शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

भारतीय संघाने २७ पदकांसह पटकावले दुसरे स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 05:46 IST

भारतीय मुलांच्या रिले संघाने युवा आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी शानदार कामगिरी करताना सुवर्ण पदकावर कब्जा केला. त्याचवेळी मुलींच्या रिले संघाने भारताला रौप्य पदक मिळवून दिले.

हाँगकाँग - भारतीय मुलांच्या रिले संघाने युवा आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी शानदार कामगिरी करताना सुवर्ण पदकावर कब्जा केला. त्याचवेळी मुलींच्या रिले संघाने भारताला रौप्य पदक मिळवून दिले. त्याचबरोबर शनिवारी स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत ऐतिहासिक सुवर्ण मिळवणाऱ्या भारताच्या अवंतिका नराळेने रविवारीही भारताला दोन रौप्य मिळवून दिली. भारताने एकूण २७ (८ सुवर्ण, १० रौप्य व ९ कांस्य) पदकांची कमाई करत दुसरे स्थान पटकावले आहे. चीनने सर्वाधिक १२ सुवर्ण पदकांसह १० रौप्य व ९ कांस्य अशी ३१ पदकांची कमाई केली. जपानने ६ सुवर्ण, ८ रौप्य व ६ कांस्य अशा २० पदकांसह तिसरे स्थान मिळवले.भारतीय मुलांच्या मिडले रिले संघाने सुवर्ण कामगिरी केली. करण हेगिस्टे, शनमुगा नालुबोठू, शशिकांत अंगदी व अब्दुल रझाक यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने १:५४.०४ मिनिटांची वेळ नोंदवत सुवर्ण पदकावर कब्जा केला. भारतीयांच्या शानदार वर्चस्वापुढे श्रीलंका (१:५५.०४) व चीनच्या (१:५५.४५) संघाला अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकांवर समाधान मानावे लागले.मुलींच्या मिडले रिले संघातही अवंतिका, दीप्तीसह पणिता पिंचाई व सुकंदा पी. यांचा समावेश असलेल्या भारताला २:१०.८७ मिनिटांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या मुलींनी सुवर्ण पटकावत २:१०.७१ मिनिटांची वेळ दिली. कझाकिस्तानने कांस्य जिंकले.शनिवारी ऐतिहासिक सुवर्ण जिंकणाऱ्या पुण्याच्या अवंतिका नराळेने रविवारी आणखी दोन पदकांची कमाई केली. तिने २०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. याच शर्यतीत भारताच्याच दीप्ती जीवांजीने कांस्य जिंकले. अवंतिकाने २४.२० सेकंद आणि दीप्तीने २४.७८ सेकंदांची वेळ नोंदवली. मुलींच्या रिले संघातही अवंतिकाचा सहभाग होता.शनिवारी १०० मीटर शर्यतीत पुण्याच्या १५ वर्षीय अवंतिकाने ११.९७ सेकंदांच्या वेळेसह बाजी मारत युवा गटात आशियातील सर्वात जलद धावपटू होण्याचा मान पटकावला होता. मुलींच्या २०० मीटर शर्यतीत चीनच्या युतिंग लीने २३.८३ सेकंदांची वेळ नोंदवत स्पर्धा विक्रमासह सुवर्ण पटकावले. तिच्या वेगापुढे अवंतिका आणि दीप्ती यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, नालूबोथू शनमिगा श्रीनिवास (२०० मीटर) याने रौप्य, ३ हजार मीटर शर्यतीमध्ये अमित जांगिर याने रौप्य, पूजाने ८००मी शर्यतीत रौप्य, ८००मी मुलांच्या शर्यतीत महेश बाबू आणि सुमित खारब यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य, अमनदीपसिंग धालिवालने गोळाफेकीत रौप्य व चंथिनी चंदनने १५००मी शर्यतीत कांस्य पटकावून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. (वृत्तसंस्था)मेडले रिले शर्यतीमध्ये भारताला सुवर्ण यश मिळवून देत भारतीय धावपटूंनी तिरंगा अभिमानाने फडकाविला. यावेळी (डावीकडून) शनमुगा नालुबोठू, शशिकांत अंगदी, करण हेगिस्टे आणि अब्दुल रझाक. मुलांच्या संघाने केलेल्या सुवर्ण यशानंतर मुलींच्या रिले संघाने भारताला रौप्य पदक मिळवून दिले.

टॅग्स :Indiaभारत