शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

भारत-इंग्लंड लढत अनिर्णीत

By admin | Updated: November 14, 2016 01:55 IST

कर्णधार विराट कोहलीच्या लढवय्या खेळीमुळे भारताला प्रतिकूल परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध रविवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश आले.

राजकोट : कर्णधार विराट कोहलीच्या लढवय्या खेळीमुळे भारताला प्रतिकूल परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध रविवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश आले. इंग्लंडच्या पहिल्या डावात ११७ धावांची खेळी करणारा आणि लढतीत एकूण ३ बळी घेणारा अष्टपैलू मोईन अली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. उभय संघांदरम्यान दुसरा कसोटी सामना १७ नोव्हेंबरपासून विशाखापट्टणममध्ये खेळला जाणार आहे. कर्णधार कुकच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी ३१० धावांचे आव्हान ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना लेग स्पिनर आदिल राशिद (३-६४), डावखुरा फिरकीपटू जफर अन्सारी (१-४१) व मोईन अली (१-४७) यांच्या अचूक माऱ्यापुढे भारताची एक वेळ ४ बाद ७१ अशी अवस्था झाली होती, पण कर्णधार कोहली (नाबाद ४९), रविचंद्रन आश्विन (३२), रवींद्र जडेजा (नाबाद ३२) व मुरली विजय (३१) यांच्या खेळीच्या जोरावर यजमान संघाने ६ बाद १७२ धावांची मजल मारत सामना अनिर्णीत राखला. त्याआधी, कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने (१३०) शानदार फलंदाजी करताना कारकिर्दीतील ३० वे शतक झळकावले. इंग्लंडने दुसरा डाव ३ बाद २६० धावसंख्येवर घोषित करीत भारतापुढे ४९ षटकांत ३१० धावा फटकावण्याचे लक्ष्य ठेवले. चार वर्षांपूर्वी भारत दौऱ्यावर चमकदार कामगिरी करणाऱ्या कुकने कामगिरीत सातत्य राखताना भारताविरुद्ध सहावे, तर भारतात पाचवे शतक ठोकले. विदेशी फलंदाजातर्फे भारतात झळकावलेली ही सर्वाधिक शतके आहेत. कुकने विंडीजचे एवर्टन विक्स व क्लाईव्ह लॉईड आणि दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला यांना पिछाडीवर सोडले. यांच्या नावावर भारतात प्रत्येकी चार शतकांची नोंद आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात ख्रिस व्होक्सने गौतम गंभीरला माघारी परतवले. त्या वेळी संघाचे खातेही उघडले नव्हते. पुजारा (१८) चहापानापूर्वी रशिदचे लक्ष्य ठरला. पुजारा व विजय यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. विजयला वैयक्तिक १३ धावांवर असताना अन्सारीने स्वत:च्या गोलंदाजीवर जीवदान दिले, पण त्याला त्याचा लाभ घेता आला नाही. चहापानानंतर रशिदच्या गोलंदाजीवर तो हमीदकडे झेल देत माघारी परतला. अजिंक्य रहाणे (१) दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. मोईन अलीने त्याला तंबूचा मार्ग दाखविला. त्या वेळी भारताची ४ बाद ७१ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर कोहली व आश्विन यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला. कोहली व आश्विन यांनी १५ पेक्षा अधिक षटके इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. दरम्यान, आश्विनने अन्सारीच्या गोलंदाजीवर तीन चौकार ठोकले आणि याच षटकात कव्हरमध्ये जो रुटकडे झेल देत माघारी परतला. त्याने ५३ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकाराच्या मदतीने ३२ धावा केल्या. रिद्धिमान साहाला (९) खेळपट्टीवर अधिक वेळ तग धरता आला नाही. त्यानंतर कोहलीने जडेजाच्या साथीने डाव सावरला. त्यानी सातव्या विकेटसाठी १० षटकांत ४० धावांची अभेद्य भागीदारी करीत इंग्लंडच्या विजय मिळवण्याच्या आशा धुळीस मिळवल्या. कोहलीने ९८ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार ठोकले, तर जडेजाच्या ३३ चेंडूंच्या खेळीमध्येही सहा चौकारांचा समावेश आहे. त्याआधी, सकाळच्या सत्रात लेग स्पिनर अमित मिश्राने ११ चेंडूंच्या अंतरात २ बळी घेतले, पण कुकच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने आपली स्थिती मजबूत केली. पहिल्या डावात केवळ १ बळी घेणाऱ्या मिश्राने आज आपल्या पहिल्या दोन षटकांत सलामीवीर हसीब हमीद (८२) व जो रुट (४) यांना तंबूचा मार्ग दाखवला. (वृत्तसंस्था)