शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस, स्क्वॅशमध्ये भारताची सुवर्ण मोहोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 11:09 IST

सातव्या दिवशी दोन सुवर्ण, दोन रौप्य; ३८ पदकांसह चौथे स्थान

हांगझाऊ : भारताने १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी शनिवारी टेनिस आणि स्क्वॅशमध्ये सुवर्णमय कामगिरी करीत दहाव्या सुवर्णावर नाव कोरले. यामुळे पदकांची एकूण कमाई ३८ इतकी झाली असून, गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले आहे. यात १४ रौप्य आणि १४ कांस्य पदकांचा समावेश आहे.

भारताला आज पहिले सुवर्ण मिळाले ते टेनिसच्या मिश्र दुहेरीत. रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले यांच्या जोडीने सुवर्ण जिंकून दिल्यानंतर पुरुष स्क्वॅश स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानचा २-१ असा दणदणीत पराभव करीत सुवर्णावर नाव कोरले. 

त्याआधी भारतीय नेमबाज सरबज्योतसिंग आणि दिव्या टीएस यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिश्र सांघिक स्पर्धेचे रौप्य जिंकले.

पुरुष हॉकीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १०-२ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. टेबल टेनिसमध्ये सुतिर्था-अयहिका मुखर्जी यांनी ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरी गाठताच आणखी एक पदक पक्के झाले.

महिला मुष्टियुद्धात प्रीती पवार, लवलीना बोरगोहेन आणि नरेंद्र यांनी उपांत्य फेरी गाठताच भारताचे पदक निश्चित झाले. मात्र, मीराबाई चानू हिने भारोत्तोलनात निराशा केली.

बोपन्ना-ऋतुजा जोडीने जिंकले टेनिसचे सुवर्ण

अनुभवी रोहन बोपन्ना आणि युवा ऋतुजा भोसले या भारतीय मिश्र जोडीने आशियाई  क्रीडा स्पर्धेत शनिवारी टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकले. यंदा भारताचे टेनिस पथक किमान एका सुवर्णासह परतणार आहे. काल रामकुमार रामनाथन-साकेत मायनेनी यांनी पुरुष दुहेरीत रौप्यपदक जिंकले होते.

 एकेरीत अंकिता रैना आणि सुमित नागल हे पहिल्या फेरीत पराभूत झाले. पुरुष दुहेरीत बोपन्ना-यूकी भांबरी हेदेखील पहिल्याच सामन्यात पराभूत होऊन बाहेर पडले होते. सुवर्णपदकाच्या लढतीत बोपन्ना-भोसले यांनी आज तैपेईच्या एन शूओ लिआंग आणि त्सुंग हाओ हुआंग या जोडीचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये भारतीय जोडीने जोरदार कमबॅक केले. त्यांनी दुसरा सेट ४-३ अशा पिछाडीवरून जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये टाय ब्रेकरवर भारतीय जोडीने १०-४ असा विजय मिळविला.

भारताने टेनिस प्रकारात बुसानमध्ये चार, २००६ ला दोहा येथे चार, २०१० ला ग्वांगझू येथे पाच, २०१४ च्या इंचियोन आशियाडमध्ये पाच, २०१४ ला जकार्ता येथे तीन पदके जिंकली आहेत.

भारताने पाकिस्तानला चारली धूळ, स्क्वॅशमध्ये जिंकले सुवर्ण

हांगझाऊ : भारताच्या पुरुष स्क्वॅश संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी शनिवारी सुवर्ण लयलूट सुरूच ठेवताना पाकिस्तानला धूळ चारून सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताने फायनलमध्ये पाकवर २-१ अशी मात केली. भारताचा महेश विरुद्ध पाकिस्तानचा नासिर अशी पहिली लढत झाली. त्यात पाकिस्तानने विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र भारताच्या सौरभने पुढील लढत जिंकून १-१ अशी बरोबरी साधून दिली. तिसऱ्या लढतीत भारतीय खेळाडू अभयने पाकिस्तानच्या नूरवर पाच गेम्सच्या अटीतटीच्या  सामन्यात पहिला गेम जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये नूरने विजय मिळवला. तिसऱ्या गेममध्ये पाकिस्तानने विजय मिळवीत २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर अभयने विजय मिळवत २-२ अशी बरोबरी साधली. पाचव्या आणि गेम निर्णायक गेममध्ये १२-१० अशा फरकाने विजय मिळवून भारताने सामना जिंकलाच, शिवाय सुवर्णपदक खिशात घातले. आशियाडमध्ये २०१० ला भारताचा स्क्वॅश संघ पहिल्यांदा खेळला होता.