शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

IPL 10 - मुंबई चौथ्यांदा अंतिम फेरीत

By admin | Updated: May 20, 2017 08:48 IST

आयपीएल १० मधील सर्वोत्तम विजय मुंबई इंडियन्सने क्वालिफायर २ मध्ये नोंदवला. या विजयासोबतच मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे.

ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. 20 - आयपीएल १० मधील सर्वोत्तम विजय मुंबई इंडियन्सने क्वालिफायर २ मध्ये नोंदवला. या विजयासोबतच मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. मुंबईने आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये आपला दबदबा राखणा-या मुंबई इंडियन्सने तुल्यबळ केकेआरला गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर पराभूत केले. 
मुंबईने अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंहला विश्रांती देत कर्ण शर्मा आणि कृणाल पांड्या यांच्याकडे फिरकीची धुरा दिली. कर्ण शर्माने आपले सर्वोत्तम प्रदर्शन या सामन्यात केले. त्याने ४ षटकांत १६ धावा देत चार गडी बाद केले. तर डेथ ओव्हर स्पेशलीस्ट जसप्रीत बुमराहने पॉवरप्ले मध्ये निर्धाव षटक टाकत तीन गडी बाद केले. 
 
जॉन्सनने २ तर मलिंगाने १ गडी बाद केला. गोलंदांजांच्या भेदक माºयापुढे केकेआरने शरणागती पत्करली. केकेआरकडून इशांक जग्गी आणि सुर्यकुमार यादव यांनी ५६ धावांची भागिदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठी धावसंख्या केकेआरला उभारता आली नाही.
कर्ण शर्माची दमदार कामगिरी पाहता केकेआरने त्यांचा फिरकीपटू पियुष चावला याला लवकर गोलंदाजीला बोलावले. चावलाने सिमन्स आणि अंबाती रायडू या स्फोटक फलंदाजांना बाद करत मुंबईला अडचणीत आणले.  यादवने पार्थिवला बाद करत मुंबईला बॅकफुटवर ढककले. मात्र मोठे आव्हान नसल्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलु कृणाल पांड्या यांनी मुंबईचा विजयपथ तयार केला.
मुंबई विजयाच्या जवळ असताना रोहित शर्मा फटकेबाजीच्या नादात बाद झाला. मात्र किरेन पोलार्ड आणि कृणाल यांनी संघाला विजय मिळवून दिला. रोहित शर्माने आयपीएलच्या सर्व सत्रात मिळून केकेआर विरोधात ७०० धावा फटकावल्या आहेत. केकेआर विरोधात एवढ्या धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. एखाद्या संघा विरोधात सर्वात जास्त धावा करण्याच्या यादी गेल  अव्वल आहे.
त्याने पंजाब विरोधात ७९७ धावा केल्या आहेत. तर रैनाने मुंबई विरोधात ७०७ आणि केकेआर विरोधात ७०१ धावा केल्या आहेत. कोहलीने सीएसके विरोधात ७०६ धावा केल्या आहेत. ४/१६ ही कर्ण शर्माची आतापर्यंची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने केकेआर विरोधात नेहमीच चांगली कामगिरी केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्याने केकेआर विरोधात आतापर्यंत १० सामन्यात १४ बळी घेतले आहेत.