शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आशियाई चॅम्पियन चषक हॉकी: उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतापुढे जपानचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 09:20 IST

आशियाई चॅम्पियन चषक हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारताला अखेरच्या साखळी सामन्यात आज जपान विरुद्ध दोन हात करावे लागणार आहे.

ढाका : आशियाई चॅम्पियन चषक हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारताला अखेरच्या साखळी सामन्यात आज जपान विरुद्ध दोन हात करावे लागणार आहे. या सामन्यात विजय प्राप्त करून उपांत्य फेरीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा भारताचा प्रयत्न असेल. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताची या स्पर्धेतील सुरुवात अपेक्षेनुरुप झाली नाही. 

पहिल्याच सामन्यात कोरियाने गतविजेत्या भारताला २-२ ने बरोबरीत रोखले होते. मात्र, यानंतर भारतीय संघाने जोरदार मुसंडी मारत यजमान बांगलादेशचा ९-० ने धुवा उडवला होता. त्यानंतच्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३-१ ने धक्का देत उपांत्य फेरीचे तिकीट मिळविले. सध्या भारत तीन सामन्यांत ७ गुण मिळवत अव्वल स्थानावर आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांवर नजर टाकल्यास जागतिक क्रमवारी आणि सध्याचा खेळाचा दर्जा बघता भारत या सर्व संघांपेक्षा कितीतरी समोर आहे. 

सुरुवातीच्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागल्याने भारतीय संघ त्यातून सतर्क झाला. म्हणूनच त्यानंतर सलग दोन सामन्यांत भारताने मोठे विजय मिळविले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कडव्या प्रतिकाराची भारताला अपेक्षा होती. शेवटच्या दोन क्वॉटरमध्ये ती खरी ठरली. कारण पाकिस्तानने चांगला खेळ दाखवत भारतावर दबाव वाढवला होता. खासकरून शेवटच्या १५ मिनिटांत, तर त्यांनी भारतीय गोलपोस्टवर अनेक हल्ले केले होते. मात्र, भारताच्या भक्कम बचावापुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही. आतापर्यंत या स्पर्धेत भारताकडून ललित उपाध्याय, आकाशदीप सिंग आणि दिलप्रीत सिंग यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. तर कर्णधार मनप्रीत आणि बचावपटू हरमनप्रीत यांनी आपल्या दर्जेदार खेळाने सर्वांना प्रभावित केले. पी. आर. श्रीजेशच्या अनुपस्थित भारतीय गोलकिपरची जागा उत्तमरीत्या सांभाळण्यात सूरज करकेरा यशस्वी ठरला आहे. 

विशेष करून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तर त्याने आपल्या भक्कम बचावाचा नमुना पेश करत भारताला विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावली. गेल्या काही वर्षांतली आकेडीवारी बघितल्यास आजच्या सामन्यात भारताची विजयाची शक्यता जास्त आहे. टोकीयो ऑलिम्पिकमध्ये जापानविरुद्धचा सामना भारताने ५-३ ने जिंकला होता. 

टॅग्स :Hockeyहॉकी