शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

गॉल कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव, श्रीलंका ६३ धावांनी विजयी

By admin | Updated: August 15, 2015 15:14 IST

पहिल्या डावात चांगली आघाडी घेऊनही भारताने श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी ६३ धावांनी गमावली आहे.

ऑनलाइन लोकमत

गॉल (श्रीलंका), दि. १५ - पहिल्या डावात चांगली आघाडी घेऊनही भारताने श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी ६३ धावांनी गमावल्याने स्वातंत्र्यदिनी पहिली कसोटी जिंकण्याचं स्वप्न भंगल आहे. जिंकण्यासाठी अवघ्या १७६ धावांचे आव्हान समोर असताना दुस-या डावात भारताचे सर्व गडी ११२ धावांवर बाद झाले आणि श्रीलंकेने पहिली कसोटी जिंकत मालिकेत १- अशी आघाडी घेतली. श्रीलंकेच्या हेराथने ७ फलंदाजांना तंबूत पाठवले तर कौशलने ३ फलंदाजांना बाद केले.

भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजांना श्रीलंकेच्या फिरकी द्वयीनी चांगलाच झटका दिला. काल खेळ संपला तेव्हा भारताने एक गडी गमावत २३ धावा केल्या होत्या. मात्र आज भारताचे उरलेले फलंदाज पटापट हजेरी लावून तंबूत परतले. पहिल्या डावात शानदार शतकी खेळी करणारे शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीही चांगली कामगिरी करू शकले नाहीत. एकट्या अजिंक्य रहाणेने (३६) शेवटपर्यंत झुंज दिली मात्र त्याचे प्रयत्न अखेर अपयशी ठरले आणि भारताला पराभव स्वीकारावा लागला. भारतातर्फे के.एल.राहुल (५), शिखर धवन (२८), इशांत शर्मा (१०), रोहित शर्मा (४), कोहली (३), सहा (२), हरभजन (१), अश्विन ३, मिश्रा (१५) आणि वरुण अॅरॉनने नाबाद १ धाव केली.

संगकारा निवृत्त 

श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराची ही कारकिर्दीतील अखेरची कसोटी होती. आपल्या आवडत्या खेळाडूला निरोपाची भेट म्हणून ही कसोटी जिंकण्याचा श्रीलंकंन खेळाडूंचा इरादा होता आणि त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. पहिला कसोटी सामना संपल्यावर संगकाराने मैदानावर  फेरी मारून सर्व चाहत्यांचे आभारही मानले.