शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 06:50 IST

४० वर्षांनंतर भारताला मिळाले यजमानपद, मुख्यमंत्र्यांनी मानले नीता अंबानींचे आभार

मुंबई : भारत ४० वर्षांनंतर दुसऱ्यांदा ऑलिम्पिक समितीच्या बैठकीचे यजमानपद भूषविणार आहे. मुंबईत आयओसीची १४० वी बैठक पुढच्या वर्षी प्रथमच आयोजित केली जाईल.  शनिवारी बीजिंगमध्ये झालेल्या १३९ व्या ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत भारताने पुढील बैठकीचे यजमानपद मिळविले. 

यावेळी कोणत्याही देशाने भारताला विरोध केला नाही. बैठकीत सहभागी असलेल्या भारतीय प्रतिनिधी नीता अंबानी यांनी भारताच्या ऑलिम्पिक महत्त्वाकांक्षेसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. १९८३ नंतर भारतात होणार असलेल्या या बैठकीचे आयोजन अत्याधुनिक जिओ विश्व कन्व्हेंशन सेंटरमध्ये होणार आहे. या बैठकीला १०१ नियमित मतदार सदस्य आणि ४५ मानद सदस्य उपस्थित राहतील.

१३९ व्या बैठकीत भारताकडून क्रीडा आणि युवा मंत्री अनुराग ठाकूर, अभिनव बिंद्रा आणि नरिंदर बत्रा हेदेखील सहभागी झाले आहेत. सत्रात, आयओसी सदस्य ऑलिम्पिक चार्टर आणि ऑलिम्पिकच्या यजमान शहराची निवड यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतात. 

मुख्यमंत्र्यांनी मानले नीता अंबानींचे आभारया बैठकीत महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीता अंबानी यांचे ट्विट करीत आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले की, ‘२०२३ च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक  समिती सेशनचे आयोजन करणे ही मुंबईसाठी केवळ अभिमानाची गोष्ट नाही तर भारताला क्रीडा क्षितिजावर पुढे नेण्याची संधीदेखील आहे. २०२३ चे सेशन मुंबई, महाराष्ट्राकडे आणण्याकरिता नीता अंबानी यांचे आभार.’

टॅग्स :nita ambaniनीता अंबानीUddhav Thackerayउद्धव ठाकरेIndiaभारत