शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धावपटू जैशाचे आरोप बिनबुडाचे !

By admin | Updated: August 24, 2016 04:05 IST

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) मात्र जैशाचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताची धावपटू ओ.पी. जैशाने स्पर्धेदरम्यान उष्ण वातावरण असताना अधिकाऱ्यांनी पाणी व एनर्जी ड्रिंक्सची व्यवस्था केली नसल्याचे आरोप केले होते. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) मात्र जैशाचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.सर्व देशांचे दोन किलोमीटर अंतरावर स्टॉल होते, पण आपल्या देशाचा स्टॉल रिकामा होता.’ जैशा मॅराथॉन पूर्ण केल्यानंतर फिनिश लाईनवर कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशिक्षक निकोलई स्नेसारेव्ह यांचा एका डॉक्टरसोबत वाद झाला. त्यानंतर त्यांना १२ तासांसाठी पोलीस ठाण्यात राहावे लागले. एएफआयने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, ‘प्रत्येक संघाला आपले वैयक्तिक ड्रिंक बुथवर ठेवण्याची परवानगी असते. त्यावर संघ आणि खेळाडूच्या पसंतीचे मार्क असते. या नियमानुसार मॅरेथॉन स्पर्धेच्या पूर्वसंध्येला भारतीय संघ व्यवस्थापक १६ बॉटल्स (जैशा व कवितासाठी प्रत्येकी ८) घेऊन प्रशिक्षक निकोलेई स्नेसारेव्ह यांच्याकडे त्यांच्या रुममध्ये गेले होते. संघव्यवस्थापकाने त्यांना एनर्जी ड्रिंक्सबाबत आवड कळविण्यास सांगितले होते. त्यामुळे खेळाडूंच्या गरजेनुसार त्यावर मार्क लावून बुथवर ठेवण्यासाठी आयोजकांना देता आले असते.’ एएफआयच्या मते, या प्रकरणात दोन्ही खेळाडूंनी (जैशा व कविता) प्रस्ताव फेटाळून भारतीय व्यवस्थापकला वैयक्तिक एनर्जी ड्रिंक्सची गरज नसल्याचे सांगितले. जर गरज भासली तर आयोजकांच्या बुथवरून ड्रिंक्स घेणार असल्याचे कळवले होते.’ (वृत्तसंस्था)>जैशाने आयोजकांवर केलेले आरोपरिओ आॅलिम्पिकमध्ये महिला मॅरेथॉन स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करणारी जैशा २ तास ४७ मिनिट १९ सेकंद वेळेसह ८९ स्थानावर राहिली. जैशा म्हणाली, ‘तेथे उष्ण वातावरण होते. स्पर्धेला सकाळी ९ वाजता प्रारंभ झाला. आमच्यासाठी ना पाणी होते ना एनर्जी ड्रिंक होते. केवळ एकदा ८ किलोमीटर अंतरावर रिओ आयोजकांतर्फे मला पाणी मिळाले. त्याची काही मदत झाली नाही. >चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती स्थापनक्रीडा मंत्रालयाने जैशाने केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी मंगळवारी दोन सदस्यांची स्थापन केली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, ‘क्रीडा व युवा कल्याण मंत्री विजय गोयल यांनी जैशाने केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी दोन सदस्यांची समित स्थापन केली आहे. त्यात संयुक्त सचिव क्रीडा ओंकार केडिया आणि क्रीडा संचालक विवेक नारायण यांचा समावेश आहे.’ समित सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करेल.>कवितानेही फेटाळले आरोपओ.पी. जैशाने भारतीय अधिकारी बेजबाबदार असल्याचा आरोप केला असला तरी अन्य मॅरेथॉनपटू कविता राऊतने मात्र हे आरोप फेटाळून लावल्यामुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे. या स्पर्धेत सहभागी अन्य भारतीय धावपटू कविता राऊतने मात्र एएफआयची पाठराखण करताना जैशाचे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. कविताने म्हटले की, भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने पाणी व एनर्जी ड्रिंक्स उपलब्ध करून दिले होते आणि त्यांच्याविरुद्ध माझी कुठली तक्रार नाही. महासंघाने मॅरेथॉनदरम्यान मला ड्रिंक्स उपलब्ध करून दिले होते, पण मीच नकार दिला. मी केवळ माझ्याबाबत सांगत आहे. कारण मला धावताना सहद किंवा ग्लुकोज घेण्याची सवय नाही.’>नियमानुसार जर एखादा खेळाडू बाहेरच्या व्यक्तीकडून एनर्जी ड्रिंक्स घेत असेल तर त्याला अपात्र ठरविण्यात येते. त्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी पाणी किंवा एनर्जी ड्रिंक्स पुरविले नाहीत, हा ओ.पी. जैशाने केलेला आरोप चुकीचा आहे. - एएफआय