला. यामुळे स्पर्धेतील महाराष्ट्राच्या पदकांनीही वेग घेतला.

महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने आज ५ कि.मी. स्क्रॅच शर्यत ८ मिनीट ४४.७० सेकंद अशी वेळ देत जिंकताना वैयक्तिक तिसरे सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर तीला १७ वर्षांखालील गटात सांघिक स्प्रिंट  प्रकारात आदिती डोंगरेसह ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. त्यांनी ५४.७१ सेकंद अशी वेळ दिली. सांघिक स्प्रिंट प्रकारात महाराष्ट्राच्या मुलामुलींनी मक्तेदारी राखली. मुलांच्या अभिषेक काशिद, मयूर पवार, अश्विन पाटील यांनी १ मिनीट ०६.०९२ सेकंदासह सुवर्णपदक मिळविले. पाठोपाठ शुशिकला आगाशे आणि मयुरी लुटे यांनी ४९.७३६ सेकंद वेळासह सोनेरी यश मिळविले.

    महाराष्ट्राला आजच मयुरी लुटे हिने २१ वर्षांखालील गटात ५०० मीटर टाईम ट्रायल शर्यतीत वैयक्तिक रौप्यपदक मिळवून दिले. तिने ३८.४६२ सेकंद वेळ दिली. तिला दिल्लीची आंतरराष्ट्रीय सायकलपटू त्रियशा पॉल हिच्या वेगाचा सामना करता आला नाही. त्रियशाने अपेक्षित कामगिरी करताना ३८.९८१ सेकंदासह सुवर्णपदक मिळविले. महाराष्ट्राला आजचे आणखी एक ब्रॉंझपदक मंगेश ताकमोगे याने वैयिक्तक टाईम ट्रायलमध्ये मिळवून दिले.  त्याने ३६.१०० सेकंद अशी वेळ दिली. तो अंदमान निकोबारच्या  डेव्हिड बेकहॅम, मणिपूरच्या ख्वाराकपाम राहुल सिंग यांच्या वेगाला गाठण्यात अपयश आले.

    लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेच्या वेलोड्रमवर आज महाराष्ट्राचाच बोलबाला राहिला. कोल्हापूरच्या पूजाने आज सलग तिसरे सुवर्णपदक मिळविताना आपली छाप पाडली. स्पर्धेत तिने पाच सुवर्णपदकाचे उद्दिष्ट बाळगले होते. मात्र, तिला ते साधण्यात अपयश आले असले, तरी ती पदकापासून दूर राहिली नाही. सुवर्ण हुकले तरी तिने जिद्दीने ब्रॉंझपदकाची कमाई केली. मुलांच्या २१ वर्षांखालील संघातील मयूर पवार, अश्विन पाटिल आणि अभिषेक काशिद यांनी आपला अनुभव पणाला लावताना आपल्यावरील विश्वास ढळू दिला नाही. सातारा आणि भंडारा येथून आलेल्या या तिघांनी आपल्या आंतरराष्ट्रीय यशाचा लौकिक कायम राखताना निर्विवाद वर्चस्व राखताना शर्यत सहज जिंकली. या तिघांनी आतापर्यंत तीन वर्षात आशिया करंडक स्पर्धेत दोन आणि एक आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. या तिघांनाही आता जागतिक स्तरावर आपले नाव कमवायचे आहे.* आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या पूजाचे कौतुक    आसामचे मुख्यमंत्री सवार्नंद सोनोवाल यांनी आज येथील सायकलिंग स्पर्धेला भेट दिली. त्या वेळी भारतीय सायकलिंग महासंघाचे खजिनदार प्रताप जाधव यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंशी त्यांची भेट घडवून आणली. महाराष्ट्राच्या पूजाने तीन सुवर्णपदके मिळविल्याचे समजल्यावर सोनोवाल यांनी तिला जवळ बोलावून तिचे कौतुक करताना आवर्जुन तिच्याशी संवाद साधला. महाराष्ट्रातून कुठून आलीस, घरी कोण आहे, आई वडिल काय करतात असे विचारल्यावर त्यांनी तुझ्याबरोबर आई वडिलांचेही अभिनंदन करायला हवे असे सांगितले आणि भेटल्यावर त्यांना माझा नमस्कार सांग असेही त्यांनी सांगितले. अशी गुणी खेळाडू त्यांनी देशाला दिली त्यांचाही मला अभिमान वाटतो, असे सांगून सोनोवाल यांनी नंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंबरोबर फोटोही काढून घेतला.

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाCyclingसायकलिंगMaharashtraमहाराष्ट्र