शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भारतीय महिला संघाला रौप्यपदक

By admin | Published: August 02, 2015 11:42 PM

दोन सेटची महत्त्वपूर्ण आघाडी असतानाही भारतीय महिला तिरंदाजी संघाला रिकर्व्ह गटात रशियाकडून शूटआॅफमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे

कोपेनहेगन : दोन सेटची महत्त्वपूर्ण आघाडी असतानाही भारतीय महिला तिरंदाजी संघाला रिकर्व्ह गटात रशियाकडून शूटआॅफमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.दीपिकाकुमारी, लक्ष्मीरानी मांझी आणि रिमिल बुरुली या त्रिकुटाने रशियन संघावर दबाव निर्माण करीत ४-0ची आघाडी मिळविली होती, परंतु भारतीय संघाने पुढील दोन सेट गमावले आणि नंतर शूट आॅफमध्ये २७-२८ असा पराभव पत्करावा लागला.भारताने या स्पर्धेत दुसरे रौप्य जिंकले आहे. यापूर्वी काल कंपाउंड प्रकारात रजत चौहानने वैयक्तिक रौप्य पदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. विश्व तिरंदाजी चॅम्पियनशीपमध्ये ही भारताची आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे. महिला गटात आॅलिम्पिक कोटा मिळविल्यानंतर भारतीय संघाने खेळाडूंच्या स्थानांमध्ये बदल केला. अव्वल खेळाडू दीपिकाकुमारी पहिल्या आणि अंतिम प्रयत्नासाठी मैदानात उतरली. रशियन संघाने धिमी सुरुवात करुनही पदक जिंकण्यात यशस्वी ठरली.४-४ अशी बरोबरी झाल्यानंतर शूट आॅफमध्ये तुयाना दाशिदोरझीवा हिने परफेक्ट १0 गुणांसह सुरवात केली. भारताकडून लक्ष्मीरानीनी याची बरोबरी केली. दुसऱ्या फेरीत पेरोवाने ९ गुण मिळविले, तर भारताच्या रिमिलचा बाण ८ गुणांवर लागला. स्टेपानोवाने ९ गुण मिळवित भारतावर दबाब वाढविला, शेवटच्या प्रयत्नात दीपिकाला परफेक्ट १0 गुण मिळवून विजय मिळवण्याचा दबाव होता, परंतु तिला केवळ ९ गुणांवर समाधान मानावे लागल्यामुळे भारताला रौप्यपदक मिळाले.(वृत्तसंस्था)