शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारल्याने ऑलिम्पिक संघटनेची भारतावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 10:38 IST

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नेमबाजी विश्वचषकासाठी भारताता येणाऱ्या पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र या निर्णयामुळे ऑलिम्पिक चार्टरचा भंग झाल्याने आयओसीने भारतावर कारवाई केली आहे.

 पुणे - पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तान विरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. विविध स्तरांवर पाकिस्तानचा निषेध होत असताना नेमबाजी विश्वचषकासाठी भारताता येणाऱ्या पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने भारताला 14 कोट्यांसह नेमबाजी विश्वचषक आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. मात्र भविष्यात कुठल्याही ऑलिम्पिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत भारतावर बंदी घातली आहे. आयओसीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत झालेल्या चर्चेनंतर यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या दोन नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याविरोधात नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे तक्रार केली होती. आयओसीकडून यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ''भारतीय एनओसी, आयओसी आणि आयएसएसएफने अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र तरीही पाकिस्तान संघाला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही मार्ग निघू शकला नाही. ही परिस्थिती कुठल्याही प्रकराचा भेदभाव न करण्याच्या आयओसीच्या मूळ चार्टरच्या विरोधात जाणारी आहे. कुठल्याही स्पर्धेच्या यजमान देशात स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंना कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाविना  निपक्षपातीपणे आणि समानतेच्या वातावरणात खेळण्याची संधी मिळावी यासाठी, आयओए कटिबद्ध आहे."असे या पत्रकात म्हटले आहे.  

''आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती भारतात यापुढे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला स्थगिती देत आहे. जोपर्यंत भारत सरकारकडून ऑलिम्पिक चार्टरचे पालन होण्याबाबत लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहील,'' असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.   

टॅग्स :Indiaभारतpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान