शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या ऑलिम्पिकवीरांचे दणक्यात स्वागत; नवी दिल्ली विमानतळावर जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 09:02 IST

चाहत्यांच्या गर्दीने घेरले खेळाडूंना; कोरोना निर्बधांचा उडाला फज्जा

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे सोमवारी नवी दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत झाले. या वेळी आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी, विशेष करून सुवर्ण पदक विजेत्या नीरज यादवची छबी आपल्या मोबाइलमध्ये घेण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ लागली. यामुळे विमानतळाबाहेर प्रचंड  गर्दी जमा झाली होती. भारतीय क्रीडा प्राधिकरणचे (साइ) महानिर्देशक संदीप प्रधान यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींच्या चमूने भारतीय खेळाडूंचे स्वागत केले. भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आदिल सुमारिवाला हेही या वेळी उपस्थित होते. विमानतळावर पोहोचताच खेळाडूंचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत झाले. टोकियो ऑलिम्पिक भारताची आतापर्यंतची सर्वांत यशस्वी ऑलिम्पिक ठरली. यामध्ये भारताने सर्वाधिक ७ पदकांची कमाई केली.विशेष म्हणजे नीरज कुमारने भालाफेकीत भारताला सुवर्ण पदक मिळवून देत ऐतिहासिक कामगिरी केली. यामुळे नीरजची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी कोरोना निर्बंधामुळे अनिवार्य करण्यात आलेल्या सामाजिक अंतराचेही भान ठेवले नाही. भारताला कुस्तीत रौप्य पदक मिळवून देणारा रवी कुमार दहिया, ४ बाय ४०० मीटर शर्यतीत आशियाई विक्रम मोडणारा भारताचा पुरुष संघ यांचेही या वेळी जोरदार स्वागत करण्यात आले. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी एका कार्यक्रमात सर्व ऑलिम्पिकवीरांचा सन्मान केला.भारत सरकारने ऑलिम्पिकवीरांचा एका शानदार कार्यक्रमामध्ये सत्कार केला. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रत्येक खेळाडूला गौरविण्यात आले. यावेळी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला तो नीरज चोप्रा. माजी क्रीडामंत्री आणि विद्यमान विधी व न्याय मंत्री किरेन रिजिजू, क्रीडा राज्य मंत्री निसिथ प्रामाणिक आणि साइच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.बजरंगसाठी जमली गर्दीकुस्तीमध्ये कांस्य पदक मिळवलेल्या कुस्तीगीर बजरंग पुनियासाठीही मोठी गर्दी जमली होती. बजरंगने एका एसयूव्हीच्या सनरुफमधून बाहेर येत हात उंचावून आपल्या चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले. या वेळी अनेकांनी सामाजिक अंतराचे नियम झुगारून देत बजरंगच्या गाडीजवळ प्रचंड गर्दी केली. ...म्हणून इतर खेळाडू लवकर परतले होतेयंदाच्या ऑलिम्पिकवर कोरोनाचा प्रभाव दिसून आला. खेळाडूंना बायो-बबलसह अनेक निर्बंधांना सामोरे जावे लागले होते. कोरोना निर्बंधानुसार प्रत्येक खेळाच्या पदक वितरण समारोपानंतर त्या-त्या खेळातील खेळाडूंना ४८ तासांमध्ये टोकियो सोडायचे होते. त्यामुळेच मीराबाई चानू, पी. व्ही. सिंधू हे पदक वितरण सोहळ्यानंतर लगेच भारतात परतले होते.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021