क्रिकेटवर भारी पडलं 'करवा चौथ'
By Admin | Updated: September 8, 2016 19:19 IST2016-09-08T19:19:31+5:302016-09-08T19:19:31+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणा-या मालिकेत 'करवा चौथ' मुळे बदल केला आहे

क्रिकेटवर भारी पडलं 'करवा चौथ'
>
-ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणा-या मालिकेत 'करवा चौथ' मुळे बदल केला आहे. 19 ऑक्टोबरला दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर होणारा तिसरा एकदिवसीय सामना आता 20 ऑक्टोबरला होणार आहे. 'करवा चौथ' असल्यामुळे या सामन्याची तारीख बदल्याणात आल्याचं सांगण्यात येत आहे.
बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि डीडीसीएचे उपाध्यक्ष सीके खन्ना यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. आपली विनंती मान्य केल्याने व सामन्याची तारीख एक दिवस पुढे ढकलल्यामुळे आम्ही बीसीसीआयचे आभारी आहोत असे खन्ना म्हणाले. या बदलाविषयीचे पत्र आपल्या कार्यालयाला मिळाले असल्याची माहितीही खन्ना यांनी यावेळी दिली.
उत्तर भारतात साज-या होणा-या या सणामुळे सामन्याच्या आयोजनात अडचणी येऊ शकतात व प्रामुख्याने याचा परिणाम तिकीट विक्रीवर होऊ शकतो अशा आशयाचे पत्र डीडीसीए ने बीसीसीआय सचिव अजय शिर्के यांना यापुर्वीच पाठवले होते.