शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

सर्वोत्तम कामगिरीचा भारतीयांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 05:41 IST

पॅरालिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्ण पदक पटकावलेला स्टार भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि उंचउडी खेळाडू मरियप्पन थांगवेलू भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चमूचे नेतृत्त्व करतील.

टोकियो : ऑलिम्पिकमध्ये केलेल्या सर्वोत्तम कामगिरीनंतर भारतीयांना आता वेध लागले आहेत ते पॅरालिम्पिकचे. मंगळवारपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत भारताचे ५४ खेळाडू सहभागी होणार असून, यावेळी पहिल्यांदाच भारतीय संघ दहापेक्षा अधिक पदके जिंकण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. 

पॅरालिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्ण पदक पटकावलेला स्टार भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि उंचउडी खेळाडू मरियप्पन थांगवेलू भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चमूचे नेतृत्त्व करतील. भारतीय संघाकडून यंदा पाच सुवर्ण पदकांसह किमान १५ पदकांची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. १९७२ सालापासून भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत एकूण १२ पदकांची कमाई केली आहे. यंदा भारतीय खेळाडूंनी अपेक्षित कामगिरी केली, तर गुणतालिकेत अव्वल २५ देशांमध्ये भारताचा समावेश नक्कीच होईल. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशा एकूण चार पदकांसह ४३व्या स्थानी राहिला होता. 

गतविजेता भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया (एफ ४६), विश्वविजेता भालाफेकपटू संदीप चौधरी (एफ ६४), उंचउडीतील गतविजेता मरियप्पन थांगवेलू यांच्याकडून भारताला सुवर्ण पदकांची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे भालाफेकीमध्ये माजी विश्वविजेता सुंदर सिंग गुर्जर  आणि अजित सिंग (दोघेही एफ ४६), नवदीप सिंग (एफ ४१) यांच्याकडूनही पदकांची आशा आहे. 

बॅडमिंटनचा पॅरालिम्पिक  स्पर्धेत प्रवेश होत असून, यामध्ये भारताला पदकाची मोठी संधी आहे. जागतिक क्रमवारीतील अव्वल प्रमोद भगत पुरुषांच्या एसएल ३ गटात सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार आहे. तसेच, कृष्णा नागर (एसएच ६), तरुण ढिल्लो (एसएल ४), पारुल परमार (एसएल ३) व पलक कोहली (एसयू ५) यांच्याकडूनही चमकदार खेळाची अपेक्षा आहे. याशिवाय, ॲथलेटिक्स, कॅनोईंग, जलतरण, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी, टेबल टेनिस व तायक्वांडो यामध्येही भारताचा सहभाग आहे.

‘पॅरालिम्पियन हे खरे हिरो आहेत’‘पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू हे खऱ्या आयुष्यातील हिरो आहेत. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी पदक मिळविण्यास गेलेल्या खेळाडूंना पाठिंबा देऊन सर्वांनी त्यांचा उत्साह वाढवावा,’ असे सांगत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने भारतीयांना पॅरा खेळाडूंना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. 

सचिनने मंगळवारी सांगितले की, ‘आता पॅरालिम्पिक खेळांची वेळ आहे आणि सर्व भारतीयांना मी आवाहन करतो की, सर्वांनी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारताच्या सर्व ५४ खेळाडूंना समर्थन द्यावे. माझ्या मते, हे महिला आणि पुरुष खेळाडू विशेष क्षमतेचे नसून असाधारण क्षमतेचे खेळाडू आहेत. हे सर्व खऱ्या आयुष्यातील हिरो आहेत. या खेळाडूंच्या आतापर्यंतच्या प्रवासातून आपल्याला शिकायला मिळते. हे सर्वजण आपल्याला कायम प्रेरित करीत असतात. निकाल काहीही लागो; पण पॅरालिम्पिक खेळाडूंना पाठिंबा देणे गरजेचे आहे.’

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकर