भारतीय महिला आइस हॉकी संघाने २०२५ च्या युएई येथे झालेल्या आयआयएचएफ आशिया कपमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत पाच देशांनी सहभाग घेतला होता. भारताने पाच सामन्यांत सात गुणांसह स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. महिला आइस हॉकी आशियाई कपमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
या स्पर्धेत भारताने एकूण पाच सामने खेळले. यापैकी भारताने तीन सामने जिंकले. तर, दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत इराण, फिलीपिन्स, भारत, मलेशिया, यूएई आणि किर्गिस्तानसह सहा देश सहभागी झाले. भारताने मलेशिया, यूएई आणि किर्गिस्तान या तीन संघांना पराभूत करून कांस्यपदक जिंकले.
आईस हॉकीला अधिकृतपणे लडाखचा राज्य खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. सुरुवातीला स्पर्धेला महिला आशियाई चॅलेंज कप असे नाव देण्यात आले. त्यानंतर २०२३ मध्ये या स्पर्धेचे नाव बदलून आशिया-ओशनिया चॅम्पियनशिप ठेवण्यात आले. भारताच्या विजयामुळे देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.