शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

भारत-इंग्लंड लढत अनिर्णीत

By admin | Updated: November 14, 2016 01:55 IST

कर्णधार विराट कोहलीच्या लढवय्या खेळीमुळे भारताला प्रतिकूल परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध रविवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश आले.

राजकोट : कर्णधार विराट कोहलीच्या लढवय्या खेळीमुळे भारताला प्रतिकूल परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध रविवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश आले. इंग्लंडच्या पहिल्या डावात ११७ धावांची खेळी करणारा आणि लढतीत एकूण ३ बळी घेणारा अष्टपैलू मोईन अली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. उभय संघांदरम्यान दुसरा कसोटी सामना १७ नोव्हेंबरपासून विशाखापट्टणममध्ये खेळला जाणार आहे. कर्णधार कुकच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी ३१० धावांचे आव्हान ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना लेग स्पिनर आदिल राशिद (३-६४), डावखुरा फिरकीपटू जफर अन्सारी (१-४१) व मोईन अली (१-४७) यांच्या अचूक माऱ्यापुढे भारताची एक वेळ ४ बाद ७१ अशी अवस्था झाली होती, पण कर्णधार कोहली (नाबाद ४९), रविचंद्रन आश्विन (३२), रवींद्र जडेजा (नाबाद ३२) व मुरली विजय (३१) यांच्या खेळीच्या जोरावर यजमान संघाने ६ बाद १७२ धावांची मजल मारत सामना अनिर्णीत राखला. त्याआधी, कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने (१३०) शानदार फलंदाजी करताना कारकिर्दीतील ३० वे शतक झळकावले. इंग्लंडने दुसरा डाव ३ बाद २६० धावसंख्येवर घोषित करीत भारतापुढे ४९ षटकांत ३१० धावा फटकावण्याचे लक्ष्य ठेवले. चार वर्षांपूर्वी भारत दौऱ्यावर चमकदार कामगिरी करणाऱ्या कुकने कामगिरीत सातत्य राखताना भारताविरुद्ध सहावे, तर भारतात पाचवे शतक ठोकले. विदेशी फलंदाजातर्फे भारतात झळकावलेली ही सर्वाधिक शतके आहेत. कुकने विंडीजचे एवर्टन विक्स व क्लाईव्ह लॉईड आणि दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला यांना पिछाडीवर सोडले. यांच्या नावावर भारतात प्रत्येकी चार शतकांची नोंद आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात ख्रिस व्होक्सने गौतम गंभीरला माघारी परतवले. त्या वेळी संघाचे खातेही उघडले नव्हते. पुजारा (१८) चहापानापूर्वी रशिदचे लक्ष्य ठरला. पुजारा व विजय यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. विजयला वैयक्तिक १३ धावांवर असताना अन्सारीने स्वत:च्या गोलंदाजीवर जीवदान दिले, पण त्याला त्याचा लाभ घेता आला नाही. चहापानानंतर रशिदच्या गोलंदाजीवर तो हमीदकडे झेल देत माघारी परतला. अजिंक्य रहाणे (१) दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. मोईन अलीने त्याला तंबूचा मार्ग दाखविला. त्या वेळी भारताची ४ बाद ७१ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर कोहली व आश्विन यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला. कोहली व आश्विन यांनी १५ पेक्षा अधिक षटके इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. दरम्यान, आश्विनने अन्सारीच्या गोलंदाजीवर तीन चौकार ठोकले आणि याच षटकात कव्हरमध्ये जो रुटकडे झेल देत माघारी परतला. त्याने ५३ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकाराच्या मदतीने ३२ धावा केल्या. रिद्धिमान साहाला (९) खेळपट्टीवर अधिक वेळ तग धरता आला नाही. त्यानंतर कोहलीने जडेजाच्या साथीने डाव सावरला. त्यानी सातव्या विकेटसाठी १० षटकांत ४० धावांची अभेद्य भागीदारी करीत इंग्लंडच्या विजय मिळवण्याच्या आशा धुळीस मिळवल्या. कोहलीने ९८ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार ठोकले, तर जडेजाच्या ३३ चेंडूंच्या खेळीमध्येही सहा चौकारांचा समावेश आहे. त्याआधी, सकाळच्या सत्रात लेग स्पिनर अमित मिश्राने ११ चेंडूंच्या अंतरात २ बळी घेतले, पण कुकच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने आपली स्थिती मजबूत केली. पहिल्या डावात केवळ १ बळी घेणाऱ्या मिश्राने आज आपल्या पहिल्या दोन षटकांत सलामीवीर हसीब हमीद (८२) व जो रुट (४) यांना तंबूचा मार्ग दाखवला. (वृत्तसंस्था)