शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

भारताची दमदार विजयी सलामी, छेत्रीची कमाल-टीम इंडियाची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 07:58 IST

एएफसी आशियाई चषक : थायलंडवर ४-१ ने मात

अबुधाबी : एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारताने आपल्या मोहिमेला दमदार प्रारंभ केला. सुनील छेत्रीच्या दोन गोलच्या जोरावर भारताने थायलंडचा ४-१ ने धुव्वा उडविला. मध्यंतराच्या १-१ अशा बरोबरीनंतर भारताने दुसऱ्या सत्रात तीन गोलचा धडाका लावला. अनिरुध थापा आणि बदली खेळाडू जेजे लालपेखलुआ यांनीही लक्ष्य साधले. छेत्रीने पहिल्या गोलसह लिओनेल मेस्सीला मागे टाकण्याची कामगिरीही केली.

येथील अल नाह्यान स्टेडियमवर स्टीफन कॉन्स्टंटाईन यांच्या मार्गदर्शनाखालील भारताने अ गटात आघाडी घेतली. भारताने तीन गुण वसूल केले. या गटात बहारीन आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात गोलशून्य बरोबरी झाली होती. खाते सर्वप्रथम उघडण्यात भारताला यश आले. २६ व्या मिनिटाला थ्रो-इन झाल्यावर आशिक कुरुनीयन याने बॉक्समध्ये मुसंडी मारली. त्याने प्रतिस्पर्धी गोलरक्षक चातचाई बुदप्रोम याच्या दिशेने चेंडू मारला होता, पण मध्येच चेंडू थीराथोन बुनमाथन याच्या हाताला लागून उडाला. पेनल्टी क्षेत्रात हे घडल्यामुळे भारताला पेनल्टी बहाल करण्यात आली. पुढील मिनिटाला ही पेनल्टी छेत्रीने घेतली आणि नेटमध्ये मैदानालगत चेंडू अचूक मारताना बुदप्रोमला संधी अशी दिलीच नही. थायलंडने सहा मिनिटांनी बरोबरी साधली. यात बुनमाथन याने योगदान देत आधीच्या दुदैर्वी चुकीची काहीशी भरपाई केली. हालीचरण नझार्री याने चानाथीप सोंगक्रासीन याला ढकलले. त्यामुळे थायलंडला फ्री किक देण्यात आली. बुनमाथन याने डाव्या पायाने मारलेला फटका नेटसमोर गेला आणि त्यावर तिरासील डांग्डा याने अचूक हेडींग करीत भारतीय गोलरक्षक व कर्णधार गुरप्रीतसिंग संधू याला चकविले. भारताने दुसरय सत्राची सुरवात सनसनाटी केली. पहिल्याच आणि एकूण ४६ व्या मिनिटाला उदांता सिंगने उजवीकडून चाल रचली. त्याने बॉक्समध्ये आशिकला पास दिला. आशिकने छेत्रीच्या दिशेने चेंडूला मार्ग दिला. मग छेत्रीने पहिल्याच टचमध्ये लक्ष्य साधले.सुनील छेत्रीची कमालसुनील छेत्रीचा खाते उघडणारा गोल ह्यमाईलस्टोनह्ण ठरला. त्याने सध्या सक्रीय असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत दुसरे स्थान मिळविले. त्याचा हा ६६ वा गोल आहे. त्याने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी (६५ गोल) याला मागे टाकले. पोतुर्गालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो सर्वाधिक ८५ गोलांसह आघाडीवर आहे.गोल कुणीही नोंदवू द्या.. जल्लोष एकसारखाचसामन्यानंतर सुनील छेत्री म्हणाला की गोल कुणीही नोंदवला तर तो गोल नोंदवण्याचा आनंद आणि त्याचा जल्लोष हा एकसारखाच असतो. दहा वर्षांनंतर मी माज्या गोलबाबत विचार करु शकेल. गोल व्हायलाच हवेत. त्याची गरज आहे. गोल कोण करतो हे महत्वाचे नाही. तो कुणीही नोंदवला तरी त्याचा जल्लोष एकच असेल.

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघFootballफुटबॉलSunil Chhetriसुनील छेत्री