शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई चॅम्पियन चषक हॉकी: उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतापुढे जपानचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 09:20 IST

आशियाई चॅम्पियन चषक हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारताला अखेरच्या साखळी सामन्यात आज जपान विरुद्ध दोन हात करावे लागणार आहे.

ढाका : आशियाई चॅम्पियन चषक हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारताला अखेरच्या साखळी सामन्यात आज जपान विरुद्ध दोन हात करावे लागणार आहे. या सामन्यात विजय प्राप्त करून उपांत्य फेरीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा भारताचा प्रयत्न असेल. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताची या स्पर्धेतील सुरुवात अपेक्षेनुरुप झाली नाही. 

पहिल्याच सामन्यात कोरियाने गतविजेत्या भारताला २-२ ने बरोबरीत रोखले होते. मात्र, यानंतर भारतीय संघाने जोरदार मुसंडी मारत यजमान बांगलादेशचा ९-० ने धुवा उडवला होता. त्यानंतच्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३-१ ने धक्का देत उपांत्य फेरीचे तिकीट मिळविले. सध्या भारत तीन सामन्यांत ७ गुण मिळवत अव्वल स्थानावर आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांवर नजर टाकल्यास जागतिक क्रमवारी आणि सध्याचा खेळाचा दर्जा बघता भारत या सर्व संघांपेक्षा कितीतरी समोर आहे. 

सुरुवातीच्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागल्याने भारतीय संघ त्यातून सतर्क झाला. म्हणूनच त्यानंतर सलग दोन सामन्यांत भारताने मोठे विजय मिळविले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कडव्या प्रतिकाराची भारताला अपेक्षा होती. शेवटच्या दोन क्वॉटरमध्ये ती खरी ठरली. कारण पाकिस्तानने चांगला खेळ दाखवत भारतावर दबाव वाढवला होता. खासकरून शेवटच्या १५ मिनिटांत, तर त्यांनी भारतीय गोलपोस्टवर अनेक हल्ले केले होते. मात्र, भारताच्या भक्कम बचावापुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही. आतापर्यंत या स्पर्धेत भारताकडून ललित उपाध्याय, आकाशदीप सिंग आणि दिलप्रीत सिंग यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. तर कर्णधार मनप्रीत आणि बचावपटू हरमनप्रीत यांनी आपल्या दर्जेदार खेळाने सर्वांना प्रभावित केले. पी. आर. श्रीजेशच्या अनुपस्थित भारतीय गोलकिपरची जागा उत्तमरीत्या सांभाळण्यात सूरज करकेरा यशस्वी ठरला आहे. 

विशेष करून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तर त्याने आपल्या भक्कम बचावाचा नमुना पेश करत भारताला विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावली. गेल्या काही वर्षांतली आकेडीवारी बघितल्यास आजच्या सामन्यात भारताची विजयाची शक्यता जास्त आहे. टोकीयो ऑलिम्पिकमध्ये जापानविरुद्धचा सामना भारताने ५-३ ने जिंकला होता. 

टॅग्स :Hockeyहॉकी