शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिकमध्ये भारताची ‘सेंच्युरी’

By admin | Updated: June 27, 2016 03:49 IST

आॅलिम्पिकच्या इतिहासात भारताचे प्रथमच शंभरपेक्षा जास्त खेळाडू पात्र ठरले आहेत.

नवी दिल्ली : आॅलिम्पिकच्या इतिहासात भारताचे प्रथमच शंभरपेक्षा जास्त खेळाडू पात्र ठरले आहेत. रियोला जाणाऱ्या विविध खेळांच्या पथकांची संख्या १०३ झाल्यामुळे आतापर्यंत खेळाडू पात्रतेची सेंच्युरी साजरी केली आहे. आतापर्यंत हा सर्वांत मोठा संघ असणार आहे. रविवारी अ‍ॅथलेटिक्स प्रकारात तीन, तर आर्चरीमध्ये एका खेळाडू रियोचे तिकीट मिळविल्यानंतर भारताची संख्या १०३ वर गेली आहे. यापूर्वी २०१२ लंडन आॅलिम्पिसाठी १३ क्रीडा प्रकारात ८३, २००८ मध्ये बीजिंगसाठी १२ क्रीडा प्रकारासाठी ५७, २००४ मध्ये अथेन्ससाठी १४ क्रीडा प्रकारात ७३, २००० मध्ये सिडनीसाठी ८ क्रीडा प्रकारांत ६५, १९९६ मध्ये अटलांटामध्ये १३ क्रीडा प्रकारासाठी ४९, तर १९९२ मध्ये बार्सिलोना येथे झालेल्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी ५३ खेळाडू पात्र झाले होते. या सर्व स्पर्धांमध्ये लंडन येथे भारतीय खेळाडूंनी दोन रौप्य (विजय कुमार, सुशिल कुमार) व ४ कांस्यपदके गगन नारंग, सायना नेहवाल, मेरी कोम, योगेश्वर दत्ता) जिंकली होती. बीजिंग येथे एक सुवर्ण (अभिनव बिंद्रा) व दोन कांस्य (विजेंद्र सिंग, सुशिल कुमार), अथेन्स येथे एक रौप्य (राजवर्धन सिंह राठोड), सिडनी येथे एक कास्य (मल्लेश्वरी), अटलांटा येथे एक कांस्यपदक (लिएंडर स्पेस) जिंकले होते. (वृत्तसंस्था)>नवी दिल्ली : भारताच्या मोहम्मद अनिस, शार्बनी नंदा, अंकित शर्मा तर अनातू दास यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून रिया आॅलिम्पिकसाठी आपले तिकीट पक्के केले. रियोसाठी अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंची संख्या आता २३ तर एकूण भारतीय खेळाडूंची संख्या १०३ झाली आहे. पोलिश अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मोहम्मद अनिसने पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४५.४० सेकंदांची वेळ नोंदवून नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद करून रिया आॅलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. अनिसने राजीव अरोकियाने नोंदविलेला ४५.४७ सेकंदाचा विक्रम मोडीत काढला. कझाकिस्तान येथील अलमाटीमध्ये झालेल्या २६ व्या कोसनोव्ह मेमोरियल स्पर्धेत ओरिसाच्या शार्बनी नंदाने महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २३.०७ सेकंदाची वेळ नोंदविली. दुसरीकडे राष्ट्रीय विजेता मध्य प्रदेशच्या अंकित शर्माने पुरुषांच्या लांब उडी प्रकारात ८.१७ मीटरचे अंतर कापून रियोसाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले. भारतीय आर्चरी असोसिशनच्या वतीने बंगळुरू येथे निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पश्चिम बंगालचा २४ वर्षीय अनातू दासने वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात रियो आॅलिम्पिकसाठी आपली जागा निश्चित केली. आगामी रियो आॅलंपिक स्पर्धेसाठी पुरुष व महिला हॉकी संघ प्रत्येकी १८-१८ असे ३६ खेळाडू आहेत़ या खेळानंतर अ‍ॅथलेटिक्सचे सर्वात मोठे दल असणार आहे़ (वृत्तसंस्था)>अंतनू दास : बंगळुरू येथे झालेल्या निवड चाचणीत २४ वर्षीय कोलकाताच्या अंतनू दासने माजी आॅलिम्पिकयन जयंत तालुकदार व मंगलसिंह चम्पिया यांनी पराभूत केले. अंतनूने ६५३ गुणांची कमाई केली. त्याच्याकडे १.५ बोनस गुण होते. त्याने तालुकदार (६५९ गुण) व चम्पिया (६४९) यांच्यानंतर क्वालिफाय केले होते. त्यानंतर अंतनूने नॉकआऊट राउंडमध्ये या दोघांनाही पराभूत केले.