शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

भारताची दमदार विजयी सलामी, छेत्रीची कमाल-टीम इंडियाची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 07:58 IST

एएफसी आशियाई चषक : थायलंडवर ४-१ ने मात

अबुधाबी : एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारताने आपल्या मोहिमेला दमदार प्रारंभ केला. सुनील छेत्रीच्या दोन गोलच्या जोरावर भारताने थायलंडचा ४-१ ने धुव्वा उडविला. मध्यंतराच्या १-१ अशा बरोबरीनंतर भारताने दुसऱ्या सत्रात तीन गोलचा धडाका लावला. अनिरुध थापा आणि बदली खेळाडू जेजे लालपेखलुआ यांनीही लक्ष्य साधले. छेत्रीने पहिल्या गोलसह लिओनेल मेस्सीला मागे टाकण्याची कामगिरीही केली.

येथील अल नाह्यान स्टेडियमवर स्टीफन कॉन्स्टंटाईन यांच्या मार्गदर्शनाखालील भारताने अ गटात आघाडी घेतली. भारताने तीन गुण वसूल केले. या गटात बहारीन आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात गोलशून्य बरोबरी झाली होती. खाते सर्वप्रथम उघडण्यात भारताला यश आले. २६ व्या मिनिटाला थ्रो-इन झाल्यावर आशिक कुरुनीयन याने बॉक्समध्ये मुसंडी मारली. त्याने प्रतिस्पर्धी गोलरक्षक चातचाई बुदप्रोम याच्या दिशेने चेंडू मारला होता, पण मध्येच चेंडू थीराथोन बुनमाथन याच्या हाताला लागून उडाला. पेनल्टी क्षेत्रात हे घडल्यामुळे भारताला पेनल्टी बहाल करण्यात आली. पुढील मिनिटाला ही पेनल्टी छेत्रीने घेतली आणि नेटमध्ये मैदानालगत चेंडू अचूक मारताना बुदप्रोमला संधी अशी दिलीच नही. थायलंडने सहा मिनिटांनी बरोबरी साधली. यात बुनमाथन याने योगदान देत आधीच्या दुदैर्वी चुकीची काहीशी भरपाई केली. हालीचरण नझार्री याने चानाथीप सोंगक्रासीन याला ढकलले. त्यामुळे थायलंडला फ्री किक देण्यात आली. बुनमाथन याने डाव्या पायाने मारलेला फटका नेटसमोर गेला आणि त्यावर तिरासील डांग्डा याने अचूक हेडींग करीत भारतीय गोलरक्षक व कर्णधार गुरप्रीतसिंग संधू याला चकविले. भारताने दुसरय सत्राची सुरवात सनसनाटी केली. पहिल्याच आणि एकूण ४६ व्या मिनिटाला उदांता सिंगने उजवीकडून चाल रचली. त्याने बॉक्समध्ये आशिकला पास दिला. आशिकने छेत्रीच्या दिशेने चेंडूला मार्ग दिला. मग छेत्रीने पहिल्याच टचमध्ये लक्ष्य साधले.सुनील छेत्रीची कमालसुनील छेत्रीचा खाते उघडणारा गोल ह्यमाईलस्टोनह्ण ठरला. त्याने सध्या सक्रीय असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत दुसरे स्थान मिळविले. त्याचा हा ६६ वा गोल आहे. त्याने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी (६५ गोल) याला मागे टाकले. पोतुर्गालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो सर्वाधिक ८५ गोलांसह आघाडीवर आहे.गोल कुणीही नोंदवू द्या.. जल्लोष एकसारखाचसामन्यानंतर सुनील छेत्री म्हणाला की गोल कुणीही नोंदवला तर तो गोल नोंदवण्याचा आनंद आणि त्याचा जल्लोष हा एकसारखाच असतो. दहा वर्षांनंतर मी माज्या गोलबाबत विचार करु शकेल. गोल व्हायलाच हवेत. त्याची गरज आहे. गोल कोण करतो हे महत्वाचे नाही. तो कुणीही नोंदवला तरी त्याचा जल्लोष एकच असेल.

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघFootballफुटबॉलSunil Chhetriसुनील छेत्री