शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भारताचा सुवर्ण चौकार; दीपिकाचा डबल गोल्डन धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 05:30 IST

तिरंदाजी विश्वचषक ; दीपिकाचा डबल गोल्डन धमाका; मिश्र, वैयक्तिक गटात वर्चस्व

ठळक मुद्देदास आणि दीपिका यांची जोडीला सुरुवातीला जेफ वान डेन बर्ग आणि गॅब्रिएला शोलेसर या नेदरलँड्सच्या जोडीविरुद्ध ०-२ असे पिछाडीवर पडले होते. यावेळी भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागेल, असेच दिसत होते.

पॅरिस : भारतीय तिरंदाजांनी रविवारी शानदार कामगिरी करताना भारताला तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात सुवर्ण पदक मिळवून दिले. अतनु दास आणि त्याची पत्नी दीपिका कुमारी यांनी मिश्र सांघिक गटात नेदरलँड्सचा ५-३ असा पराभव करत भारताला तिसरे सुवर्ण मिळवून दिले. यानंतर दीपिकाने वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात वर्चस्व राखत भारताचे चौथे सुवर्ण पदक पटकावले.

दास आणि दीपिका यांची जोडीला सुरुवातीला जेफ वान डेन बर्ग आणि गॅब्रिएला शोलेसर या नेदरलँड्सच्या जोडीविरुद्ध ०-२ असे पिछाडीवर पडले होते. यावेळी भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागेल, असेच दिसत होते. मात्र, यानंतर दास आणि दीपिका यांनी कमालीचे सातत्य राखला थेट सुवर्ण पदकाचा वेध घेतला. या आधी दीपिका, अंकिता भगत आणि कोमोलिका बारी यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला रिकर्व्ह संघाने मेक्सिकोचा ५-१ असा फडशा पाडत सुवर्ण पदकावर कब्जा केला होता. दास आणि दीपिका गेल्यावर्षी ३० जूनला विवाहबद्ध झाले होते. या शानदार विजयानंतर अतनु दास म्हणाला की, ‘हा शानदार अनुभव आहे. आम्ही पहिल्यांदाच एकमेकांसोबत अंतिम फेरीत खेळत होतो आणि आम्ही सोबतीने विजय मिळवला.’

यशाचा खूप आनंद आहे. असे वाटत आहे की आम्ही एकमेकांसाठीच बनलो आहोत. मात्र, मैदानावर आम्ही जोडीदार नसतो, तर अन्य प्रतिस्पर्धीप्रमाणे आम्ही एकमेकांना प्रोत्साहित करतो, सहकार्य करतो आणि एकमेकांना पाठिंबा देतो.’ दखल घेण्याची बाब म्हणजे दीपिकाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पाच रौप्य आणि तीन कांस्य पदके जिंकली आहेत. मात्र, तिने पहिल्यांदाच मिश्र प्रकारात सुवर्ण जिंकले आहे. शनिवारी अभिषेक वर्माने कंपाऊड वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकले होते.

टॅग्स :Deepika Kumariदीपिका कुमारीGoldसोनं