शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या ऑलिम्पिकवीरांचे दणक्यात स्वागत; नवी दिल्ली विमानतळावर जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 09:02 IST

चाहत्यांच्या गर्दीने घेरले खेळाडूंना; कोरोना निर्बधांचा उडाला फज्जा

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे सोमवारी नवी दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत झाले. या वेळी आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी, विशेष करून सुवर्ण पदक विजेत्या नीरज यादवची छबी आपल्या मोबाइलमध्ये घेण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ लागली. यामुळे विमानतळाबाहेर प्रचंड  गर्दी जमा झाली होती. भारतीय क्रीडा प्राधिकरणचे (साइ) महानिर्देशक संदीप प्रधान यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींच्या चमूने भारतीय खेळाडूंचे स्वागत केले. भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आदिल सुमारिवाला हेही या वेळी उपस्थित होते. विमानतळावर पोहोचताच खेळाडूंचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत झाले. टोकियो ऑलिम्पिक भारताची आतापर्यंतची सर्वांत यशस्वी ऑलिम्पिक ठरली. यामध्ये भारताने सर्वाधिक ७ पदकांची कमाई केली.विशेष म्हणजे नीरज कुमारने भालाफेकीत भारताला सुवर्ण पदक मिळवून देत ऐतिहासिक कामगिरी केली. यामुळे नीरजची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी कोरोना निर्बंधामुळे अनिवार्य करण्यात आलेल्या सामाजिक अंतराचेही भान ठेवले नाही. भारताला कुस्तीत रौप्य पदक मिळवून देणारा रवी कुमार दहिया, ४ बाय ४०० मीटर शर्यतीत आशियाई विक्रम मोडणारा भारताचा पुरुष संघ यांचेही या वेळी जोरदार स्वागत करण्यात आले. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी एका कार्यक्रमात सर्व ऑलिम्पिकवीरांचा सन्मान केला.भारत सरकारने ऑलिम्पिकवीरांचा एका शानदार कार्यक्रमामध्ये सत्कार केला. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रत्येक खेळाडूला गौरविण्यात आले. यावेळी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला तो नीरज चोप्रा. माजी क्रीडामंत्री आणि विद्यमान विधी व न्याय मंत्री किरेन रिजिजू, क्रीडा राज्य मंत्री निसिथ प्रामाणिक आणि साइच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.बजरंगसाठी जमली गर्दीकुस्तीमध्ये कांस्य पदक मिळवलेल्या कुस्तीगीर बजरंग पुनियासाठीही मोठी गर्दी जमली होती. बजरंगने एका एसयूव्हीच्या सनरुफमधून बाहेर येत हात उंचावून आपल्या चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले. या वेळी अनेकांनी सामाजिक अंतराचे नियम झुगारून देत बजरंगच्या गाडीजवळ प्रचंड गर्दी केली. ...म्हणून इतर खेळाडू लवकर परतले होतेयंदाच्या ऑलिम्पिकवर कोरोनाचा प्रभाव दिसून आला. खेळाडूंना बायो-बबलसह अनेक निर्बंधांना सामोरे जावे लागले होते. कोरोना निर्बंधानुसार प्रत्येक खेळाच्या पदक वितरण समारोपानंतर त्या-त्या खेळातील खेळाडूंना ४८ तासांमध्ये टोकियो सोडायचे होते. त्यामुळेच मीराबाई चानू, पी. व्ही. सिंधू हे पदक वितरण सोहळ्यानंतर लगेच भारतात परतले होते.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021