शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

भारताची ऐतिहासिक कामगिरी

By admin | Updated: July 11, 2017 01:59 IST

गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याचा पराक्रम केला. यंदा अव्वल खेळाडूंनी घेतलेल्या माघारीमुळे स्पर्धेला ग्लॅमर कमी मिळाले

भुवनेश्वर : यजमान भारताने २२ व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अजिंक्य कामगिरी करताना पहिल्यांदाच गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याचा पराक्रम केला. यंदा अव्वल खेळाडूंनी घेतलेल्या माघारीमुळे स्पर्धेला ग्लॅमर कमी मिळाले. भारताने या वेळी लक्षवेधी कामगिरी करताना बलाढ्य चीनच्या वर्चस्वाला धक्का दिला. दखल घेण्याची बाब म्हणजे १९८३ पासून या स्पर्धेत कायम अग्रस्थानी राहिलेल्या चीनची यंदा भारताच्या धडाक्यापुढे पीछेहाट झाली. या स्पर्धेत भारताने विक्रमी पदकांची कमाई करताना १२ सुवर्ण, ५ रौप्य आणि १२ कांस्य अशी २९ पदकांची लयलूट केली. सहा जुलैला सुरू झालेल्या या चारदिवसीय स्पर्धेत भारताने पहिल्या दिवसापासून राखलेले वर्चस्व अखेरच्या दिवसापर्यंत कायम राखताना बाजी मारली. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही काही स्टार्स खेळाडूंनी या स्पर्धेकडे पाठ फिरवली असल्याने त्याचा काहीसा फरक स्पर्धेवर नक्कीच पडला. लंडनमध्ये होत असलेल्या आगामी जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या तयारीसाठी चीन, जपान, कतार आणि बहारिनच्या काही अव्वल खेळाडूंनी आशियाई स्पर्धेतून आधीच माघार घेतली होती. या स्पर्धेत ४३ देशांतील एकूण ५६२ अ‍ॅथलिट्स सहभागी झाले होते. दरम्यान, स्पर्धा समारोपाच्या दिवशी आशियाई अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष दहलान अल हमद यांनी ओडिशा सरकार आणि भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे आभार व्यक्त करताना म्हटले की, ‘‘स्पर्धा शानदारपणे पार पडली. तुम्ही स्पर्धेचा स्तर आणखी वाढवला.’’ (वृत्तसंस्था)>पदकविजेत्यांचा गौरवओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील भारताच्या सर्व पदकविजेत्यांना रोख पुरस्कार देऊन त्यांचा सम्मान केला. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना १० लाख, तर रौप्य आणि कांस्यविजेत्यांना अनुक्रमे ७ व ५ लाख रुपये देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा समारोप झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी कलिंग स्टेडियमवर झालेल्या विशेष कार्यक्रमादरम्यान पटनायक यांनी पदकविजेत्या खेळाडूंचा सम्मान केला. या वेळी भालाफेक सुवर्णपदकविजेत्या नीरज चोप्राने म्हटले, ‘मुख्यमंत्री पटनायक यांच्याद्वारे झालेल्या सम्मानाने मी खूप आनंदी आहे. या आर्थिक पुरस्काराचा मला पुढील स्पर्धेच्या तयारीसाठी खूप फायदा होईल. मी कलिंग स्टेडियमला कधीच विसरू शकत नाही.’ >वातावरणाचा परिणामया स्पर्धेदरम्यान राहिलेल्या उष्ण व दमट वातावरणाचा खेळाडूंच्या कामगिरीवरही परिणाम झाला. स्पर्धेच्या चार दिवसांदरम्यान केवळे एकच मीट रेकॉर्ड नोंदला गेला. भारतीय संघाचा कर्णधार आणि स्टार भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने हा विक्रम रचला. भारताने कामगिरी उंचावली...स्पर्धेत यजमान भारताने चांगलेच वर्चस्व राखले. स्पर्धा इतिहासात आजपर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी करताना भारतीयांनी सुपरपॉवर चीनला नमवले. या वर्षी भारताने आपला सर्वाधिक ९४ खेळाडूंचा चमू स्पर्धेत उतरवला होता. याआधी जकार्ता १९८५ च्या स्पर्धेत भारताने २२ पदके मिळवत चांगली कामगिरी केली होती. तो विक्रम या वेळी भारतीयांनी मोडला. आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी, देशासाठी गर्वाची बाब, सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि शुभेच्छा.- विजय गोयल, केंद्रीय क्रीडामंत्रीभारताला अव्वल स्थानी आणल्याबद्दल सर्व अ‍ॅथलिट्सचे अभिनंदन. सर्वांचा खूप गर्व आहे. - वीरेंद्र सेहवाग,माजी क्रिकेटपटू