शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघाने २७ पदकांसह पटकावले दुसरे स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 05:46 IST

भारतीय मुलांच्या रिले संघाने युवा आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी शानदार कामगिरी करताना सुवर्ण पदकावर कब्जा केला. त्याचवेळी मुलींच्या रिले संघाने भारताला रौप्य पदक मिळवून दिले.

हाँगकाँग - भारतीय मुलांच्या रिले संघाने युवा आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी शानदार कामगिरी करताना सुवर्ण पदकावर कब्जा केला. त्याचवेळी मुलींच्या रिले संघाने भारताला रौप्य पदक मिळवून दिले. त्याचबरोबर शनिवारी स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत ऐतिहासिक सुवर्ण मिळवणाऱ्या भारताच्या अवंतिका नराळेने रविवारीही भारताला दोन रौप्य मिळवून दिली. भारताने एकूण २७ (८ सुवर्ण, १० रौप्य व ९ कांस्य) पदकांची कमाई करत दुसरे स्थान पटकावले आहे. चीनने सर्वाधिक १२ सुवर्ण पदकांसह १० रौप्य व ९ कांस्य अशी ३१ पदकांची कमाई केली. जपानने ६ सुवर्ण, ८ रौप्य व ६ कांस्य अशा २० पदकांसह तिसरे स्थान मिळवले.भारतीय मुलांच्या मिडले रिले संघाने सुवर्ण कामगिरी केली. करण हेगिस्टे, शनमुगा नालुबोठू, शशिकांत अंगदी व अब्दुल रझाक यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने १:५४.०४ मिनिटांची वेळ नोंदवत सुवर्ण पदकावर कब्जा केला. भारतीयांच्या शानदार वर्चस्वापुढे श्रीलंका (१:५५.०४) व चीनच्या (१:५५.४५) संघाला अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकांवर समाधान मानावे लागले.मुलींच्या मिडले रिले संघातही अवंतिका, दीप्तीसह पणिता पिंचाई व सुकंदा पी. यांचा समावेश असलेल्या भारताला २:१०.८७ मिनिटांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या मुलींनी सुवर्ण पटकावत २:१०.७१ मिनिटांची वेळ दिली. कझाकिस्तानने कांस्य जिंकले.शनिवारी ऐतिहासिक सुवर्ण जिंकणाऱ्या पुण्याच्या अवंतिका नराळेने रविवारी आणखी दोन पदकांची कमाई केली. तिने २०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. याच शर्यतीत भारताच्याच दीप्ती जीवांजीने कांस्य जिंकले. अवंतिकाने २४.२० सेकंद आणि दीप्तीने २४.७८ सेकंदांची वेळ नोंदवली. मुलींच्या रिले संघातही अवंतिकाचा सहभाग होता.शनिवारी १०० मीटर शर्यतीत पुण्याच्या १५ वर्षीय अवंतिकाने ११.९७ सेकंदांच्या वेळेसह बाजी मारत युवा गटात आशियातील सर्वात जलद धावपटू होण्याचा मान पटकावला होता. मुलींच्या २०० मीटर शर्यतीत चीनच्या युतिंग लीने २३.८३ सेकंदांची वेळ नोंदवत स्पर्धा विक्रमासह सुवर्ण पटकावले. तिच्या वेगापुढे अवंतिका आणि दीप्ती यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, नालूबोथू शनमिगा श्रीनिवास (२०० मीटर) याने रौप्य, ३ हजार मीटर शर्यतीमध्ये अमित जांगिर याने रौप्य, पूजाने ८००मी शर्यतीत रौप्य, ८००मी मुलांच्या शर्यतीत महेश बाबू आणि सुमित खारब यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य, अमनदीपसिंग धालिवालने गोळाफेकीत रौप्य व चंथिनी चंदनने १५००मी शर्यतीत कांस्य पटकावून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. (वृत्तसंस्था)मेडले रिले शर्यतीमध्ये भारताला सुवर्ण यश मिळवून देत भारतीय धावपटूंनी तिरंगा अभिमानाने फडकाविला. यावेळी (डावीकडून) शनमुगा नालुबोठू, शशिकांत अंगदी, करण हेगिस्टे आणि अब्दुल रझाक. मुलांच्या संघाने केलेल्या सुवर्ण यशानंतर मुलींच्या रिले संघाने भारताला रौप्य पदक मिळवून दिले.

टॅग्स :Indiaभारत